शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अपघातानंतर प्रशासनाला जाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 01:12 IST

सहा जणांचा अपघातात बळी गेल्यानंतर प्रशासनाला जाग आली. साकोलीपासून अवघ्या तीन किमी अंतरावरील धर्मापुरी कुंभली येथील चुलबंद नदीच्या पुलावरील माती काढून परिसराची साफसफाई करण्यात आली. याचा नेमका अर्थ काय, हे मात्र नागरिकांना उमगले नाही.

ठळक मुद्देसहा जणांचा बळी : चुलबंद नदीवरील पुलाची साफसफाई

लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : सहा जणांचा अपघातात बळी गेल्यानंतर प्रशासनाला जाग आली. साकोलीपासून अवघ्या तीन किमी अंतरावरील धर्मापुरी कुंभली येथील चुलबंद नदीच्या पुलावरील माती काढून परिसराची साफसफाई करण्यात आली. याचा नेमका अर्थ काय, हे मात्र नागरिकांना उमगले नाही.साकोली लाखांदूर राज्य मार्गावर कुंभली येथे चुलबंद नदीवर जुना पुल आहे. या पुलावर काही दिवसांपूर्वी मोठाले खड्डे पडले होते. नागरिकांनी तक्रारी केल्यानंतरही दुर्लक्ष करण्यात आले. विशेष म्हणजे या ठिकाणी मकरसंक्रांतीला दुर्गाबाई डोहाची यात्रा भरते. लाखो लोक येथे येतात. परंतु या पुलाकडे दुर्लक्ष होतो. या पुलाच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात माती साचली आहे. रस्त्याच्या बाजूला झुडपेही वाढली आहेत. त्यामुळे पुलावरून जाताना वाहन चालविणे कठीण झाले होते. परंतु प्रशासनाने दखल घेतली नाही. दोन दिवसापूर्वी काळीपिवळी जीप पुलावरून खाली कोसळली आणि सहा जणांचा बळी गेला. यानंतर प्रशासन खळबडून जागे झाले. दुसऱ्या दिवशी पुलावर असलेली माती, केरकचरा साफ करण्यात आला. पुलाच्या दोन्ही बाजूला असलेला कचरा ट्रॅक्टरच्या सहाय्याने साफ केला. यावरून स्पष्ट होते की, जोपर्यंत कुठलाही अनुचित प्रकार घडत नाही तोपर्यंत प्रशासन जागे होत नाही. या पुलावर गतीरोधकाचीही गरज आहे.पुलाची चौकशी कराकाळीपिवळी अपघातानंतर या पुलाचे दहा ते बारा कठडे तुटले. या पुलाला जोरदार धक्का बसला. त्यामुळे या पुलावर काय परिणाम झाला याची चौकशी करण्याची गरज आहे. समोर पावसाळा आहे. त्यामुळे पुन्हा असा भीषण अपघात होऊ नये म्हणून पुलाची चौकशीची गरज आहे.

टॅग्स :Accidentअपघात