वांगी-मांडवी रस्ता ठरतोय जीवघेणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2020 05:00 IST2020-03-04T05:00:00+5:302020-03-04T05:00:26+5:30
तिरोडा शहराला जोडणारा वांगी गावातील रस्ता मुख्य आहे. याच मार्गाने वाहनांची मोठी वर्दळ असते. वैनगंगा नदीवरील धरण बांधकामाने तिरोडा शहराचे अंतर १३ किमी आहे. वांगी गावातील रस्ता धरणाला जोडणारा असल्याने पर्यटक याच मार्गाने हजेरी लावत आहे. वांगी ते मांडवी गावांना जोडणाºया रस्त्याने मजबुतीकरण झाले आहे. परंतु अंतिम टप्प्यातील डांबरीकरण रखडले आहे.

वांगी-मांडवी रस्ता ठरतोय जीवघेणा
लोकमत न्यूज नेटवर्क
चुल्हाड (सिहोरा) : तुमसर तालुक्यातील वांगी- मांडगी गावांना जोडणारा रस्ता जीवघेणा ठरू पाहत आहे. या रस्त्यावरील खड्डे अपघाताला आमंत्रण देत आहेत. रस्ता डांबरीकरणाची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
तिरोडा शहराला जोडणारा वांगी गावातील रस्ता मुख्य आहे. याच मार्गाने वाहनांची मोठी वर्दळ असते. वैनगंगा नदीवरील धरण बांधकामाने तिरोडा शहराचे अंतर १३ किमी आहे. वांगी गावातील रस्ता धरणाला जोडणारा असल्याने पर्यटक याच मार्गाने हजेरी लावत आहे. वांगी ते मांडवी गावांना जोडणाºया रस्त्याने मजबुतीकरण झाले आहे. परंतु अंतिम टप्प्यातील डांबरीकरण रखडले आहे. गत सहा महिन्यांपासुन रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आलेले नाही. यामुळे मजबुतीकरणाच्या रस्त्यावर खड्डे निर्माण झाले आहेत. रस्त्यावर गिट्टी अस्तव्यस्त पसरल्याने वाहने कोसळत आहेत. या खड्यामुळे अनेक अपघातही घडले आहेत. परंतु यंत्रणा बेफिकीर आहे. रस्ता डागडुजी करणाच्या दुर्लक्षीतपणामुळे गावकरी त्रस्त झाले आहेत. रस्ता डांबरीकरण करण्याची ओरड नागरिक करीत असले तरी यंत्रणेवर आरोप करण्यात येत आहेत.
आंतरजिल्हा मार्ग
भंडारा व गोंदिया जिल्ह्याला जोडणारा मार्ग म्हणूनही वांगी-मांडवी रस्त्याची ओळख आहे. मात्र रस्त्याची डागडूजी करावी ाी पूर्ण रस्ताच नवीन तयार करावा, या विवंचनेत प्रशासन आहे. डागडुजी करण्यात मलिदा जास्त मिळतो तर नवीन बांधकामात फायदा कमी असतो, अशी चर्चा गावात सुरू झाली आहे.