शहरं
Join us  
Trending Stories
1
'या' माशांना वाचवण्यासाठी बांगलादेशनं उतरवलं सैन्य दल; बंगालच्या खाडीत पाठवल्या १७ युद्धनौका
2
‘कोस्टल’वर थेट १४० चा हायस्पीड: ...तर मग गुन्हाच होईल दाखल; वाहतूक पोलिसांकडून दिवसाला ५०० ई-चालानची कारवाई
3
FD करुन तुम्ही कधीही श्रीमंत होणार नाही? CA ने दिला इशारा, म्हणाले खऱ्या कमाईसाठी गुंतवणूक धोरण बदला
4
Video - अरे बापरे! ऑर्डर केला iPhone 16; बॉक्स उघडताच...; ऑनलाईन खरेदीत अजब भानगड
5
Tata Capital IPO: प्रतीक्षा संपली! तुमच्या खिशात आहेत का १४,९९६ रुपये? तर बनू शकता टाटांच्या कंपनीचे प्रॉफिट पार्टनर
6
इवलीशी मुंबई झाली महाकाय ! त्या त्या भागानुसार प्रति स्क्वेअर फुटाचा दर काय... पहाल तर...
7
"प्यार मे सौदेबाजी...", अरबाज खान दुसऱ्यांदा बाबा झाल्यानंतर मलायका अरोराची क्रिप्टिक पोस्ट
8
सोनम वांगचुक यांच्या अटकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, पत्नीने दाखल केली याचिका
9
Kantara Chapter 1: साऊथने पुन्हा एकदा करून दाखवलं! फक्त ४ दिवसांत 'कांतारा'ने कमावले ३०० कोटी
10
पतीच्या मृत्यूनंतर पुन्हा जोडीदाराची इच्छा पडली महागात; मॅट्रिमोनियल साइटवरून शिक्षिकेला कोट्यवधींचा गंडा!
11
Post Office Scheme: दर महिन्याला होईल ₹६१,००० ची कमाई; जबरदस्त आहे ही सरकारी स्कीम, कोट्यधीशही बनवेल
12
Jaipur Hospital Fire: जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
13
Share Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, Nifty २४,९१० च्या वर; सरकारी बँकांच्या शेअर्समध्ये मोठी तेजी
14
Jaipur Hospital Fire: '२० मिनिटांपूर्वी आगीची माहिती दिली, पण डॉक्टर पळून गेले'; SMS रुग्णालयातील प्रत्यक्षदर्शींचा धक्कादायक दावा
15
Video:...तर भारताच्या 'या' खेळाडूला मारायचंय; पाकिस्तानी स्पिनर अबरार अहमदचं विधान चर्चेत
16
पती अन् दोन मुलांना सोडून शेजाऱ्यासोबत सुरू होतं अफेअर; 'ओयो'मध्ये प्रियकर गर्लफ्रेंडसोबत दिसला अन्...
17
या राज्यात ५० किमी वेगाने वारे वाहतील, मुसळधार पाऊस आणि गारपिटीचा इशारा
18
देशातील राष्ट्रीय चलनातून चार शून्य हटवले जाणार; इराणचा ऐतिहासिक निर्णय, काय होणार बदल?
19
उत्खनन क्षेत्रात छत्तीसगडची ऐतिहासिक झेप; खनिज महसूल २५ वर्षांत ३४ पटीने वाढला!
20
त्यानं स्वतःच कापला प्रायव्हेट पार्ट अन् रचला हल्ल्याचा बनाव! पोलिसांना गोंधळात टाकणारा प्रकरणाचा 'असा' झाला खुलासा

करडी परिसरात पाण्यासाठी भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 22:31 IST

करडी परिसर लहान मोठ्या २८ तलावांनी समृद्ध आहे. मात्र, यातील मध्यम प्रकल्पांना अखेरची घरघर लागली आहे. घोटभर पाण्यासाठी दाहीदिशा भटकण्याची वेळ आहे तर लहान तलाव व बोड्यांत पाण्याचा ठणठणाट आहे.

ठळक मुद्देतलाव, बोडी व विहिरी कोरड्या : खोलीकरणासाठी मिळणारा निधी अपुरा

लोकमत न्यूज नेटवर्ककरडी (पालोरा) : करडी परिसर लहान मोठ्या २८ तलावांनी समृद्ध आहे. मात्र, यातील मध्यम प्रकल्पांना अखेरची घरघर लागली आहे. घोटभर पाण्यासाठी दाहीदिशा भटकण्याची वेळ आहे तर लहान तलाव व बोड्यांत पाण्याचा ठणठणाट आहे.भुगर्भातील पाण्याची पातळी खाली गेल्याचा परिणाम म्हणून गावातील पिण्याच्या पाण्याच्या विहिरी कोरड्या पडल्या आहेत. शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेत यावर्षी २० गावांचा समावेश आहे. मात्र तलाव खोलीकरणासाठी मिळणारा निधी ३ ते ६ लाखांचा असल्याने निधी वाढविण्याची मागणी होत आहे. मोहाडी तालुक्याचा करडी परिसर कोका वन्यजीव अभयारण्य व वैनगंगा नदीच्या मध्यभागी वसलेला आहे.वनांनी समृद्ध परिसरात लहान मोठ्या तलावांची संख्या २८ आहे. मात्र, या तलावांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाल्याने पाण्याचा भीषण प्रश्न उद्भवला आहे. खरीपातही सिंचनाची खरीपातही सिंचनाची समस्या वाढली आहे. निव्वळ पिण्याच्या पाण्याचीच नव्हे तर वापराच्या पाण्यासाठी सुद्धा बोंबा बोंब आहे. करडी करडी परिसरात देव्हाडा, नरसिंग टोला, देव्हाडा बुज, निलज खुर्द, निलज बुज, मोहगाव, नवेगाव, दवडीपार, करडी, जांभोरा, किसनपूर, लेंडेझरी, केसलवाडा, खडकी, पालोरा, बोंडे, मुंढरी बुज., मुंढरी खुर्द, कान्हळगाव, बोरगाव, ढिवरवाडा आदी गावात ही तलाव आहेत.कधी न आटणारे केसलवाा, जांभोरा, किसनपूर येथील तलाव अखेरच्या घटका मोजत आहेत. लहान तलाव व बोड्या पाण्याविणा कोरड्या आहेत.या तलावांत मोठ्या प्रमाणात गाळ साचलेला आहे. काही तलावांत शेतकऱ्यांनीच अतिक्रमण केल्याने तलावांचे रूपांतर बोड्यांत झाले आहेत.तर बोड्या नामशेष होण्याच्या मार्गात आहेत. तलावांच्या पोटात मोठ्या प्रमाणात अवैध रेती केली जात आहे. शेतीसाठी तलावांना फोडण्याचे काम होत आहेत. गेट वारंवार लिकेज केल्या जात असल्याने खरीपातच तलावांतील पाणी नाहीसे होते. यावर उपाययोजनांची गरज आहे.गणपती तलावासारखे मॉडेल तलाव तयार कराशासनाचे वतीने जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून सन २०१५-१६ मध्ये परिसरातील ४ गावे जलयुक्त शिवार योजनेत समाविष्ट केली. यात करडी, मोहगाव, देव्हाडा, बोरी, पांजरा गावांचा समावेश आहे. तर करडी गावातील गणपती तलावाला दोन टप्प्यात सुमारे ४० लाखाचा निधी दिला गेला. त्यामुळे तलावाचे योग्य खोलीकरण होवून एक मॉडेल तलाव तयार झाले. आज गणपती तलावातील पाण्याचा दुष्काळ संपला आहे. सन २०१७-१८ मध्ये परिसरातील पालोरा, खडकी, बोंडे, डोंगरदेव, दवडीपार, नवेगाव, जांभळापाणी आदी गावांचा समावेश आहे.जिल्हा परिषदेने अतिक्रमण काढण्यासाठी स्पेशल टिम तयार करून मोजणी केल्यास तलावांना मोकळाश्वास घेता येईल. त्याचबरोबर खोलीकरणासाठी गणपती तलावाच्या धर्तीवर मॉडेल तलाव निर्माणासाठी किमान ३० ते ३५ लाखाचा निधी देणे गरजेचे आहे.-धामदेव वनवे, सरपंच ढिवरवाडा.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई