शहरं
Join us  
Trending Stories
1
Ambernath Accident: अंबरनाथमध्ये निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिंदेसेनेच्या उमेदवाराच्या कारला अपघात, ४ ठार!
2
पत्नीही हवाई दलात पायलट, दुबई एअर शोमधील तेजसच्या शहीद पायलटचे लग्नही दुबईलाच झालेले...
3
IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय...
4
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
5
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
6
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
7
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
8
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
9
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
10
Video: अंबरनाथच्या उड्डाण पुलावर भीषण अपघात; कारने बाईकस्वार तिघांना उडवले, चौघांचा मृत्यू
11
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
12
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
13
उद्धव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत बडा नेत्याच्या हाती शिवबंधन
14
IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल
15
“मालेगाव प्रकरणी आरोपीला फाशी द्या, राज्यात महिला मुलींची सुरक्षा रामभरोसे”: हर्षवर्धन सपकाळ
16
बिहारमध्ये भाजपाचा डाव! नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं पण, गृहमंत्रीपद स्वतः कडे ठेवले, २० वर्षांनंतर खाते सोडले
17
कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! "सर्व १४० आमदार माझ्यासोबत", डी. के. शिवकुमार यांचे थेट विधान
18
तुम्हाला तुमची गाडी खूपच प्यारी आहे...! २० वर्षांहून जुन्या वाहनांच्या फिटनेस टेस्ट शुल्कात १५ पट वाढ
19
स्लीपर वंदे भारत देशभर फिरवली, ट्रायलनंतर परत पाठवली; ५ फॉल्ट समोर आले, लोकार्पण लांबणार?
20
फेस्टीव्ह संपला नाही तोच...! फ्लिपकार्ट 'ब्लॅक फ्रायडे सेल २०२५' ची तारीख ठरली, अमेझॉन थांबतेय होय...
Daily Top 2Weekly Top 5

वैनगंगा, बावनथडी नद्यांचे पात्र आटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 22:01 IST

बारमाही वाहणाऱ्या वैनगंगा, बावनथडी नद्यांच्या खोºयात असणाºया सिहोरा परिसरात यंदा नद्यांचे पात्र आटल्याने पाणी टंचाईच्या संकटाला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. नदीच्या काठावरील सुकळी नकुल गावात नळाला गढुळ पाणी पुरवठा होत असल्याने पाणीटंचाईची वास्तविकता निदर्शनास येत आहे.

ठळक मुद्देसुकळीत नळाला गढुळ पाणी : गावागावात विहिरींनी गाठला तळ, उन्हाळी धान पिकाचे प्रचंड नुकसान

रंजीत चिंचखेडे।लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : बारमाही वाहणाऱ्या वैनगंगा, बावनथडी नद्यांच्या खोºयात असणाºया सिहोरा परिसरात यंदा नद्यांचे पात्र आटल्याने पाणी टंचाईच्या संकटाला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. नदीच्या काठावरील सुकळी नकुल गावात नळाला गढुळ पाणी पुरवठा होत असल्याने पाणीटंचाईची वास्तविकता निदर्शनास येत आहे.सिहोरा परिसरात वाहणाºया बावनथडी नदीच्या पात्राने दोन महिन्यापुर्वीच पाण्याची चणचण सुरु झाली. या नदीचे पात्र बारमाही वाहणारे नाही. या नदीचे काठावर असणाºया सीमावर्ती आणि मध्यप्रदेशातील गावातील नळ योजनाचे अभिनव जलकुंभ रिकाम्या आहेत. गत दोन महिन्याचे पुर्वीपासून या गावात पाणी टंचाईची झळ नागरिक सोसत आहे. या नळ योजनांना तारण्याकरिता राजीव सागर धरणाचे पाणी सोडण्यात आले असले तरी नदीचे पात्रातच पाणी आटले आहे.राजीव सागर धरणाचे पाणी महिनाभर तहान भागविण्यास असमर्थ ठरले आहे. याच नदीवर सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्प आहे. परंतु या प्रकल्पात साधे पिण्याचे पाणी नाही. १४ हजार शेती ओलीताखाली आणणारा महत्वाकांक्षी प्रकल्प घोटभर पाण्यासाठी त्रस्त झाला आहे. प्रकल्प स्थळात सुरक्षा करणाºया गार्डांना घरुन पिण्याचे पाणी आणावे लागत आहे. प्रकल्प स्थळात भेट देणाºया पर्यटकांना पिण्याचे पाण्यासाठी वनवन भटकंती करावी लागत आहे. परंतु प्रशासन साधे हातपंप खोदकामाला मजुंरी देत नाही. प्रकल्प स्थळात प्रशासनाचे उदासिन धोरणामुळे कृत्रिम पाणीटंचाई सुरु झाली आहे. प्रकल्पाचे स्थळात दिव्याखाली अंधार असे चित्र आहे.वैनगंगा नदी काठावर अनेक पाणीपुरवठा करणाºया योजनाचे पंपगृह आहेत. याच नदीवर धरणाचे बांधकाम करण्यात आले आहे. धरणाच्या पाण्यावर गोंदिया जिल्ह्यातील अदानी वीज प्रकल्प, उपसा सिंचन योजना, तिरोडा आणि तुमसरला पाणी पुरवठा करणाºया नळ योजना आहेत. धरणात पाणी अडविण्यात येत असल्याने नदी काठालगत असणाºया गावातील नळ योजना आणि विहिरींना संजीवनी मिळाली आहे. परंतु महिनाभरापासून वैनगंगा नदीचे विशाल पात्र कोरडे पडले असल्याने विहिरीचे जलस्त्रोत आटले आहे. थेंबभर पाण्यासाठी विशाल पात्र त्रस्त झाले असल्याने सुकळी नकुल गावाचे शिवारातून नदी पात्रातून पायदळ प्रवास सुरु झाला आहे.नदी पात्रात सदैव पाणी राहत असल्याने काठावर सावधानतेचा फलक लावण्यात आला आहे. या फलकाचा कोरड्या पात्रात काही उपयोग नाही. नद्याचे विशाल पात्र आटल्याने विहिरींनी तळ गाठला आहे. याचा फटका थेट उन्हाळी धानाचे पिकांना बसला आहे. पाण्यअभावी एकरातील धानाचे पिक करपले आहे. नदीचे पात्र आटल्यानेच सुकळी नकुल गावात गढुळ पाण्याचा पुरवठा होत असल्याचे सांगण्यात येत आहे. असे असले तरी गावात भिषण पाणी टंचाईचे चित्र सिहोरा परिसरात नाही. नळ योजना गावकऱ्यांची तहान भागवित आहेत.फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणीसुकळी नकुल प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेवर शासनाचे कोट्यावधी रुपये खर्च झाले आहेत. परंतु नागरिकांना घोटभर पाणी मिळाले नाही. या योजनेने मात्र यंत्रणेतील अधिकारी, कर्मचारी तथा कंत्राटदाराचे खिसे भरुन काढले आहे. नागरिकांच्या उपयोगाकरिता योजना तयार करण्यात आली असली तरी निष्क्रियतेमुळे तथा अनियंत्रीत कारभारामुळे पाणी मिळाले नाही. या योजनेत निधीचे वारेन्यारे केल्या प्रकरणी यंत्रणेला जबाबदार धरण्यात काय येवू नये, कार्यकारी अभियंता ते अभियंता तथा अन्य कर्मचाºयावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी आता सरंपच करीत आहेत.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईriverनदी