शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
5
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
6
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
7
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
8
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
9
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
10
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
11
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
12
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
14
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
15
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
16
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
17
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
18
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
19
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
20
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश

नाग नदीच्या दूषित पाण्याचा १८६ गावांना बसतो फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2019 00:40 IST

नाग नदीचे प्रदूषित पाणी वैनगंगा नदीत मिसळत असल्याने पाणी प्रदूषणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. वैनगंगा तिरावरील १८६ गावांना याचा फटका बसत असून जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या भंडारा शहरातही नागरिकांना हेच रसायनयुक्त दूषित पाणी प्राशन करावे लागत आहे.

ठळक मुद्देभंडाऱ्यात दूषित पाणी : रसायनयुक्त पाण्याने आजार बळावले

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : नाग नदीचे प्रदूषित पाणी वैनगंगा नदीत मिसळत असल्याने पाणी प्रदूषणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. वैनगंगा तिरावरील १८६ गावांना याचा फटका बसत असून जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या भंडारा शहरातही नागरिकांना हेच रसायनयुक्त दूषित पाणी प्राशन करावे लागत आहे. त्यामुळे आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.नागपूर शहरातील प्रदूषित पाणी नाग नदीद्वारे वाहून येते. नागनदीत आंभोराजवळ वैनगंगा नदीला मिळते. गोसे प्रकल्पानंतर नाग नदीचे पाणी बॅक वॉटरमध्ये मोठ्या प्रमाणात संग्रहित होते. प्रदूषित पाण्यामुळे वैनगंगेचे पाणीही दूषित झाले आहे. नागनदी नागपूर शहरातील गटाराचे पाणी वाहून आणते. तसेच विविध कारखान्यांचे रसायनयुक्त पाणीही असते. त्यामुळे वैनगंगा नदी गत काही वर्षांपासून दूषित होत आहे. या दूषित पाणी प्राशनाने त्वचारोग, पोटाचे आजार, डायरिया आदी रोगांची लागण नदीतिरांवरील गावांमध्ये दिसून येत आहे.नागनदीच्या शुद्धीकरणासंदर्भात पर्यावरण प्रेमींनी अनेकदा आवाज उठविला. परंतु अद्यापही नाग नदीचे दूषित पाणी येणे थांबले नाही. या दूषित पाण्यामुळे विविध गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत.प्रदूषित पाण्यातील मासोळी सेवनाने आजाराची शक्यता आहे. ढिवर समाजाच्या व्यवसायावरही याचा परिणाम झाला आहे. विशेष म्हणजे वैनगंगेचे पाणी सिंचनासाठी मोठ्या प्रमाणात सोडले जाते. यामुळे शेतीपिकांच्या माध्यमातून रासायनिक घटक नागरिकांपर्यंत पोहचण्याची भीती निर्माण झाली आहे. भंडारा शहरातही नळावाटे प्रदूषित पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना विविध आजारांना तोंड द्यावे लागत आहे. प्रदूषित विषारी पाण्यापासून नागरिकांचा बचाव करण्यासाठी नाग नदी शुद्धीकरण मोहीम राबविण्याची गरज आहे. परंतु राजकीय ईच्छाशक्तीचा अभाव दिसतो.प्रदूषण रोखण्यासाठी उपायांची गरजनागपूर शहरातून येणारे प्रदूषित पाणी रोखण्यासाठी नागपूर महानगरपालिकेने प्रदूषण निर्मूलन प्रोजेक्ट तयार करण्याची गरज आहे. नाग नदीवर छोटे बंधारे बांधून दूषित पाणी शुद्ध करूनच सोडण्याची आवश्यकता आहे. क्रिस्टल प्रक्रिया करून पाणी सोडावे अशी मागणी आहे. किंवा वैनगंगा नदीला प्रदूषित करणाऱ्या नाग नदीचा प्रवाह इतरत्र वळविण्याची मागणी होत आहे.केंद्रीय मंत्र्यांना निवेदननाग नदीच्या प्रदूषणाबाबत वैनगंगा जलप्रदूषण निर्मूलन समितीने केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांना निवेदन दिले आहे. या निवेदनात वैनगंगेच्या जलप्रदूषणाचा स्तर नेमका किती आहे याची तपासणी करावी. प्रभूषण बोर्ड भंडारा येथे सुरु करावा, नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा योजना आहे परंतु जलप्रदूषण रोखण्यासाठी कोणत्याही उपाययोजना केल्या नाही. राज्यशासनाने यावर योग्य निर्णय घ्यावा अशी मागणी समितीचे अध्यक्ष सत्तार खान यांनी केली आहे.

टॅग्स :riverनदी