शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
2
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
3
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
4
तुझ्या भेटीची लागली आस... विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोड, चंद्रभागा वाळवंट परिसरात वैष्णवांची मांदियाळी
5
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
6
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश
7
मतदान केंद्र निश्चितीचे निवडणूक आयोगाचे आदेश; राजकीय पक्षांच्या बैठका घेण्याचीही अधिकाऱ्यांना सूचना
8
बारसे आटोपून निघाले, ‘समृद्धी’वर ४ ठार; सर्व मृत एकाच कुटुंबातील; चालकाची डुलकी जीवघेणी
9
वाहतूकदारांचा संप मागे; ८० टक्के मागण्या मान्य, ई-चलानचा दंड तसेच ९० दिवसांपेक्षा जास्त जुने चलानही रद्द
10
उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींची पदे भरण्यास सर्वोच्च न्यायालय प्रयत्नशील : सरन्यायाधीश गवई
11
कांदळवनांचा अडथळा; पुनर्विचार याचिका करणार, वनमंत्री गणेश नाईक यांची माहिती; सर्वेक्षणातून समजणार अचूक क्षेत्रफळ
12
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
13
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
14
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
15
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
16
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
17
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
18
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
19
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी

वैनगंगा, बावनथडी नद्यांचे पात्र आटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 22:01 IST

बारमाही वाहणाऱ्या वैनगंगा, बावनथडी नद्यांच्या खोºयात असणाºया सिहोरा परिसरात यंदा नद्यांचे पात्र आटल्याने पाणी टंचाईच्या संकटाला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. नदीच्या काठावरील सुकळी नकुल गावात नळाला गढुळ पाणी पुरवठा होत असल्याने पाणीटंचाईची वास्तविकता निदर्शनास येत आहे.

ठळक मुद्देसुकळीत नळाला गढुळ पाणी : गावागावात विहिरींनी गाठला तळ, उन्हाळी धान पिकाचे प्रचंड नुकसान

रंजीत चिंचखेडे।लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : बारमाही वाहणाऱ्या वैनगंगा, बावनथडी नद्यांच्या खोºयात असणाºया सिहोरा परिसरात यंदा नद्यांचे पात्र आटल्याने पाणी टंचाईच्या संकटाला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. नदीच्या काठावरील सुकळी नकुल गावात नळाला गढुळ पाणी पुरवठा होत असल्याने पाणीटंचाईची वास्तविकता निदर्शनास येत आहे.सिहोरा परिसरात वाहणाºया बावनथडी नदीच्या पात्राने दोन महिन्यापुर्वीच पाण्याची चणचण सुरु झाली. या नदीचे पात्र बारमाही वाहणारे नाही. या नदीचे काठावर असणाºया सीमावर्ती आणि मध्यप्रदेशातील गावातील नळ योजनाचे अभिनव जलकुंभ रिकाम्या आहेत. गत दोन महिन्याचे पुर्वीपासून या गावात पाणी टंचाईची झळ नागरिक सोसत आहे. या नळ योजनांना तारण्याकरिता राजीव सागर धरणाचे पाणी सोडण्यात आले असले तरी नदीचे पात्रातच पाणी आटले आहे.राजीव सागर धरणाचे पाणी महिनाभर तहान भागविण्यास असमर्थ ठरले आहे. याच नदीवर सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्प आहे. परंतु या प्रकल्पात साधे पिण्याचे पाणी नाही. १४ हजार शेती ओलीताखाली आणणारा महत्वाकांक्षी प्रकल्प घोटभर पाण्यासाठी त्रस्त झाला आहे. प्रकल्प स्थळात सुरक्षा करणाºया गार्डांना घरुन पिण्याचे पाणी आणावे लागत आहे. प्रकल्प स्थळात भेट देणाºया पर्यटकांना पिण्याचे पाण्यासाठी वनवन भटकंती करावी लागत आहे. परंतु प्रशासन साधे हातपंप खोदकामाला मजुंरी देत नाही. प्रकल्प स्थळात प्रशासनाचे उदासिन धोरणामुळे कृत्रिम पाणीटंचाई सुरु झाली आहे. प्रकल्पाचे स्थळात दिव्याखाली अंधार असे चित्र आहे.वैनगंगा नदी काठावर अनेक पाणीपुरवठा करणाºया योजनाचे पंपगृह आहेत. याच नदीवर धरणाचे बांधकाम करण्यात आले आहे. धरणाच्या पाण्यावर गोंदिया जिल्ह्यातील अदानी वीज प्रकल्प, उपसा सिंचन योजना, तिरोडा आणि तुमसरला पाणी पुरवठा करणाºया नळ योजना आहेत. धरणात पाणी अडविण्यात येत असल्याने नदी काठालगत असणाºया गावातील नळ योजना आणि विहिरींना संजीवनी मिळाली आहे. परंतु महिनाभरापासून वैनगंगा नदीचे विशाल पात्र कोरडे पडले असल्याने विहिरीचे जलस्त्रोत आटले आहे. थेंबभर पाण्यासाठी विशाल पात्र त्रस्त झाले असल्याने सुकळी नकुल गावाचे शिवारातून नदी पात्रातून पायदळ प्रवास सुरु झाला आहे.नदी पात्रात सदैव पाणी राहत असल्याने काठावर सावधानतेचा फलक लावण्यात आला आहे. या फलकाचा कोरड्या पात्रात काही उपयोग नाही. नद्याचे विशाल पात्र आटल्याने विहिरींनी तळ गाठला आहे. याचा फटका थेट उन्हाळी धानाचे पिकांना बसला आहे. पाण्यअभावी एकरातील धानाचे पिक करपले आहे. नदीचे पात्र आटल्यानेच सुकळी नकुल गावात गढुळ पाण्याचा पुरवठा होत असल्याचे सांगण्यात येत आहे. असे असले तरी गावात भिषण पाणी टंचाईचे चित्र सिहोरा परिसरात नाही. नळ योजना गावकऱ्यांची तहान भागवित आहेत.फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणीसुकळी नकुल प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेवर शासनाचे कोट्यावधी रुपये खर्च झाले आहेत. परंतु नागरिकांना घोटभर पाणी मिळाले नाही. या योजनेने मात्र यंत्रणेतील अधिकारी, कर्मचारी तथा कंत्राटदाराचे खिसे भरुन काढले आहे. नागरिकांच्या उपयोगाकरिता योजना तयार करण्यात आली असली तरी निष्क्रियतेमुळे तथा अनियंत्रीत कारभारामुळे पाणी मिळाले नाही. या योजनेत निधीचे वारेन्यारे केल्या प्रकरणी यंत्रणेला जबाबदार धरण्यात काय येवू नये, कार्यकारी अभियंता ते अभियंता तथा अन्य कर्मचाºयावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी आता सरंपच करीत आहेत.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईriverनदी