शहरं
Join us  
Trending Stories
1
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2047 पर्यंत देशाचे नेतृत्व करावे, आजवर असा नेता पाहिला नाही..." - मुकेश अंबानी
2
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
3
२५,००० रुपयांच्या पगारात आलिशान कार अन् फ्लॅट शक्य आहे! तज्ज्ञांनी सांगितलं गुंतवणुकीचं सूत्र
4
याला म्हणतात नशीब! आदिवासी महिलेला सापडले ३ मौल्यवान हिरे; रातोरात झाली लखपती
5
GST कपाती नंतर मध्यमवर्गींना आणखी एक भेट मिळणार? ऑक्टोबरमध्ये RBI घेणार मोठा निर्णय
6
'या' कंपनीनं अचानक बंद केला आपला व्यवसाय, आता शेअर विकण्यासाठी रांगा; ₹१३१ वर आला भाव
7
एटापल्लीच्या जंगलात पोलीस आणि नक्षलवाद्यांत जोरदार चकमक, दोन महिला माओवाद्यांना मारण्यात यश
8
पितृपक्ष २०२५ गुरुपुष्यामृत योग: लक्ष्मी-स्वामींची कायम कृपा, ५ गोष्टी करा, लाभ-पुण्य मिळवा!
9
टेस्लाने जे मॉडेल भारतात लाँच केले, त्याच्या काचा फोडून बाहेर पडतायत अमेरिकेतील लोक...
10
देशभरात तपासणी अन् औषधे मोफत; पीएम मोदींच्या हस्ते ‘स्वस्थ नारी योजने’चा शुभारंभ
11
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात मृत्यू येणे चांगले, पण अंत्यविधिला गेल्यावर स्मशानात काढू नका 'हे' शब्द
12
गोव्याच्या मनोहर पर्रीकरांचे नाव येताच रोखठोक अजितदादा निरुत्तर का झाले असावे? चर्चांना उधाण
13
पितृपक्ष २०२५: केवळ ५ मिनिटे गुरुपुष्यामृत योग, या दिवशी नेमके काय करावे? पाहा, सविस्तर
14
"महाराष्ट्र पेटवण्याचा डाव..."; मीनाताई ठाकरे पुतळ्याची पाहणी, उद्धव ठाकरेंनी व्यक्त केल्या २ शंका
15
Smriti Mandhana Equals World Record : ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे क्वीन स्मृती मानधनाची विक्रमी सेंच्युरी
16
Solar Eclipse 2025: सावधान! सूर्यग्रहण भारतात नाही दिसणार, पण 'या' ६ राशींवर प्रभाव टाकणार!
17
आयफोन १७ प्रो मॅक्सच्या 'या' कलरची क्रेझ; विक्री सुरू होण्याआधीच आउट ऑफ स्टॉक!
18
कॅन्सरच्या उपचारामुळे केस गळती, अभिनेत्रीने सांगितला भीतीदायक अनुभव, म्हणाली- "अंघोळ केल्यानंतर १०-१५ मिनिटे..."
19
'मोदीजी, संपूर्ण रात्र झोपले नाही, त्यांचा कंठ दाटून आला होता'; शिवराज सिंह चौहानांनी सांगितला १९९२-९२ मधील किस्सा
20
"प्रत्येक दुकानावर बोर्ड असायला हवा, 'गर्व से कहो...!'"; वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींचं मोठं आवाहन

प्रकल्पात पाणी, शेती मात्र तहानलेली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 00:31 IST

शासन दरबारी ९२ टक्के सिंचन सुविधेची नोंद असलेल्या भंडारा जिल्ह्यात सध्या प्रकल्पाच्या पाण्यासाठी शेतकरी धडपड करीत आहेत. जिल्ह्यात झालेल्या ८१ टक्के पावसाने प्रकल्पांमध्ये पुरेसे पाणी आहे. परंतु शेतापर्यंत पाणीच पोहचले नाही.

ठळक मुद्देपावसाची दडी : नियोजनाअभावी सिंचनात अडसर, प्रशासनाच्या वेळकाढू भूमिकेवर शेतकऱ्यांमध्ये रोष

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शासन दरबारी ९२ टक्के सिंचन सुविधेची नोंद असलेल्या भंडारा जिल्ह्यात सध्या प्रकल्पाच्या पाण्यासाठी शेतकरी धडपड करीत आहेत. जिल्ह्यात झालेल्या ८१ टक्के पावसाने प्रकल्पांमध्ये पुरेसे पाणी आहे. परंतु शेतापर्यंत पाणीच पोहचले नाही. सिंचन प्रकल्पाचे पाणी वेळेत मिळाले नाही तर धानासह इतर पिकही धोक्यात येण्याची शक्यता आहे. केवळ प्रशासनाच्या नियोजन शून्यतेने पाणी मिळत नसल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत. एक दिवसाचा अपवाद वगळता महिन्याभरापासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या आशा प्रकल्पातील पाण्यावरच आहे.भंडारा जिल्हा भात उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो. भात पिकासाठी पावसाची मोठ्या प्रमाणात आवश्यकता असते. यासोबत वेळेत पाऊसही गरजेचा असतो. पंरतु आॅगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून पावसाने दडी मारली. अपवाद २१ सप्टेंबर रोजी झालेल्या एक दिवसाचा पावसाचा आहे. सध्या हलके धानपीक निसवण्याच्या तर उच्चप्रतीचे धानपीक गर्भावस्थातेत आहे. अशा स्थितीत पिकांना पाण्याची आवश्यकता आहे. जिल्ह्यात दोन लाख २५ हजार हेक्टरवर विविध पिकांची लागवड करण्यात आली. त्यात एकट्या धानपिकाचे क्षेत्र एक लाख ७४ हजार हेक्टर आहे.पावसाने दडी मारल्याने पीक धोक्यात आले आहे. अशा स्थितीत पाण्याची निंतात गरज आहे. परंतु पाऊस कोसळण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाही. परिणामी जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांच्या आशा सिंचन प्रकल्पावर आहे. जिल्ह्यात चार मध्यम प्रकल्प आहेत. त्यात चांदपूर, बघेडा, बेटेकर बोथली, सोरणा या प्रकल्पात ५९.९४ टक्के जलसाठा आहे. तर ३१ लघु प्रकल्पात ६२.९० टक्के आणि मालगुजारी तलावात ६७.९९१ टक्के जलसाठा आहे. जिल्ह्यात सध्या सर्व प्रकल्पांमध्ये सरासरी ६२.९१ टक्के जलसाठा आहे. त्यामुळे सिंचनासाठी पाणी मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.मात्र अद्यापही सिंचनासाठी पाणी सोडण्यात आले नाही. गावागावातील शेतकरी संतप्त झाले असून गत आठवड्यात तर शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले होते. मात्र अद्यापही पाणी मिळत नाही. ९२ टक्के सिंचन सुविधा असल्याचा दावा करणारे प्रशासन प्रकल्पाचे पाणी सोडण्यात दिरंगाई करीत आहे. नियोजनाअभावी शेतकऱ्यांच्या बांध्यापर्यंत पाणी मिळत नाही. सिंचन प्रकल्पासारखीच अवस्था पाणी वापर संस्थाचीही झाली आहे. संस्थेतील अंतर्गत गटबाजी आणि पाटबंधारे विभागाच्या असहकार्य धोरणामुळे पाणी शेतापर्यंत पोहचत नाही.प्रशासन प्रकल्पाचे पाणी उन्हाळ्यासाठी राखीव ठेवत आहे. परंतु सध्याच्या स्थितीत जर धान पिकाला पाणी मिळाले नाही तर संपूर्ण खरीप हंगाम हातचा जाण्याची भिती आहे. उन्हाळ्याऐवजी याप्रकल्पाचे पाणी आताच सोडण्याची मागणी होत आहे.बघेडा तलाव चांदपूर मध्यम प्रकल्प, अंबागड तलाव, डोंगरगाव तलाव, नागठाणा तलाव, बावनथडी प्रकल्प, पेंच प्रकल्प यासारख्या प्रकल्पातून भात पिकांसाठी पाणी सोडण्याची गरज आहे. गत आठवड्यात आमदार चरण वाघमारे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना लाभ क्षेत्रातील शेतीसाठी पाणी सोडण्याचे निर्देश दिले होते. त्यांची अंमलबजावणी होऊन कालव्याद्वारे पाणी पुरवठा सुरु झाला आहे. परंतु अद्यापपर्यंत टेल पर्यंत पाणीच पोहचले नाही. बावनथडी प्रकल्पाच्या पाणी वाटपात हयगय करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्याचा इशारा आमदार चरण वाघमारे यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिला आहे.जिल्ह्यातील शेतकरी प्रकल्पाच्या पाण्याची चातकाप्रमाणे वाट पाहत आहे. पाऊस नसल्याने सर्व आशा प्रकल्पाच्या पाण्यावर आहे. एकीकडे ९२ टक्के सिंचन क्षेत्राचा दावा करायचा आणि दुसरीकडे पीक वाळू द्यायचे अशी प्रशानाची भुमिका आहे. सध्या प्रकल्पात मुबलक पाणी असतांना प्रशासन केवळ वेळ काढू धोरण अवलंबत आहे. परिणामी धानपीक धोक्यात आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत तात्काळ तोडगा काढला नाही तर शेतकऱ्यांसह आम्ही रस्त्यावर उतरु.-नाना पटोले, अध्यक्ष, अखिल भारतीय काँग्रेस किसान सेल

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प