शहरं
Join us  
Trending Stories
1
६ डिसेंबरला करायचा होता स्फोट, पण अटकसत्रामुळे उधळला कट, ‘कार बॉम्ब’ची सुरू होती तयारी, नेटवरून घेतले धडे
2
२० क्विंटल स्फोटकांची खरेदी अन् पैशांवरुन वाद; ४ शहरांमध्ये IED हल्ला करण्याचा होता दहशतवाद्यांचा प्लॅन
3
दिल्ली स्फोटाचे गुपित उघडले; कारमधील मृतदेह डॉ. उमर नबीचाच, DNA रिपोर्ट समोर
4
Groww IPO Listing: Google सारखीच आहे Groww ची कहाणी! एक चूक आणि बनलं ओळखीचं नाव, शेअर बाजारातही केलं अवाक्
5
आजचे राशीभविष्य,१३ नोव्हेंबर २०२५: कामाच्या धावपळीत कुटुंबाकडे दुर्लक्ष; सरकारकडून लाभाची शक्यता
6
'३ इडियट्स'मधील मिलीमीटर पत्नीसोबत दिसला दिल्लीच्या रस्त्यावर, १६ वर्षांनंतर त्याला ओळखणं झालं कठीण
7
FREE मध्ये अपडेट होतंय Aadhaar Card, वर्षभरासाठी माफ झाली फी; पाहा कोणाला मिळणार फायदा?
8
“नगरपालिका निवडणुकीत सर्वाधिक जागा लढवण्यावर असेल भर, सत्तेची नाही विचारांची लढाई”: सपकाळ
9
वोटचोरीसह सरकार नोकरी चोर निघाले, वर्षाला २ कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासनाचे काय?: काँग्रेस
10
"आता सगळं देवाच्या हातात आहे...", धर्मेंद्र यांच्या तब्येतीबाबत बोलताना हेमा मालिनी भावुक, म्हणाल्या- "मुलं रात्रभर..."
11
५०० वर्षांनी गुरु-शनिचा शुभ योग: १० राशींना चौफेर चौपट लाभ, समस्या संपतील; पद-पैसा-भाग्योदय!
12
Datta Jayanti 2025: यंदा दत्त जयंती गुरुवारी, अत्यंत शुभ दिवस; पाहा, महत्त्व अन् महात्म्य!
13
लग्न होत नाहीये, पत्नी मिळवून द्या! तुमचे उपकार विसरणार नाही! अकाेल्यातील तरुणाचे थेट शरद पवारांना साकडे
14
दहशतवाद्यांनी जानेवारीत केली होती लाल किल्ला भागात रेकी, टॉवर लोकेशन डेटाद्वारे करण्यात आली खात्री
15
भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे केंद्र ठरलेले लंडनमधील ‘इंडिया हाऊस’ आता महाराष्ट्र सरकार करणार खरेदी
16
तेजस्वीची राजद घेईल सर्वाधिक जागा, पण सत्ता एनडीएचीच, 'ॲक्सिस माय इंडिया' एक्झिट पोलमध्ये अंदाज  
17
त्या दहशतवादी महिला डॉक्टरचा माजी पती म्हणतो... ती प्रेमळ आई
18
काश्मीरमध्ये तीन दिवसांत तब्बल १५०० जण ताब्यात, कुलगाम-सोपोरसह शेकडो ठिकाणी छापे, झडती तीव्र
19
एमसीएच्या निवडणुकीमध्ये आ. जितेंद्र आव्हाड यांची बाजी, उपाध्यक्षपदी १३६ मतांनी विजय; अध्यक्षपदी अजिंक्य नाईक यांची बिनविरोध निवड
20
‘ओंकार’ जाणार वनतारामध्ये, सर्किट बेंचचा निर्णय, मूळ याचिका कायम

रासायनिक खतांसह तणनाशकांचा वापर वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:37 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क बारव्हा : पाळीव जनावरांची संख्या कमी झाल्याने शेणखत मिळणे कठीण झाले आहे तर मजुरांच्या टंचाईने शेतकऱ्यांना ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

बारव्हा : पाळीव जनावरांची संख्या कमी झाल्याने शेणखत मिळणे कठीण झाले आहे तर मजुरांच्या टंचाईने शेतकऱ्यांना नाईलाजास्तव तणनाशकाचा वापर करावा लागत आहे. शेतीचा पोत घसरत असला तरी याशिवाय शेतकऱ्यांपुढे पर्याय नाही. लाखांदूर तालुक्यातील बारव्हा परिसरात शेतकरी रासायनिक खतांसह तणनाशकाचा वापर मोठ्या प्रमाणात करत असल्याचे दिसत आहे.

काही वर्षांपूर्वी शेतकरी शेती व्यवसायासोबतच जोडधंदा म्हणून गाय, बैल, म्हैस, शेळ्या, मेंढ्या अशी जनावरे पाळत होते. त्यातून मिळणारे शेणखत शेतीसाठी उपयोगी पडत होते. शेणखतातून शेतीला मोठ्या प्रमाणावर पोषक तत्त्वे मिळत होती. या तत्त्वांमुळे शेतीला कोणत्याही प्रकारची हानी पोहोचत नव्हती. शिवाय शेतीचा पोतही वाढत होता. सोबतच पूर्णपणे निरोगी पिकांपासून शेतकऱ्यांना भाजीपाला व इतरही पिके घेता येत होती. उत्पन्नाचा दर्जा चांगला राहत होता. त्यामुळे पौष्टिक अन्न मिळण्यास मदत व्हायची; परंतु आता परिस्थिती बदलली आहे. पूर्वी खरीप आणि रब्बी पिकांवर कोणत्याही रोगाचे आक्रमण झाले तरी शेतकरी स्वतः उपाययोजना करत होता; परंतु कालांतराने ही पद्धत मोडीत निघाली. आता कोणत्याही गावात हे चित्र दिसत नाही. पीक चांगले राहण्याकरिता रासायनिक खतांचा भरमसाठ वापर केला जात आहे, त्यामुळे जमिनीतील आवश्यक पोषण तत्त्वे नष्ट होत आहेत. जिल्ह्यात धान पिकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. या पिकांच्या वाढीसाठी रासायनिक खतांचा वापर केला जातो.

बाॅक्स

हिरवळीच्या खतांबाबत जागृतीचा अभाव

जमिनीचा पाेत कायम राखण्यासाठी जैविक, सेंद्रिय व हिरवळीच्या खतांबाबत कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांमध्ये जागृती केली जात नसल्याने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना याची माहिती नाही. त्यामुळे शेतकरी पैशांची जमवाजमव करून रासायनिक खतांचाच वापर करतात. त्यामुळे जैविक, सेंद्रिय व हिरवळीच्या खतांचा वापर करण्याबाबत शेतकऱ्यांमध्ये जागृती करण्याची आवश्यकता आहे.

बाॅक्स

सिंचनाअभावी चार महिने शेती पडीक

शेतकरी दरवर्षी खरीप व रब्बी पिके घेतात. उन्हाळ्यात धान पिकासाठी सिंचनाची सोय नसल्याने चार महिने शेती पडीक असते. खरीप हंगामात पावसाच्या पाण्यावरच शेती केली जाते. त्यानंतर जमिनीच्या ओलाव्यावर रब्बी पिके घेतली जातात. ज्या शेतकऱ्याकडे विहिरी, बोअरवेलची व्यवस्था आहे, ते भाजीपाल्याची लागवड करतात; परंतु जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात रब्बी पिके निघाल्यानंतर जवळपास चार महिने जिल्ह्यातील शेती पडीक राहते. शेतकरी कामाच्या शोधात बाहेरील जिल्ह्यात वा अन्य राज्यात जात असल्याने शेतीचा पुरेपूर वापर हाेत नाही. आता कोणत्याही गावात हे चित्र दिसत नाही. पीक चांगले राहण्याकरिता रासायनिक खतांचा भरमसाठ वापर केला जात आहे, त्यामुळे जमिनीतील आवश्यक पोषण तत्त्वे नष्ट होत आहेत. जिल्ह्यात धान पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड करुन उत्पादन घेतले जाते. या पिकांच्या वाढीसाठी मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा वापर केला जातो. त्यामुळे जमिनीचा पोत घसरला आहे.