शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये पावसाचा हाहाकार, दार्जिलिंगमध्ये पूल कोसळला, 6 जणांचा मृत्यू; बघा Video 
2
पुण्यात NCP शरद पवार गटाच्या आमदाराला मारहाण; सत्ताधारी अजित पवारांच्या समर्थकांसोबत वाद
3
गेल्या ७ वर्षात किती वाढला भारतीयांचा पगार?; सरकारी रिपोर्टमधील आकडेवारी पाहून व्हाल हैराण
4
Napal Landslide: निसर्ग कोपला! नेपाळमध्ये ढगफुटी, भूस्खलनामुळे २२ जणांचा मृत्यू, विमानतळं महामार्ग बंद
5
केजरीवालांनी खासदार होणं टाळलं! उद्योगपती राजिंदर गुप्तांना राज्यसभेचे तिकीट, गुप्तांबद्दल जाणून घ्या
6
विषारी 'Coldrif' कफ सिरपने घेतला 14 बालकांचा जीव; महाराष्ट्रासह 6 राज्यांमध्ये तपास सुरू
7
नकाशावरून भारताचा इशारा, आता पाकिस्तानी सैन्यानं दिली पोकळ धमकी: "यापुढे युद्ध झालं तर..."
8
३० वर्षांचे गृहकर्ज होईल व्याजमुक्त; फक्त 'इतकी' SIP सुरू करा आणि व्याजापेक्षा जास्त पैसे कमवा
9
अमेरिकन कंपनीनं अचानक नोकरीवरून काढलं; युवकाचं ६ महिन्यातच नशीब पालटलं, महिन्याला ४४ लाख कमाई
10
अमित शाहांची रणनीती, बंद दाराआड पाऊण तास खलबतं; CM फडणवीस अन् दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा
11
स्वामी चैतन्यानंदचे सोशल मीडियावरही 'चाळे'; मुलींच्या फोटोंवर कमेंट्स, स्क्रीनशॉट्स व्हायरल
12
४४ वर्षांपूर्वी 'या' बँकेने जारी केलं होतं पहिलं क्रेडिट कार्ड! आता देशभरात किती लोक वापरतात?
13
दिल्लीत केनियाचा खेळाडू आणि दोन प्रशिक्षकांवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; भाजप म्हणतेय... 'कलंक'
14
6 लाखांपेक्षाही खाली आली Maruti Baleno ची किंमत, GST कपातीशिवायही मिळतोय ढासू डिस्काउंट 
15
इतकी मोठी झाली उर्मिला-आदिनाथ कोठारेची लेक जिजा, दिसायला आहे आईची कार्बन कॉपी
16
राधाकिशन दमानींच्या DMart चा दुसऱ्या तिमाहीत महसूल वाढीचा धमाका; शेअरवर 'फोकस' वाढणार?
17
आता मिसाइल, दारूगोळा अन् शस्त्रास्त्र खासगी कंपन्या बनवणार; संरक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय
18
IND W vs PAK W Live Streaming: भारतीय 'रन'रागिणींचा दबदबा; पाक महिला संघ कधीच नाही जिंकला!
19
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
20
चालतंय तोवर चालवायचं असं तो वागला नाही; मग तुम्ही एवढी घाई का केली? कैफचा आगरकरांना सवाल

वैनगंगा, बावनथडी नद्यांचे पात्र आटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 22:01 IST

बारमाही वाहणाऱ्या वैनगंगा, बावनथडी नद्यांच्या खोºयात असणाºया सिहोरा परिसरात यंदा नद्यांचे पात्र आटल्याने पाणी टंचाईच्या संकटाला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. नदीच्या काठावरील सुकळी नकुल गावात नळाला गढुळ पाणी पुरवठा होत असल्याने पाणीटंचाईची वास्तविकता निदर्शनास येत आहे.

ठळक मुद्देसुकळीत नळाला गढुळ पाणी : गावागावात विहिरींनी गाठला तळ, उन्हाळी धान पिकाचे प्रचंड नुकसान

रंजीत चिंचखेडे।लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : बारमाही वाहणाऱ्या वैनगंगा, बावनथडी नद्यांच्या खोºयात असणाºया सिहोरा परिसरात यंदा नद्यांचे पात्र आटल्याने पाणी टंचाईच्या संकटाला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. नदीच्या काठावरील सुकळी नकुल गावात नळाला गढुळ पाणी पुरवठा होत असल्याने पाणीटंचाईची वास्तविकता निदर्शनास येत आहे.सिहोरा परिसरात वाहणाºया बावनथडी नदीच्या पात्राने दोन महिन्यापुर्वीच पाण्याची चणचण सुरु झाली. या नदीचे पात्र बारमाही वाहणारे नाही. या नदीचे काठावर असणाºया सीमावर्ती आणि मध्यप्रदेशातील गावातील नळ योजनाचे अभिनव जलकुंभ रिकाम्या आहेत. गत दोन महिन्याचे पुर्वीपासून या गावात पाणी टंचाईची झळ नागरिक सोसत आहे. या नळ योजनांना तारण्याकरिता राजीव सागर धरणाचे पाणी सोडण्यात आले असले तरी नदीचे पात्रातच पाणी आटले आहे.राजीव सागर धरणाचे पाणी महिनाभर तहान भागविण्यास असमर्थ ठरले आहे. याच नदीवर सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्प आहे. परंतु या प्रकल्पात साधे पिण्याचे पाणी नाही. १४ हजार शेती ओलीताखाली आणणारा महत्वाकांक्षी प्रकल्प घोटभर पाण्यासाठी त्रस्त झाला आहे. प्रकल्प स्थळात सुरक्षा करणाºया गार्डांना घरुन पिण्याचे पाणी आणावे लागत आहे. प्रकल्प स्थळात भेट देणाºया पर्यटकांना पिण्याचे पाण्यासाठी वनवन भटकंती करावी लागत आहे. परंतु प्रशासन साधे हातपंप खोदकामाला मजुंरी देत नाही. प्रकल्प स्थळात प्रशासनाचे उदासिन धोरणामुळे कृत्रिम पाणीटंचाई सुरु झाली आहे. प्रकल्पाचे स्थळात दिव्याखाली अंधार असे चित्र आहे.वैनगंगा नदी काठावर अनेक पाणीपुरवठा करणाºया योजनाचे पंपगृह आहेत. याच नदीवर धरणाचे बांधकाम करण्यात आले आहे. धरणाच्या पाण्यावर गोंदिया जिल्ह्यातील अदानी वीज प्रकल्प, उपसा सिंचन योजना, तिरोडा आणि तुमसरला पाणी पुरवठा करणाºया नळ योजना आहेत. धरणात पाणी अडविण्यात येत असल्याने नदी काठालगत असणाºया गावातील नळ योजना आणि विहिरींना संजीवनी मिळाली आहे. परंतु महिनाभरापासून वैनगंगा नदीचे विशाल पात्र कोरडे पडले असल्याने विहिरीचे जलस्त्रोत आटले आहे. थेंबभर पाण्यासाठी विशाल पात्र त्रस्त झाले असल्याने सुकळी नकुल गावाचे शिवारातून नदी पात्रातून पायदळ प्रवास सुरु झाला आहे.नदी पात्रात सदैव पाणी राहत असल्याने काठावर सावधानतेचा फलक लावण्यात आला आहे. या फलकाचा कोरड्या पात्रात काही उपयोग नाही. नद्याचे विशाल पात्र आटल्याने विहिरींनी तळ गाठला आहे. याचा फटका थेट उन्हाळी धानाचे पिकांना बसला आहे. पाण्यअभावी एकरातील धानाचे पिक करपले आहे. नदीचे पात्र आटल्यानेच सुकळी नकुल गावात गढुळ पाण्याचा पुरवठा होत असल्याचे सांगण्यात येत आहे. असे असले तरी गावात भिषण पाणी टंचाईचे चित्र सिहोरा परिसरात नाही. नळ योजना गावकऱ्यांची तहान भागवित आहेत.फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणीसुकळी नकुल प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेवर शासनाचे कोट्यावधी रुपये खर्च झाले आहेत. परंतु नागरिकांना घोटभर पाणी मिळाले नाही. या योजनेने मात्र यंत्रणेतील अधिकारी, कर्मचारी तथा कंत्राटदाराचे खिसे भरुन काढले आहे. नागरिकांच्या उपयोगाकरिता योजना तयार करण्यात आली असली तरी निष्क्रियतेमुळे तथा अनियंत्रीत कारभारामुळे पाणी मिळाले नाही. या योजनेत निधीचे वारेन्यारे केल्या प्रकरणी यंत्रणेला जबाबदार धरण्यात काय येवू नये, कार्यकारी अभियंता ते अभियंता तथा अन्य कर्मचाºयावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी आता सरंपच करीत आहेत.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईriverनदी