शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश
3
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
4
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
5
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
6
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
7
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
8
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
9
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
10
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
11
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
12
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
13
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
14
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

तरुणाईमुळे गावाचा कायापालट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 11:54 PM

भावी पिढीला तंदुरूस्त करण्यासाठी गावाला स्वच्छ व सुंदर करणे काळाची गरज आहे.

ठळक मुद्देडी. एस. बिसेन : गुंजेपार येथे राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे आयोजन

आॅनलाईन लोकमतभंडारा : भावी पिढीला तंदुरूस्त करण्यासाठी गावाला स्वच्छ व सुंदर करणे काळाची गरज आहे. याकरिता दरवर्षी ग्रामस्तरावर घेण्यात येणारे राष्ट्रीय सेवा योजना शिबिर महत्वाचे माध्यम ठरते आहे. महाविद्यालयीन तरुणाईची शक्ती आणि गावकºयांचा सहभाग असेल आपला गाव स्वच्छ सुंदर व निरोगी करता येऊ शकते. असे प्रतिपादन कार्यक्रम व्यवस्थापक डी. एस. बिसेन यांनी केले.स्वामी रामानंद तिर्थ कला व वाणिज्य महाविद्यालय मासळच्या पुढाकारातून लाखांदूर तालुक्यातील गुंजेपार (किन्ही) येथे सुरु असलेल्या राष्ट्रीय सेवा योजना शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.यावेळी सरपंच उत्तम भागडकर, काँग्रेसच्या प्रमिला कुटे, काशिनाथ हुमणे, लाखांदूरचे ठाणेदार बन्सोडे, उपसरपंच ब्रम्हदास देशमुख, प्रकाश नाकतोडे, हर्षवर्धन हुमणे, अंकुश गभणे, अजय गजापुरे, राजेश येरणे, नेत्रदिपक बोडखे, नागपुरे, देवानंद कावळे, राजाराम सोनटक्के, कुटे, राजाराम देशमुख, मुकुंदराव देशमुख, नितीन हुमणे, प्रा. मोटघरे, नवनाथ सोनटक्के आदींची उपस्थिती होती.यावेळी हुमणे यांनी, गुंजेपार येथे होवून घातलेल्या मागील वर्षीच्या शिबिराच्या आठवणी सांगून गावात विविध कार्यक्रम व पाणी व स्वच्छतेतून परिवर्तन घडविण्यात येणार असल्याचे सांगितले.सरपंच भागडकर यांनी, रासेयो शिबिराच्या माध्यमातून नागरिकांत सामाजिकतेची भावना जागविण्याचे कार्य होत आहे. सर्वंनी घरासमोरील साचलेला कचरा व नालीत थांबलेले पाणी स्वच्छ करण्यासाठी जे नागरिक पुढाकार घेतात, हेच राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे यश असल्याचे भागडकर यांनी सांगितले. गावात विकासाचे परिवर्तन करायचे असेल तर लोकसहभाग आवश्यक आहे. संघटीत झाल्याशिवाय यश मिळणार नाही, असे त्यांनी प्रतिपादन केले.प्रमिला कुटे यांनी, एकमेकांना सहाय्य करू, अवघे धरु सुपंथ, या म्हणीप्रमाणे गावात नागरिकांनी एकमेकाला सहाय्य करून पुढाकार घेतला तर गावाला स्वच्छ व सुंदर करण्यास वेळ लागणार नाही. विविध कार्यात गावात नावलौकीक करता येईले. जसा विद्यार्थी हा शिष्य व शिक्षक हा गुरु असतो त्याचप्रमाणे आईवडीलही गुरु आहेत. मुल आणि आईवडीलात ज्या प्रमाणे मित्रत्वाचे नाते असेल तर तो कुटुंब सुखी व समृद्ध होते. त्याचप्रमाणे गावकरी एकत्र होवून मित्रत्वाप्रमाणे वागले तर गावातील सामाजिक बदल घडविता येईल, असे प्रतिपादन केले.याप्रसंगी ठाणेदार बन्सोडे यांनी, गावात शांतता प्रस्थापित ठेवण्यासाठी सलोख्याचे संबंध निर्माण करावे, व्यसनमुक्त समाज करण्यावर भर देऊन गाव स्वच्छ व सुंदर करण्याचे प्रतिपादन केले. यावेळी विद्यार्थी, महिला व पुरूषांची मोठी उपस्थिती होती.