शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना 'सर्वोच्च' दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून शिक्षेला स्थगिती; आमदारकीही जाणार नाही
2
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
3
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
4
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
5
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
6
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
7
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
8
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
9
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
10
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
11
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
12
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
13
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
14
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
15
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
16
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
17
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
18
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
19
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
20
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
Daily Top 2Weekly Top 5

करडी परिसरात पाण्यासाठी भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 22:31 IST

करडी परिसर लहान मोठ्या २८ तलावांनी समृद्ध आहे. मात्र, यातील मध्यम प्रकल्पांना अखेरची घरघर लागली आहे. घोटभर पाण्यासाठी दाहीदिशा भटकण्याची वेळ आहे तर लहान तलाव व बोड्यांत पाण्याचा ठणठणाट आहे.

ठळक मुद्देतलाव, बोडी व विहिरी कोरड्या : खोलीकरणासाठी मिळणारा निधी अपुरा

लोकमत न्यूज नेटवर्ककरडी (पालोरा) : करडी परिसर लहान मोठ्या २८ तलावांनी समृद्ध आहे. मात्र, यातील मध्यम प्रकल्पांना अखेरची घरघर लागली आहे. घोटभर पाण्यासाठी दाहीदिशा भटकण्याची वेळ आहे तर लहान तलाव व बोड्यांत पाण्याचा ठणठणाट आहे.भुगर्भातील पाण्याची पातळी खाली गेल्याचा परिणाम म्हणून गावातील पिण्याच्या पाण्याच्या विहिरी कोरड्या पडल्या आहेत. शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेत यावर्षी २० गावांचा समावेश आहे. मात्र तलाव खोलीकरणासाठी मिळणारा निधी ३ ते ६ लाखांचा असल्याने निधी वाढविण्याची मागणी होत आहे. मोहाडी तालुक्याचा करडी परिसर कोका वन्यजीव अभयारण्य व वैनगंगा नदीच्या मध्यभागी वसलेला आहे.वनांनी समृद्ध परिसरात लहान मोठ्या तलावांची संख्या २८ आहे. मात्र, या तलावांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाल्याने पाण्याचा भीषण प्रश्न उद्भवला आहे. खरीपातही सिंचनाची खरीपातही सिंचनाची समस्या वाढली आहे. निव्वळ पिण्याच्या पाण्याचीच नव्हे तर वापराच्या पाण्यासाठी सुद्धा बोंबा बोंब आहे. करडी करडी परिसरात देव्हाडा, नरसिंग टोला, देव्हाडा बुज, निलज खुर्द, निलज बुज, मोहगाव, नवेगाव, दवडीपार, करडी, जांभोरा, किसनपूर, लेंडेझरी, केसलवाडा, खडकी, पालोरा, बोंडे, मुंढरी बुज., मुंढरी खुर्द, कान्हळगाव, बोरगाव, ढिवरवाडा आदी गावात ही तलाव आहेत.कधी न आटणारे केसलवाा, जांभोरा, किसनपूर येथील तलाव अखेरच्या घटका मोजत आहेत. लहान तलाव व बोड्या पाण्याविणा कोरड्या आहेत.या तलावांत मोठ्या प्रमाणात गाळ साचलेला आहे. काही तलावांत शेतकऱ्यांनीच अतिक्रमण केल्याने तलावांचे रूपांतर बोड्यांत झाले आहेत.तर बोड्या नामशेष होण्याच्या मार्गात आहेत. तलावांच्या पोटात मोठ्या प्रमाणात अवैध रेती केली जात आहे. शेतीसाठी तलावांना फोडण्याचे काम होत आहेत. गेट वारंवार लिकेज केल्या जात असल्याने खरीपातच तलावांतील पाणी नाहीसे होते. यावर उपाययोजनांची गरज आहे.गणपती तलावासारखे मॉडेल तलाव तयार कराशासनाचे वतीने जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून सन २०१५-१६ मध्ये परिसरातील ४ गावे जलयुक्त शिवार योजनेत समाविष्ट केली. यात करडी, मोहगाव, देव्हाडा, बोरी, पांजरा गावांचा समावेश आहे. तर करडी गावातील गणपती तलावाला दोन टप्प्यात सुमारे ४० लाखाचा निधी दिला गेला. त्यामुळे तलावाचे योग्य खोलीकरण होवून एक मॉडेल तलाव तयार झाले. आज गणपती तलावातील पाण्याचा दुष्काळ संपला आहे. सन २०१७-१८ मध्ये परिसरातील पालोरा, खडकी, बोंडे, डोंगरदेव, दवडीपार, नवेगाव, जांभळापाणी आदी गावांचा समावेश आहे.जिल्हा परिषदेने अतिक्रमण काढण्यासाठी स्पेशल टिम तयार करून मोजणी केल्यास तलावांना मोकळाश्वास घेता येईल. त्याचबरोबर खोलीकरणासाठी गणपती तलावाच्या धर्तीवर मॉडेल तलाव निर्माणासाठी किमान ३० ते ३५ लाखाचा निधी देणे गरजेचे आहे.-धामदेव वनवे, सरपंच ढिवरवाडा.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई