शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
सारा तेंडुलकर 'या' बॉलिवूड अभिनेत्याला करतेय 'डेट'? दीपिका पदुकोणसोबत दिलेत भरपूर 'किसिंग सीन'
3
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
4
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
5
रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही उत्तरे द्यावीच लागणार, मुख्यमंत्र्यांचे यावर बारीक लक्ष- जयकुमार गोरे
6
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
7
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
8
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
9
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
10
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
11
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
12
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
13
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
14
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
15
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
16
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
17
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
18
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
19
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

वैनगंगा, बावनथडी नद्यांचे पात्र आटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 22:01 IST

बारमाही वाहणाऱ्या वैनगंगा, बावनथडी नद्यांच्या खोºयात असणाºया सिहोरा परिसरात यंदा नद्यांचे पात्र आटल्याने पाणी टंचाईच्या संकटाला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. नदीच्या काठावरील सुकळी नकुल गावात नळाला गढुळ पाणी पुरवठा होत असल्याने पाणीटंचाईची वास्तविकता निदर्शनास येत आहे.

ठळक मुद्देसुकळीत नळाला गढुळ पाणी : गावागावात विहिरींनी गाठला तळ, उन्हाळी धान पिकाचे प्रचंड नुकसान

रंजीत चिंचखेडे।लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : बारमाही वाहणाऱ्या वैनगंगा, बावनथडी नद्यांच्या खोºयात असणाºया सिहोरा परिसरात यंदा नद्यांचे पात्र आटल्याने पाणी टंचाईच्या संकटाला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. नदीच्या काठावरील सुकळी नकुल गावात नळाला गढुळ पाणी पुरवठा होत असल्याने पाणीटंचाईची वास्तविकता निदर्शनास येत आहे.सिहोरा परिसरात वाहणाºया बावनथडी नदीच्या पात्राने दोन महिन्यापुर्वीच पाण्याची चणचण सुरु झाली. या नदीचे पात्र बारमाही वाहणारे नाही. या नदीचे काठावर असणाºया सीमावर्ती आणि मध्यप्रदेशातील गावातील नळ योजनाचे अभिनव जलकुंभ रिकाम्या आहेत. गत दोन महिन्याचे पुर्वीपासून या गावात पाणी टंचाईची झळ नागरिक सोसत आहे. या नळ योजनांना तारण्याकरिता राजीव सागर धरणाचे पाणी सोडण्यात आले असले तरी नदीचे पात्रातच पाणी आटले आहे.राजीव सागर धरणाचे पाणी महिनाभर तहान भागविण्यास असमर्थ ठरले आहे. याच नदीवर सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्प आहे. परंतु या प्रकल्पात साधे पिण्याचे पाणी नाही. १४ हजार शेती ओलीताखाली आणणारा महत्वाकांक्षी प्रकल्प घोटभर पाण्यासाठी त्रस्त झाला आहे. प्रकल्प स्थळात सुरक्षा करणाºया गार्डांना घरुन पिण्याचे पाणी आणावे लागत आहे. प्रकल्प स्थळात भेट देणाºया पर्यटकांना पिण्याचे पाण्यासाठी वनवन भटकंती करावी लागत आहे. परंतु प्रशासन साधे हातपंप खोदकामाला मजुंरी देत नाही. प्रकल्प स्थळात प्रशासनाचे उदासिन धोरणामुळे कृत्रिम पाणीटंचाई सुरु झाली आहे. प्रकल्पाचे स्थळात दिव्याखाली अंधार असे चित्र आहे.वैनगंगा नदी काठावर अनेक पाणीपुरवठा करणाºया योजनाचे पंपगृह आहेत. याच नदीवर धरणाचे बांधकाम करण्यात आले आहे. धरणाच्या पाण्यावर गोंदिया जिल्ह्यातील अदानी वीज प्रकल्प, उपसा सिंचन योजना, तिरोडा आणि तुमसरला पाणी पुरवठा करणाºया नळ योजना आहेत. धरणात पाणी अडविण्यात येत असल्याने नदी काठालगत असणाºया गावातील नळ योजना आणि विहिरींना संजीवनी मिळाली आहे. परंतु महिनाभरापासून वैनगंगा नदीचे विशाल पात्र कोरडे पडले असल्याने विहिरीचे जलस्त्रोत आटले आहे. थेंबभर पाण्यासाठी विशाल पात्र त्रस्त झाले असल्याने सुकळी नकुल गावाचे शिवारातून नदी पात्रातून पायदळ प्रवास सुरु झाला आहे.नदी पात्रात सदैव पाणी राहत असल्याने काठावर सावधानतेचा फलक लावण्यात आला आहे. या फलकाचा कोरड्या पात्रात काही उपयोग नाही. नद्याचे विशाल पात्र आटल्याने विहिरींनी तळ गाठला आहे. याचा फटका थेट उन्हाळी धानाचे पिकांना बसला आहे. पाण्यअभावी एकरातील धानाचे पिक करपले आहे. नदीचे पात्र आटल्यानेच सुकळी नकुल गावात गढुळ पाण्याचा पुरवठा होत असल्याचे सांगण्यात येत आहे. असे असले तरी गावात भिषण पाणी टंचाईचे चित्र सिहोरा परिसरात नाही. नळ योजना गावकऱ्यांची तहान भागवित आहेत.फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणीसुकळी नकुल प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेवर शासनाचे कोट्यावधी रुपये खर्च झाले आहेत. परंतु नागरिकांना घोटभर पाणी मिळाले नाही. या योजनेने मात्र यंत्रणेतील अधिकारी, कर्मचारी तथा कंत्राटदाराचे खिसे भरुन काढले आहे. नागरिकांच्या उपयोगाकरिता योजना तयार करण्यात आली असली तरी निष्क्रियतेमुळे तथा अनियंत्रीत कारभारामुळे पाणी मिळाले नाही. या योजनेत निधीचे वारेन्यारे केल्या प्रकरणी यंत्रणेला जबाबदार धरण्यात काय येवू नये, कार्यकारी अभियंता ते अभियंता तथा अन्य कर्मचाºयावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी आता सरंपच करीत आहेत.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईriverनदी