शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्पात पाणी, शेती मात्र तहानलेली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 00:31 IST

शासन दरबारी ९२ टक्के सिंचन सुविधेची नोंद असलेल्या भंडारा जिल्ह्यात सध्या प्रकल्पाच्या पाण्यासाठी शेतकरी धडपड करीत आहेत. जिल्ह्यात झालेल्या ८१ टक्के पावसाने प्रकल्पांमध्ये पुरेसे पाणी आहे. परंतु शेतापर्यंत पाणीच पोहचले नाही.

ठळक मुद्देपावसाची दडी : नियोजनाअभावी सिंचनात अडसर, प्रशासनाच्या वेळकाढू भूमिकेवर शेतकऱ्यांमध्ये रोष

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शासन दरबारी ९२ टक्के सिंचन सुविधेची नोंद असलेल्या भंडारा जिल्ह्यात सध्या प्रकल्पाच्या पाण्यासाठी शेतकरी धडपड करीत आहेत. जिल्ह्यात झालेल्या ८१ टक्के पावसाने प्रकल्पांमध्ये पुरेसे पाणी आहे. परंतु शेतापर्यंत पाणीच पोहचले नाही. सिंचन प्रकल्पाचे पाणी वेळेत मिळाले नाही तर धानासह इतर पिकही धोक्यात येण्याची शक्यता आहे. केवळ प्रशासनाच्या नियोजन शून्यतेने पाणी मिळत नसल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत. एक दिवसाचा अपवाद वगळता महिन्याभरापासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या आशा प्रकल्पातील पाण्यावरच आहे.भंडारा जिल्हा भात उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो. भात पिकासाठी पावसाची मोठ्या प्रमाणात आवश्यकता असते. यासोबत वेळेत पाऊसही गरजेचा असतो. पंरतु आॅगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून पावसाने दडी मारली. अपवाद २१ सप्टेंबर रोजी झालेल्या एक दिवसाचा पावसाचा आहे. सध्या हलके धानपीक निसवण्याच्या तर उच्चप्रतीचे धानपीक गर्भावस्थातेत आहे. अशा स्थितीत पिकांना पाण्याची आवश्यकता आहे. जिल्ह्यात दोन लाख २५ हजार हेक्टरवर विविध पिकांची लागवड करण्यात आली. त्यात एकट्या धानपिकाचे क्षेत्र एक लाख ७४ हजार हेक्टर आहे.पावसाने दडी मारल्याने पीक धोक्यात आले आहे. अशा स्थितीत पाण्याची निंतात गरज आहे. परंतु पाऊस कोसळण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाही. परिणामी जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांच्या आशा सिंचन प्रकल्पावर आहे. जिल्ह्यात चार मध्यम प्रकल्प आहेत. त्यात चांदपूर, बघेडा, बेटेकर बोथली, सोरणा या प्रकल्पात ५९.९४ टक्के जलसाठा आहे. तर ३१ लघु प्रकल्पात ६२.९० टक्के आणि मालगुजारी तलावात ६७.९९१ टक्के जलसाठा आहे. जिल्ह्यात सध्या सर्व प्रकल्पांमध्ये सरासरी ६२.९१ टक्के जलसाठा आहे. त्यामुळे सिंचनासाठी पाणी मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.मात्र अद्यापही सिंचनासाठी पाणी सोडण्यात आले नाही. गावागावातील शेतकरी संतप्त झाले असून गत आठवड्यात तर शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले होते. मात्र अद्यापही पाणी मिळत नाही. ९२ टक्के सिंचन सुविधा असल्याचा दावा करणारे प्रशासन प्रकल्पाचे पाणी सोडण्यात दिरंगाई करीत आहे. नियोजनाअभावी शेतकऱ्यांच्या बांध्यापर्यंत पाणी मिळत नाही. सिंचन प्रकल्पासारखीच अवस्था पाणी वापर संस्थाचीही झाली आहे. संस्थेतील अंतर्गत गटबाजी आणि पाटबंधारे विभागाच्या असहकार्य धोरणामुळे पाणी शेतापर्यंत पोहचत नाही.प्रशासन प्रकल्पाचे पाणी उन्हाळ्यासाठी राखीव ठेवत आहे. परंतु सध्याच्या स्थितीत जर धान पिकाला पाणी मिळाले नाही तर संपूर्ण खरीप हंगाम हातचा जाण्याची भिती आहे. उन्हाळ्याऐवजी याप्रकल्पाचे पाणी आताच सोडण्याची मागणी होत आहे.बघेडा तलाव चांदपूर मध्यम प्रकल्प, अंबागड तलाव, डोंगरगाव तलाव, नागठाणा तलाव, बावनथडी प्रकल्प, पेंच प्रकल्प यासारख्या प्रकल्पातून भात पिकांसाठी पाणी सोडण्याची गरज आहे. गत आठवड्यात आमदार चरण वाघमारे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना लाभ क्षेत्रातील शेतीसाठी पाणी सोडण्याचे निर्देश दिले होते. त्यांची अंमलबजावणी होऊन कालव्याद्वारे पाणी पुरवठा सुरु झाला आहे. परंतु अद्यापपर्यंत टेल पर्यंत पाणीच पोहचले नाही. बावनथडी प्रकल्पाच्या पाणी वाटपात हयगय करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्याचा इशारा आमदार चरण वाघमारे यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिला आहे.जिल्ह्यातील शेतकरी प्रकल्पाच्या पाण्याची चातकाप्रमाणे वाट पाहत आहे. पाऊस नसल्याने सर्व आशा प्रकल्पाच्या पाण्यावर आहे. एकीकडे ९२ टक्के सिंचन क्षेत्राचा दावा करायचा आणि दुसरीकडे पीक वाळू द्यायचे अशी प्रशानाची भुमिका आहे. सध्या प्रकल्पात मुबलक पाणी असतांना प्रशासन केवळ वेळ काढू धोरण अवलंबत आहे. परिणामी धानपीक धोक्यात आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत तात्काळ तोडगा काढला नाही तर शेतकऱ्यांसह आम्ही रस्त्यावर उतरु.-नाना पटोले, अध्यक्ष, अखिल भारतीय काँग्रेस किसान सेल

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प