शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

सहापदरी बायपाससाठी वृक्षांची कत्तल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2022 05:00 IST

आता बायपास तयार करण्यासाठी या परिसरात असलेल्या शेकडो वृक्षांची कत्तल केली जात आहे. वड, निंब, बाभूळ यासह विविध जातींचे वृक्ष यंत्राच्या साहाय्याने तोडले जात आहेत. निर्माणाधीन बायपास परिसरात रस्त्याच्या कडेला तुटलेले वृक्ष पडून आहेत. यापूर्वी जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम करण्यात आले होते. निलज-कारधा या महामार्गासाठी रस्त्यावरील डेरेदार वृक्ष तोडण्यात आले. तसेच तुमसर तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गासाठी शेकडो वृक्षांची कत्तल झाली.

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शहरात होणारी वाहतुकीची कोंडी आणि अपघात टाळण्यासाठी दीर्घ प्रयत्नानंतर राष्ट्रीय महामार्गाच्या बायपास रस्त्याला मंजुरी मिळाली. सहा पदरी बायपाससाठी आता शिंगोरी ते मुजबी या दरम्यानच्या शेकडो वृक्षांची कत्तल केली जात आहे. यापूर्वीही निलज - कारधा आणि तुमसर तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गासाठी वृक्ष तोडण्यात आले. परंतु अद्याप तरी तेथे वृक्षारोपण झाले नाही. अशीच अवस्था या बायपासचीही होणार आहे.राष्ट्रीय महामार्गाचा हा बायपास १४.८० किलोमीटर लांबीचा असून ४२१ कोटी रुपये खर्च करुन बांधण्यात येणार आहे. महिनाभरापूर्वी या बायपासच्या कामाचे उद्घाटन होऊन कामाला सुरुवातही झाली आहे. मात्र आता बायपास तयार करण्यासाठी या परिसरात असलेल्या शेकडो वृक्षांची कत्तल केली जात आहे. वड, निंब, बाभूळ यासह विविध जातींचे वृक्ष यंत्राच्या साहाय्याने तोडले जात आहेत. निर्माणाधीन बायपास परिसरात रस्त्याच्या कडेला तुटलेले वृक्ष पडून आहेत. यापूर्वी जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम करण्यात आले होते. निलज-कारधा या महामार्गासाठी रस्त्यावरील डेरेदार वृक्ष तोडण्यात आले. तसेच तुमसर तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गासाठी शेकडो वृक्षांची कत्तल झाली. पर्यावरणवाद्यांनी आवाज उठविल्यावर वृक्ष लागवड केली जाईल असे सांगण्यात आले. परंतु तेथे अद्यापपर्यंत वृक्षांची लागवड झाली नाही. अशीच अवस्था या बायपासची होईल आणि हिरवीगार वनराई नष्ट होऊन हा परिसर उजाड होण्याची शक्यता आहे.

गावकऱ्यांनी जोपासली मुलाप्रमाणे झाडे- भंडारालगतच्या भिलेवाडा परिसरात वेगाने बायपासचे काम सुरू आहे. यासाठी वृक्षांची कत्तल केली जात आहे. नागरिकांनी आपल्या मुलाप्रमाणे या वृक्षांना वाढविले. परंतु आता आधुनिकतेच्या नावाखाली त्यांच्या डोळ्यासमोर कत्तल होत आहे.

 

टॅग्स :National Highwayराष्ट्रीय महामार्गenvironmentपर्यावरण