शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
2
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
3
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
4
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
5
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
6
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
7
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
8
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
9
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
10
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
11
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
12
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
13
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
14
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
15
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
16
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
17
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
18
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
19
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
20
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्पात पाणी, शेती मात्र तहानलेली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 00:31 IST

शासन दरबारी ९२ टक्के सिंचन सुविधेची नोंद असलेल्या भंडारा जिल्ह्यात सध्या प्रकल्पाच्या पाण्यासाठी शेतकरी धडपड करीत आहेत. जिल्ह्यात झालेल्या ८१ टक्के पावसाने प्रकल्पांमध्ये पुरेसे पाणी आहे. परंतु शेतापर्यंत पाणीच पोहचले नाही.

ठळक मुद्देपावसाची दडी : नियोजनाअभावी सिंचनात अडसर, प्रशासनाच्या वेळकाढू भूमिकेवर शेतकऱ्यांमध्ये रोष

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शासन दरबारी ९२ टक्के सिंचन सुविधेची नोंद असलेल्या भंडारा जिल्ह्यात सध्या प्रकल्पाच्या पाण्यासाठी शेतकरी धडपड करीत आहेत. जिल्ह्यात झालेल्या ८१ टक्के पावसाने प्रकल्पांमध्ये पुरेसे पाणी आहे. परंतु शेतापर्यंत पाणीच पोहचले नाही. सिंचन प्रकल्पाचे पाणी वेळेत मिळाले नाही तर धानासह इतर पिकही धोक्यात येण्याची शक्यता आहे. केवळ प्रशासनाच्या नियोजन शून्यतेने पाणी मिळत नसल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत. एक दिवसाचा अपवाद वगळता महिन्याभरापासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या आशा प्रकल्पातील पाण्यावरच आहे.भंडारा जिल्हा भात उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो. भात पिकासाठी पावसाची मोठ्या प्रमाणात आवश्यकता असते. यासोबत वेळेत पाऊसही गरजेचा असतो. पंरतु आॅगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून पावसाने दडी मारली. अपवाद २१ सप्टेंबर रोजी झालेल्या एक दिवसाचा पावसाचा आहे. सध्या हलके धानपीक निसवण्याच्या तर उच्चप्रतीचे धानपीक गर्भावस्थातेत आहे. अशा स्थितीत पिकांना पाण्याची आवश्यकता आहे. जिल्ह्यात दोन लाख २५ हजार हेक्टरवर विविध पिकांची लागवड करण्यात आली. त्यात एकट्या धानपिकाचे क्षेत्र एक लाख ७४ हजार हेक्टर आहे.पावसाने दडी मारल्याने पीक धोक्यात आले आहे. अशा स्थितीत पाण्याची निंतात गरज आहे. परंतु पाऊस कोसळण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाही. परिणामी जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांच्या आशा सिंचन प्रकल्पावर आहे. जिल्ह्यात चार मध्यम प्रकल्प आहेत. त्यात चांदपूर, बघेडा, बेटेकर बोथली, सोरणा या प्रकल्पात ५९.९४ टक्के जलसाठा आहे. तर ३१ लघु प्रकल्पात ६२.९० टक्के आणि मालगुजारी तलावात ६७.९९१ टक्के जलसाठा आहे. जिल्ह्यात सध्या सर्व प्रकल्पांमध्ये सरासरी ६२.९१ टक्के जलसाठा आहे. त्यामुळे सिंचनासाठी पाणी मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.मात्र अद्यापही सिंचनासाठी पाणी सोडण्यात आले नाही. गावागावातील शेतकरी संतप्त झाले असून गत आठवड्यात तर शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले होते. मात्र अद्यापही पाणी मिळत नाही. ९२ टक्के सिंचन सुविधा असल्याचा दावा करणारे प्रशासन प्रकल्पाचे पाणी सोडण्यात दिरंगाई करीत आहे. नियोजनाअभावी शेतकऱ्यांच्या बांध्यापर्यंत पाणी मिळत नाही. सिंचन प्रकल्पासारखीच अवस्था पाणी वापर संस्थाचीही झाली आहे. संस्थेतील अंतर्गत गटबाजी आणि पाटबंधारे विभागाच्या असहकार्य धोरणामुळे पाणी शेतापर्यंत पोहचत नाही.प्रशासन प्रकल्पाचे पाणी उन्हाळ्यासाठी राखीव ठेवत आहे. परंतु सध्याच्या स्थितीत जर धान पिकाला पाणी मिळाले नाही तर संपूर्ण खरीप हंगाम हातचा जाण्याची भिती आहे. उन्हाळ्याऐवजी याप्रकल्पाचे पाणी आताच सोडण्याची मागणी होत आहे.बघेडा तलाव चांदपूर मध्यम प्रकल्प, अंबागड तलाव, डोंगरगाव तलाव, नागठाणा तलाव, बावनथडी प्रकल्प, पेंच प्रकल्प यासारख्या प्रकल्पातून भात पिकांसाठी पाणी सोडण्याची गरज आहे. गत आठवड्यात आमदार चरण वाघमारे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना लाभ क्षेत्रातील शेतीसाठी पाणी सोडण्याचे निर्देश दिले होते. त्यांची अंमलबजावणी होऊन कालव्याद्वारे पाणी पुरवठा सुरु झाला आहे. परंतु अद्यापपर्यंत टेल पर्यंत पाणीच पोहचले नाही. बावनथडी प्रकल्पाच्या पाणी वाटपात हयगय करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्याचा इशारा आमदार चरण वाघमारे यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिला आहे.जिल्ह्यातील शेतकरी प्रकल्पाच्या पाण्याची चातकाप्रमाणे वाट पाहत आहे. पाऊस नसल्याने सर्व आशा प्रकल्पाच्या पाण्यावर आहे. एकीकडे ९२ टक्के सिंचन क्षेत्राचा दावा करायचा आणि दुसरीकडे पीक वाळू द्यायचे अशी प्रशानाची भुमिका आहे. सध्या प्रकल्पात मुबलक पाणी असतांना प्रशासन केवळ वेळ काढू धोरण अवलंबत आहे. परिणामी धानपीक धोक्यात आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत तात्काळ तोडगा काढला नाही तर शेतकऱ्यांसह आम्ही रस्त्यावर उतरु.-नाना पटोले, अध्यक्ष, अखिल भारतीय काँग्रेस किसान सेल

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प