शहरं
Join us  
Trending Stories
1
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
2
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
5
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
6
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
7
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
8
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
9
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
10
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
15
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
16
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
19
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
20
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे

विदर्भात राष्ट्रवादीची ताकद वाढलेली दिसेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2018 22:17 IST

राष्ट्रवादी काँग्रेसची पश्चिम महाराष्ट्रात पुर्वीपासून ताकद आहे. आता विदर्भातही राष्ट्रवादीची ताकद आगामी निवडणुकीत वाढलेली दिसेल आणि राष्ट्रवादी महाराष्ट्र क्रमांक एकचा पक्ष राहील, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार अ‍ॅड. जयदेव गायकवाड यांनी येथे पत्रकार परिषदेत केला.

ठळक मुद्देजयदेव गायकवाड : राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचा दावा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : राष्ट्रवादी काँग्रेसची पश्चिम महाराष्ट्रात पुर्वीपासून ताकद आहे. आता विदर्भातही राष्ट्रवादीची ताकद आगामी निवडणुकीत वाढलेली दिसेल आणि राष्ट्रवादी महाराष्ट्र क्रमांक एकचा पक्ष राहील, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार अ‍ॅड. जयदेव गायकवाड यांनी येथे पत्रकार परिषदेत केला.राष्ट्रवादी काँग्रेसच्या सामाजिक न्याय विभागातर्फे विदर्भ दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या दौºयांतर्गत प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड. गायकवाड भंडारा येथे आले असता येथील विश्राम भवनावर ते पत्रकारांशी बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मायावी चेहरा आहे. त्यांचा खरा चेहरा संघाचा आहे. यावरून बाबासाहेब आंबेडकरांबद्दल प्रेमाचा आव आणत असले तरी चार वर्षात इंदू मिल येथील बाबासाहेबांच्या स्मारकाच्या जागेवर साधी विटही लागली नाही. ही सर्वसामान्य जनतेच्या डोळ्यात धूळफेक असल्याचे त्यांनी सांगितले. जंतर मंतरवर राज्यघटनेची झालेली होळीही ६८ वर्षात पहिलीच घटना होती. या घटनेनंतर जबाबदार मंत्र्यांनी बेजाबाबदारीचे वक्तव्य केले. घटनेबाबत त्यांची भूमिका विचारी असल्याचे त्यांनी सांगितले. भाजपा सरकारने नोटबंदी करून देशाला आर्थिक मंदीच्या खाईत लोटले आहे. याचा बदला आगामी निवडणुकात घेतला जाईल. पेट्रोल दरवाढीने अनेक प्रश्न निर्माण झाले असून सर्वसामान्य जनता हवालदिल आहे. आता देशातील शेतकरी निवडणुकांची प्रतिक्षा करीत असून त्यात सरकारचा हिशेब चुकता करेल, असे त्यांनी सांगितले.यावेळी खासदार मधुकर कुकडे, प्रदेश उपाध्यक्ष पंडित कांबळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव धनंजय दलाल, जिल्हाध्यक्ष डॉ. रवींद्र वानखडे उपस्थित होते.