शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
4
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
5
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
6
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
7
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
8
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
9
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
10
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
12
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
13
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
14
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
15
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
16
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
17
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
18
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
20
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू

पोलिसांना आयकर, विक्रीकर अहवालाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:33 IST

साकोली : परप्रांतातून स्वस्त तांदूळ विकत घेऊन तो शासनाला अधिक दरात विकण्याच्या प्रकरणाचा भंडाफोड साकोलीजवळ झालेल्या वाटमारीने झाला. आता ...

साकोली : परप्रांतातून स्वस्त तांदूळ विकत घेऊन तो शासनाला अधिक दरात विकण्याच्या प्रकरणाचा भंडाफोड साकोलीजवळ झालेल्या वाटमारीने झाला. आता पोलीस तांदूळ तस्करीच्या दिशेने तपास करीत असून पोलिसांना आयकर, विक्रीकर आणि जीएसटी विभागाच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. एवढेच नाही तर तांदूळ खरेदी आणि विक्री करणाऱ्यांची चौकशी सुरू असल्याची विश्वसनीय माहिती आहे.

साकोली तालुक्यातील पळसगाव ते गोंडउमरी मार्गावर तीन दिवसांपूर्वी २२ लाख ५० हजार रुपयांची वाटमारी झाली होती. तेलंगणामधील रमेश अण्णाचा दिवाणजी माशेट्टी भास्कर याला लुटण्यात आले होते. तो तांदळाच्या पैशाच्या वसुलीसाठी आला होता. वाटमारी प्रकरणाचे धागेदोरे आता थेट तांदूळ तस्करीपर्यंत पोहोचले आहे. पोलिसांनी आठ लुटारूंविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. परंतु, आता तांदूळ तस्करीच्या दृष्टिकोनातूनही पोलीस तपास करीत आहेत.

दोन राईस मिलमालकांनी खरेदी केलेला तांदूळ हा कायद्याची प्रक्रिया पूर्ण करून खरेदी केला आहे काय? की बेकायदेशीर खरेदी केला, याची चौकशी होणे गरजेचे आहे. पोलीस विभागाने जिल्हाधिकारी, आयकर, विक्रीकर तसेच जीएसटी विभागाला पत्र देऊन संबंधित दोन्ही राईस मिलमालकांनी खरेदी केलेल्या तांदळाची चौकशी करून अहवाल सादर करावा, असे पत्र दिल्याची माहिती आहे. त्यामुळे या विभागाकडून पत्र आल्यानंतर हे प्रकरण कोणते वळण घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

धान व्यापाऱ्याचा दिवाणजी माशेट्टी भास्कर याच्या सांगण्यानुसार गोंदियातून पाच लाख व पळसगाव येथील राईस मिल चालकाकडून १८ लाख ५० हजार रुपये घेतले होते. ही नोंद पोलीस ठाण्यातही करण्यात आली. पोलिसांनी आता या दोन राईस मील चालकांसोबतच तेलंगाणातील रमेश अण्णालाही चौकशीसाठी बोलविण्याची तयारी सुरु केली आहे.

बाॅक्स

इतरांचीही होणार चौकशी

वाटमारी प्रकरणानंतर परप्रांतातील तांदळाची तस्करी होते हे उघड झाले. त्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. जिल्हा पुरवठा विभागही खळबळून जागा झाला. हा प्रकार इतरही व्यापारी करीत असल्याचा संशय आहे. त्यामुळे इतरांचीही चौकशी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

बाॅक्स

लाभार्थींकडून केली जाते तांदूळ खरेदी

स्वस्त धान्य दुकानातून लाभार्थींना अत्यल्प दरात तांदूळ दिला जातो. हा तांदूळ लाभार्थी दहा ते बारा रुपये किलोप्रमाणे व्यापाऱ्यांना विकतात. हाच तांदूळ व्यापारी राईस मिलमध्ये पाॅलिश करून शासनाला २४ रुपये किलोप्रमाणे विक्री करतात, असे अनेक व्यापारी जिल्ह्यात आहेत.

बाॅक्स

जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

वाटमारी होऊन तीन दिवसांचा कालावधी लोटला. तांदूळ तस्करीचे प्रकरण पुढे आले. ‘लोकमत’ने याबाबत वृत्तही प्रकाशित केले. पोलिसांनी आपली कारवाई सुरू केली. परंतु, जिल्हा पुरवठा विभागाला अद्यापही जाग आली नसल्याचे दिसत आहे. संबंधित ठिकाणी जाऊन साधी चौकशीही केली नाही.