शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
2
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
3
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
4
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
5
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
6
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
7
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
8
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
9
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
10
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
11
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
12
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
13
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
14
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
15
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
16
मीरा- भाईंदर ते गायमुख उन्नत, भुयारी मार्गासाठी एल अँड टी कंपनीकडून अंदाजपत्रक नाहीच 
17
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
18
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
19
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
20
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल

अपघातानंतर प्रशासनाला जाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 01:12 IST

सहा जणांचा अपघातात बळी गेल्यानंतर प्रशासनाला जाग आली. साकोलीपासून अवघ्या तीन किमी अंतरावरील धर्मापुरी कुंभली येथील चुलबंद नदीच्या पुलावरील माती काढून परिसराची साफसफाई करण्यात आली. याचा नेमका अर्थ काय, हे मात्र नागरिकांना उमगले नाही.

ठळक मुद्देसहा जणांचा बळी : चुलबंद नदीवरील पुलाची साफसफाई

लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : सहा जणांचा अपघातात बळी गेल्यानंतर प्रशासनाला जाग आली. साकोलीपासून अवघ्या तीन किमी अंतरावरील धर्मापुरी कुंभली येथील चुलबंद नदीच्या पुलावरील माती काढून परिसराची साफसफाई करण्यात आली. याचा नेमका अर्थ काय, हे मात्र नागरिकांना उमगले नाही.साकोली लाखांदूर राज्य मार्गावर कुंभली येथे चुलबंद नदीवर जुना पुल आहे. या पुलावर काही दिवसांपूर्वी मोठाले खड्डे पडले होते. नागरिकांनी तक्रारी केल्यानंतरही दुर्लक्ष करण्यात आले. विशेष म्हणजे या ठिकाणी मकरसंक्रांतीला दुर्गाबाई डोहाची यात्रा भरते. लाखो लोक येथे येतात. परंतु या पुलाकडे दुर्लक्ष होतो. या पुलाच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात माती साचली आहे. रस्त्याच्या बाजूला झुडपेही वाढली आहेत. त्यामुळे पुलावरून जाताना वाहन चालविणे कठीण झाले होते. परंतु प्रशासनाने दखल घेतली नाही. दोन दिवसापूर्वी काळीपिवळी जीप पुलावरून खाली कोसळली आणि सहा जणांचा बळी गेला. यानंतर प्रशासन खळबडून जागे झाले. दुसऱ्या दिवशी पुलावर असलेली माती, केरकचरा साफ करण्यात आला. पुलाच्या दोन्ही बाजूला असलेला कचरा ट्रॅक्टरच्या सहाय्याने साफ केला. यावरून स्पष्ट होते की, जोपर्यंत कुठलाही अनुचित प्रकार घडत नाही तोपर्यंत प्रशासन जागे होत नाही. या पुलावर गतीरोधकाचीही गरज आहे.पुलाची चौकशी कराकाळीपिवळी अपघातानंतर या पुलाचे दहा ते बारा कठडे तुटले. या पुलाला जोरदार धक्का बसला. त्यामुळे या पुलावर काय परिणाम झाला याची चौकशी करण्याची गरज आहे. समोर पावसाळा आहे. त्यामुळे पुन्हा असा भीषण अपघात होऊ नये म्हणून पुलाची चौकशीची गरज आहे.

टॅग्स :Accidentअपघात