४०० रेल्वे व्हेंडर्सवर उपासमारीची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2020 05:00 IST2020-08-24T05:00:00+5:302020-08-24T05:00:47+5:30

हाताला काम मागण्याकरिता वणवण भटकावे लागत आहे. कुणी भाजी विक्री करीत आहे तर कुणी मिळेल ती कामे करीत आहे. अल्प मजूरीवर संपूर्ण कुटूंबाचा उदरनिर्वाह कसा करावा असा प्रश्न त्यांना पडला आहे. नागपूर विभागातील मोठ्या रेल्वे स्थानकावर रेल्वे व्हेंडर्सची संख्या मोठी आहे. इतर कामे न केल्याने त्यांना मजूरी कमी मिळत आहे. एकदा प्रवाशी गाड्या सुरु होतात याकडे त्यांचे लक्ष लागून आहे.

Time of famine on 400 railway vendors | ४०० रेल्वे व्हेंडर्सवर उपासमारीची वेळ

४०० रेल्वे व्हेंडर्सवर उपासमारीची वेळ

ठळक मुद्देकिरकोळ कामे करुन उदरनिर्वाह : मदतीची गरज, कुटुंबावर मोलमजुरीची वेळ

लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : नागपूर विभागातील सुमारे ४०० रेल्वे व्हेंडर्सवर उपासमारीची वेळ आली आहे. मागील पाच महिन्यापासून प्रवाशी रेल्वे गाड्या बंद आहेत. त्यामुळे किरकोळ मजूरीची कामे करुन उदरनिर्वाह करावा लागत आहे. कोरोना संकटकाळात शासनाने मदत करण्याची गरज आहे.
नागपूर विभागातील प्रत्येक रेल्वे स्थानकात रेल्वे व्हेंडर्सची मोठी संख्या आहे. प्रवाशांना पाण्यापासून तर नाश्ता, चहा, किरोळ साहित्य विक्री व्हेंडर्स प्रवाशी गाड्यात करतात. मार्च महिन्यात कोरोनाचा संक्रमण वाढू नये याकरिता रेल्वे प्रशासनाने प्रवाशी रेल्वे गाड््या बंद केल्या. त्यामुळे रेल्वे व्हेंडर्स बेरोजगार झाले. नागपूर विभागात आठवड्यात मुंबई-हावडा व हावडा अमहदाबाद दोन प्रवाशी गाड्या आठवड्यातून एकदाच धावत आहेत. इतर सर्व प्रवाशी रेल्वे गाड्या बंद आहेत. त्यामुळे रेल्वे व्हेंडर्सना मोठा फटका बसला आहे.

मोलमजुरी करुन उदरनिर्वाह
कुटुंबाचे पोट भरण्याकरिता रेल्वे व्हेंडर्सनी सध्या मोलमजूरी करणे भाग पडत आहे. हाताला काम मागण्याकरिता वणवण भटकावे लागत आहे. कुणी भाजी विक्री करीत आहे तर कुणी मिळेल ती कामे करीत आहे. अल्प मजूरीवर संपूर्ण कुटूंबाचा उदरनिर्वाह कसा करावा असा प्रश्न त्यांना पडला आहे. नागपूर विभागातील मोठ्या रेल्वे स्थानकावर रेल्वे व्हेंडर्सची संख्या मोठी आहे. इतर कामे न केल्याने त्यांना मजूरी कमी मिळत आहे. एकदा प्रवाशी गाड्या सुरु होतात याकडे त्यांचे लक्ष लागून आहे.
रेल्वेस्थानकावर शुकशुकाट
ऐरवी प्रवाशांच्या गर्दीने भरलेले रेल्वेस्थानकावर सध्या शुकशुकाट आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांशिवाय रेल्वे स्थानकावर कुणीच दिसत नाही. सर्वांना पुन्हा प्रवाशी रेल्वे गाड्या सुरु होण्याची प्रतीक्षा आहे.

मागील पाच महिन्यापासून प्रवशी रेल्वेगाड्या बंद आहेत. त्यामुळे रेल्वे व्हेंडर्सवर मोलमजूरी करण्याची पाळी आली आहे. संपूर्ण कुटुंबाचे पालन पोषण कसे करावे असा प्रश्न पडला आहे. शासनाने व्हेंडर्सना आर्थिक मदत करावी.
- शेखर ठवकर,
रेल्वे व्हेंडर्स, प्रतिनिधी तुमसर रोड

Web Title: Time of famine on 400 railway vendors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :railwayरेल्वे