शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

दोन अस्वलांची शिकार प्रकरण, चार आरोपींना अटक; पाच दिवसांची वन कोठडी

By गोपालकृष्ण मांडवकर | Updated: February 24, 2024 20:52 IST

अटकेतील आरोपींमध्ये अश्विन देशमुख (३८), मंगेश चचाणे (३५), रूपचंद शेंडे (३२) आणि रमेश रोहणकर (४८) यांचा समावेश आहे. ते सर्वजण नान्होरी (ता. लाखनी) येथील रहिवासी आहेत.

भंडारा : लाखनी वनपरिक्षेत्रा अंतर्गत सहवनक्षेत्रालगतच्या रामपुरी गावाच्या शेतशिवारात दोन नर अस्वलांचा विजेच्या सापळ्यात अडकल्याने मृत्यू झाला होता. या प्रकरणी चार आरोपींना अटक करून त्यांची वन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. अटकेतील आरोपींमध्ये अश्विन देशमुख (३८), मंगेश चचाणे (३५), रूपचंद शेंडे (३२) आणि रमेश रोहणकर (४८) यांचा समावेश आहे. ते सर्वजण नान्होरी (ता. लाखनी) येथील रहिवासी आहेत.

१८ फेब्रुवारीच्या सकाळी या शेतशिवारात दोन अस्वल मृतावस्थेत आढळले होते. वन विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी ६ दिवसांपूर्वी रामपुरी येथील शेतशिवारात दोन्ही अस्वलांना विजेचा प्रवाह सोडून ठार केले होते. पूर्ण वाढ झालेले हे अस्वले मागील काही दिवसांपासून या परिसरात फिरत होते. आरोपींनी जंगली डुकरांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेतात विद्युत तारा टाकून विद्युत प्रवाह लावला. त्यात अडकल्याने दोन्ही अस्वलांचा मृत्यू झाला. लाखनी वनविभागाच्या पथकाने तपास करून २३ फेब्रुवारीला सकाळी चारही जणांना ताब्यात घेतले. त्यांना अटक करून लाखनी येथील प्रथमवर्ग न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची वन कोठडी सुनावली आहे.

आरोपींच्या संख्येत वाढ होण्याची शक्यतावनपरिक्षेत्र अधिकारी एस. पी. गोखले यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्याच्याकडून शिकारीसाठी वापरलेल्या तारा, खुंटे आदी जप्त करण्यात आले आहेत. अस्वलांचे वजन भरपूर असल्याने केवळ चार व्यक्तींनीच त्यांना उचलून बाजुला ठेवणे शक्य नाही. यावरून, या प्रकरणात आणखी काही लोकांचा सहभाग असण्याची शक्यता वन विभागाने व्यक्त केली आहे. नजीकच्या काळात आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीforest departmentवनविभाग