शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
3
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
4
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
5
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
6
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
7
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी
8
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
9
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
10
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
11
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
12
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
13
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
14
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
15
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
16
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
17
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
18
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
19
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
20
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट

आंबागड किल्ल्याची पर्यटकांना पडली भूरळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2019 12:50 AM

अनेक वर्षापूर्वी अत्यंत दुर्लक्षीत, उपेक्षित ऐतिहासिक आंबागड किल्ला सातपुडा पर्वताच्या कुशीत अंतीम घटका मोजत होता. पर्यटक व लोकांच्या नजरेपासून दूर होता. मात्र याबाबात पर्यटन प्रेमी मो.सईद शेख यांनी शासनाकडे पाठपुरावा करीत निधी खेचून आणला.

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : अनेक वर्षापूर्वी अत्यंत दुर्लक्षीत, उपेक्षित ऐतिहासिक आंबागड किल्ला सातपुडा पर्वताच्या कुशीत अंतीम घटका मोजत होता. पर्यटक व लोकांच्या नजरेपासून दूर होता. मात्र याबाबात पर्यटन प्रेमी मो.सईद शेख यांनी शासनाकडे पाठपुरावा करीत निधी खेचून आणला. परिणामी आजघडीला या कियाचे स्वरूप पालटले असून पर्यटकांना हा किल्ला आपल्याकडे आकर्षित करीत आहे.या उपेक्षित किल्ल्याचे उध्दार, जतन व संरक्षण व्हावे म्हणून इतिहास व पर्यटन क्षेत्रात काम करणारे मो.सईद शेख यांनी सन १९८० पासून १५ ते २० वर्षापर्यंत सतत पत्र व्यवहार करुन शासन दरबारी पाठपुरावा केला. पुरातत्व विभागाचे अधिकाऱ्यांना येथे अनेकदा पाचारण केले. माजी प्रधानमंत्री नरसिंहराव व राज्याचे मुख्यमंत्र्याना या किल्ल्याबाबद पत्राद्वारे कळविले असता पत्राची दखल घेवून पुरातत्व विभागाला याबाबद पत्र देण्यात आले होते.अखेर पर्यटन स्थळाच्या यादीमध्ये किल्ल्याचा समावेश करुन २ कोटी ३३ लाख रु. मंजूर करण्यात आले व कामास सुरवात झाली.गडावर चढण्यासाठी पायºया नव्हत्या, पुर्वी पर्यटक झाडाच्या फांद्याच्या सहाय्याने कसेबसे वर पोहोचत असत. प्रथम पायºया बनविण्यात आल्या. नंतर भव्य प्रवेशद्वार, बुरुज, परकोट भिंत (जे पूर्ण ढासळलेले होते) नगारखाना, मनोरे व अनेक भागाचे जिर्णोद्धार व निर्माण पेंटीगची कामे करण्यात आली आहेत. काही ईमारती भुईसपाट झाल्या असून त्याचे जिर्णोद्धार पण दुसºया टप्प्यात करण्यात येणार आहे. कामे खुप मोठी व जिकरीचे असून याला काही वेळ लागेल. किल्ल्याचे निर्माते राजे बख्तबुलंद शाह यांचे नागपूर येथील वारस राजे विरेंद्रशाह बख्तबुलंद शाह यांना सन २००२ (डिसेंबर) मध्ये नागपूर त्रिशताब्दी महोत्सवाप्रसंगी किल्ल्यावर बोलावून त्यांचे वारसदारांनी हे किल्ले बांधल्याचे माहिती शेख यांनी दिली होती. त्याप्रसंगी त्यांनी राजवैभवाच्या त्रिशाब्दीचा ध्वज पण फडकावून किल्ल्याला सन्मान दिला होता. त्यानंतर पुन्हा त्यांचे येथे आगमण झाले. आता किल्याचे नविन स्वरुप बघायला येणार आहेत.अनेकदा येथे महाराष्ट्र, विदर्भ, जिल्ह्यातून अनेक इतिहासकार, संशोधक, पर्यटक, शाळेच्या सहली येथे शेख यांनी आमंत्रित करुन किल्ल्याविषयी मार्गदर्शन केले आहे. दिवसेंदिवस पर्यटकांची येथे संख्या वाढत आहे. किल्ल्यावर अनेक दर्शनिय स्थळांचे जिर्णोद्धार व निर्माण झाल्याने हा किल्ला बलदंड आणि नव्या दमाने, नविन स्वरुपात पर्यटकांच्या स्वागतास सज्ज झाला आहे.

टॅग्स :Fortगड