शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
2
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
3
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
4
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
5
'अडीज कोटीत ईव्हीएम हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
6
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
7
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात ५ वाजेपर्यंत सरासरी ५३.४० टक्के मतदान
8
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
9
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
10
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
11
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
12
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
13
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
14
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
15
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
16
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
17
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
18
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
19
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
20
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...

विस्थापित शिक्षकांना न्याय मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 11:09 PM

आॅनलाईन बदली प्रक्रिया २०१८ मध्ये चुकीच्या पद्धतीने खोटी माहिती भरणे, बोगस अपंगत्वाचे प्रमाणपत्र जोडणे, तर काही शिक्षकांनी 'टीयूटी' मध्ये फॉर्मच भरले नाही. त्यामुळे जिल्ह्यातील जवळपास १७० ते १७५ शिक्षकांना विस्थापीत व्हावे लागले.

ठळक मुद्देसीईओचे आश्वासन : महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाची चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : आॅनलाईन बदली प्रक्रिया २०१८ मध्ये चुकीच्या पद्धतीने खोटी माहिती भरणे, बोगस अपंगत्वाचे प्रमाणपत्र जोडणे, तर काही शिक्षकांनी 'टीयूटी' मध्ये फॉर्मच भरले नाही. त्यामुळे जिल्ह्यातील जवळपास १७० ते १७५ शिक्षकांना विस्थापीत व्हावे लागले. त्यांच्यावर झालेला अन्याय दूर करण्यात यावा, याकरिता महाराष्ट्र कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ पुणे, जिल्हा शाखा भंडारा यांच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी रवींंद्र जगताप व शिक्षणाधिकारी पाच्छापुरे यांच्याशी सकारात्मक चर्चा करण्यात आली.सन २०१८ मध्ये शासन निर्णयानुसार महाराष्ट्रातील सर्वच शिक्षकांची आॅन लाईन बदली प्रक्रिया शासन स्तरावरून राबविण्यात आली. या आॅन लाईन बदली प्रक्रियेत काही शिक्षकांनी नोंदच केली नाही. काही शिक्षकांनी फॉर्म भरताना खोटी माहिती भरली, तर काही शिक्षकांनी बोगस अपंगत्वाचे प्रमाणपत्र सादर केल्याची चर्चा काही महिन्यांपासून जिल्ह्यात सुरू होती. बदली प्रक्रियेत चुकीची खोटी माहिती भरल्याने बऱ्याच मोठ्या प्रमाणात शिक्षकांना विस्थापीत व्हावे लागले. विस्थापित झालेल्या शिक्षकांनी मागील दोन ते तीन महिन्यापासून शिक्षण विभाग व जिल्हा प्रशासनाला पत्र व्यवहार करून सुद्धा कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. विस्थापीत अन्यायग्रस्त शिक्षकांनी महाराष्ट्र कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ पुणे, जिल्हा शाखा भंडारा यांच्याकडे न्याय मिळवून देण्याकरिता विनंती निवेदने दिली होती. त्यासंबंधाने १३ आॅगस्टला संघटनेच्या माध्यमातून शिक्षणाधिकारी (प्राथमिक) पाच्छापुरे यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेवून निवेदन देण्यात आले.सात दिवसात कार्यवाही करण्याचे आश्वासन संघटनेला व विस्थापीत शिक्षकांना देण्यात आले. त्याचप्रमाणे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र जगताप यांच्या दालनात सुद्धा त्यांची भेट घेवून त्यांना निवेदन देवून सकारात्मक चर्चा करण्यात आली. चर्चा करतानी संघटनेकडून उच्चस्तरीय समिती गठित करण्यात येवून चौकशी करण्यात यावी, तसेच विस्थापीत झालेल्या शिक्षकांना न्याय देण्यात यावा यावर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी उच्च स्तरीय चौकशी समिती गठित करून १० दिवसात योग्य कार्यवाही करण्याचे आश्वासन संघटनेला दिले.विस्थापीत शिक्षकांना न्याय देण्यात येवून मागील चार वर्षापासून पदोन्नतीची कार्यवाही झालेली नाही. ती तात्काळ करण्यात यावी हाही मुद्दा सोबत मांडण्यात आला. त्यावर या महिन्याच्या शेवटी पदोन्नतीच्या कार्यवाही करण्यात येतील, असे आश्वासन दिले. यावेळी संघटनेचे उपमहासचिव सुर्यभान हुमणे, जिल्हा अध्यक्ष विनय सुदामे, जिल्हा शिक्षक अध्यक्ष शंभू घरडे, सचिव हरिश्चंद्र धांडेकर, उपाध्यक्ष सिद्धार्थ भोवते, विस्थापीत शिक्षक अचल दामले, सिद्धार्थ चौधरी, बाबुराव गिºहेपुंजे, हरीकिशन अंबादे, महेश यावलकर, सुरेश शिंगाडे, प्रभू तिघरे, रमेश फटे, राजू धुर्वे, नत्थू बावनकुळे, छाया मेश्राम, नयना नागदेवे, जया पवार, विमल अंबादे, कुंदा वहिले, सोनाली मुडा तसेच संघटनेचे पदाधिकारी व इतर विस्थापीत शिक्षक फार मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.विस्थापीत झालेल्या शिक्षकांना न्याय देण्यासाठी उच्च स्तरीय चौकशी समिती गठित करून कार्यवाही करण्यात येणार आहे. त्यामुळे बोगस प्रमाणपत्र सादर करणाºयांमध्ये भीती निर्माण झाली आहे.