वरठी-भंडारा महामार्ग ठरतोय जीवघेणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2020 05:00 IST2020-07-22T05:00:00+5:302020-07-22T05:00:56+5:30

भंडारा ते वरठी या मार्गावर आयएमए हॉल, नवीन टाकळी (आयटीआय), गणेश नगरी, दाभा मोड, पाचगाव फाटा, जगनाडे चौक ते रेल्वेस्थानका पर्यंत रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले आहेत. त्यामुळे शालेय विद्यार्थी व कर्मचाऱ्यांना अडथळ्याची शर्यत पार करावा लागते. वेळेवर पोहोचणे अवघड झाले आहे . वरठी येथे जिल्ह्याचे मुख्य रेल्वे स्टेशन व सनफ्लॅग स्टील कारखाना आहे. या मार्गावर दिवसभर रहदारी असते.

The Varathi-Bhandara highway is becoming life threatening | वरठी-भंडारा महामार्ग ठरतोय जीवघेणा

वरठी-भंडारा महामार्ग ठरतोय जीवघेणा

ठळक मुद्देअपघाताची शक्यता : मार्गाची दुरवस्था, रहदारीला त्रास

लोकमत न्यूज नेटवर्क
वरठी : भंडारा ते वरठी व मोहाडी हा अत्यंत वर्दळीचा मार्ग असून दररोज शेकडो वाहने या रस्त्याने धावतात. दररोज विविध कामाने नागरिकांना जिल्ह्याच्या ठिकाणी यावे लागते. परंतु, या मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून अपघाताची शक्यता बळावली आहे. मार्गाची त्वरित दुरुस्ती करावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.
भंडारा ते वरठी या मार्गावर आयएमए हॉल, नवीन टाकळी (आयटीआय), गणेश नगरी, दाभा मोड, पाचगाव फाटा, जगनाडे चौक ते रेल्वेस्थानका पर्यंत रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले आहेत. त्यामुळे शालेय विद्यार्थी व कर्मचाऱ्यांना अडथळ्याची शर्यत पार करावा लागते. वेळेवर पोहोचणे अवघड झाले आहे . वरठी येथे जिल्ह्याचे मुख्य रेल्वे स्टेशन व सनफ्लॅग स्टील कारखाना आहे. या मार्गावर दिवसभर रहदारी असते.
हा राज्यमार्ग तुमसरवरून मध्य प्रदेश व छत्तीसगड राज्यांना जोडतो. त्यामुळे वाहनांचा सतत राबता असतो. भंडारा- वरठीचे अंतर ११ किलोमीटर आहे. या रस्त्याची ठिकठिकाणी चाळण झाली आहे. त्यामुळे वाहनांचे टायर पंक्चर होण्याचा प्रकार दररोज बडत आहे. या समस्येमुळे दुचाकीचालक अस्त झाले आहेत. बहुतेक ठिकाणी एका बाजूने रस्ता खराब असल्याने वाहन चालक चुकीच्या बाजूने वाहने चालवतात. त्यामुळे किरकोळ अपघातही घडले आहेत. पावसामुळे खड्ड्यांचा अंदाजही येत नाही. या रस्त्यावर मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत आहे. बांधकाम विभागाने तातडीने रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरीक करीत आहेत.

गेल्या अनेक दिवसांपासून रस्ता खराब झाला असून, या मार्गावरून प्रवास करणे त्रासदायक ठरत आहे. वाहनचालक नवीन वाहन घेताना रोड टॅक्स भरतात. शासन आमच्याकडून रस्त्यासाठी पैसे वसूल करते, मग खड्डे का बुजवत नाही. खराब रस्त्यांमुळे दररोज या परीसरात मोठे अपघात होत आहेत. अपघातास कारणीभूत ठरणाºया, दुरुस्तीकडे निष्काळजीपणा दाखविणान्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा.
- धनपाल सार्वे, वरठी

Web Title: The Varathi-Bhandara highway is becoming life threatening

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.