शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
2
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
3
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
4
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
5
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
6
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
7
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
8
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
9
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
10
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
11
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
12
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
13
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
14
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
15
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
16
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
17
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
18
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
19
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
20
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं

नाग नदीच्या दूषित पाण्याचा १८६ गावांना बसतो फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2019 00:40 IST

नाग नदीचे प्रदूषित पाणी वैनगंगा नदीत मिसळत असल्याने पाणी प्रदूषणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. वैनगंगा तिरावरील १८६ गावांना याचा फटका बसत असून जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या भंडारा शहरातही नागरिकांना हेच रसायनयुक्त दूषित पाणी प्राशन करावे लागत आहे.

ठळक मुद्देभंडाऱ्यात दूषित पाणी : रसायनयुक्त पाण्याने आजार बळावले

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : नाग नदीचे प्रदूषित पाणी वैनगंगा नदीत मिसळत असल्याने पाणी प्रदूषणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. वैनगंगा तिरावरील १८६ गावांना याचा फटका बसत असून जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या भंडारा शहरातही नागरिकांना हेच रसायनयुक्त दूषित पाणी प्राशन करावे लागत आहे. त्यामुळे आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.नागपूर शहरातील प्रदूषित पाणी नाग नदीद्वारे वाहून येते. नागनदीत आंभोराजवळ वैनगंगा नदीला मिळते. गोसे प्रकल्पानंतर नाग नदीचे पाणी बॅक वॉटरमध्ये मोठ्या प्रमाणात संग्रहित होते. प्रदूषित पाण्यामुळे वैनगंगेचे पाणीही दूषित झाले आहे. नागनदी नागपूर शहरातील गटाराचे पाणी वाहून आणते. तसेच विविध कारखान्यांचे रसायनयुक्त पाणीही असते. त्यामुळे वैनगंगा नदी गत काही वर्षांपासून दूषित होत आहे. या दूषित पाणी प्राशनाने त्वचारोग, पोटाचे आजार, डायरिया आदी रोगांची लागण नदीतिरांवरील गावांमध्ये दिसून येत आहे.नागनदीच्या शुद्धीकरणासंदर्भात पर्यावरण प्रेमींनी अनेकदा आवाज उठविला. परंतु अद्यापही नाग नदीचे दूषित पाणी येणे थांबले नाही. या दूषित पाण्यामुळे विविध गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत.प्रदूषित पाण्यातील मासोळी सेवनाने आजाराची शक्यता आहे. ढिवर समाजाच्या व्यवसायावरही याचा परिणाम झाला आहे. विशेष म्हणजे वैनगंगेचे पाणी सिंचनासाठी मोठ्या प्रमाणात सोडले जाते. यामुळे शेतीपिकांच्या माध्यमातून रासायनिक घटक नागरिकांपर्यंत पोहचण्याची भीती निर्माण झाली आहे. भंडारा शहरातही नळावाटे प्रदूषित पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना विविध आजारांना तोंड द्यावे लागत आहे. प्रदूषित विषारी पाण्यापासून नागरिकांचा बचाव करण्यासाठी नाग नदी शुद्धीकरण मोहीम राबविण्याची गरज आहे. परंतु राजकीय ईच्छाशक्तीचा अभाव दिसतो.प्रदूषण रोखण्यासाठी उपायांची गरजनागपूर शहरातून येणारे प्रदूषित पाणी रोखण्यासाठी नागपूर महानगरपालिकेने प्रदूषण निर्मूलन प्रोजेक्ट तयार करण्याची गरज आहे. नाग नदीवर छोटे बंधारे बांधून दूषित पाणी शुद्ध करूनच सोडण्याची आवश्यकता आहे. क्रिस्टल प्रक्रिया करून पाणी सोडावे अशी मागणी आहे. किंवा वैनगंगा नदीला प्रदूषित करणाऱ्या नाग नदीचा प्रवाह इतरत्र वळविण्याची मागणी होत आहे.केंद्रीय मंत्र्यांना निवेदननाग नदीच्या प्रदूषणाबाबत वैनगंगा जलप्रदूषण निर्मूलन समितीने केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांना निवेदन दिले आहे. या निवेदनात वैनगंगेच्या जलप्रदूषणाचा स्तर नेमका किती आहे याची तपासणी करावी. प्रभूषण बोर्ड भंडारा येथे सुरु करावा, नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा योजना आहे परंतु जलप्रदूषण रोखण्यासाठी कोणत्याही उपाययोजना केल्या नाही. राज्यशासनाने यावर योग्य निर्णय घ्यावा अशी मागणी समितीचे अध्यक्ष सत्तार खान यांनी केली आहे.

टॅग्स :riverनदी