शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक: राऊड घाटात एसटीचा भीषण अपघात; ६ प्रवाशांचा मृत्यू, टायर फुटून ट्रकला धडकली
2
तिढा सुटला, उमेदवार ठरला! मुंबई उत्तर-पश्चिममध्ये रविंद्र वायकरच महायुतीचे उमेदवार
3
‘कॉलर उडवताना सकाळ आहे की संध्याकाळ हे पाहावं लागतं’, शरद पवारांची उदयनराजेंवर बोचरी टीका 
4
Video - बापमाणूस! घटस्फोटानंतर वडिलांनी वाजत-गाजत लेकीला आणलं आपल्या घरी
5
नवीन गुजरातचा आत्मा महाराष्ट्रात भटकतोय; संजय राऊतांचा भाजपावर पलटवार
6
प्रियांका गांधी लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत, सूत्रांची माहिती 
7
१३९ दिवस शनी वक्री: ५ राशींना लॉटरी, वरदान काळ; गुंतवणुकीतून लाभ, पदोन्नती, पगारवाढ शक्य!
8
SRK ने लेकाला जोरात पकडलं अन्...! IPL दरम्यान शाहरुख-अबरामचं क्युट भांडण कॅमेऱ्यात कैद
9
इकडे आड, तिकडे विहीर! युद्ध रोखले तर नेतन्याहूंचे सरकार पडणार, नाही रोखले तर...
10
हाहाकार! जम्मू-काश्मीरमध्ये पावसाचा प्रकोप, पुंछमध्ये भूस्खलन; अनेक घरं कोसळली, शाळा बंद
11
 ‘अमित शाह माझं पार्थिव उचलण्यास आले, तर खूप बरं होईल…’ दिग्विजय सिंह यांचं विधान चर्चेत  
12
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण
13
'माझिया प्रियाला प्रीत कळेना' विषयी अभिजीतचा मोठा खुलासा; म्हणाला, 'तुम्ही संधी दिली पण...'
14
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
15
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
16
'पीके'मध्ये आमिर खाननं खरोखर दिले होते न्यूड सीन, अभिनेता म्हणाला - "जे गार्ड घातलं होतं ते पण..."
17
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
18
Narmada Pushkaram 2024: नुसत्या दर्शनानेही पापमुक्ती देणारी नर्मदा मैय्या; १ मे पासून सुरु होत आहे पुष्करम पर्व!
19
Narmada Pushkaram 2024: नर्मदा पुष्करम पर्वाच्या कालावधीत म्हणा नर्मदा स्तोत्र; होईल अपार लाभ!
20
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?

उघड्यावरील हजारो पोते धान ओलेचिंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 1:00 AM

गत दोन दिवसांपासून कोसळल असलेल्या अवकाळी पावसाचा फटका आधारभूत केंद्रावर उघड्यावर असलेल्या धानाला बसत आहे. जिल्ह्यातील विविध केंद्रावर हजारो पोते धान ओलेचिंब झाले असून यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे.

ठळक मुद्देअवकाळी पावसाचा फटका : लाखांदूर, पवनी, साकोली, तुमसर, मोहाडी तालुक्यात हजेरी, तूर पीक धोक्यात

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : गत दोन दिवसांपासून कोसळल असलेल्या अवकाळी पावसाचा फटका आधारभूत केंद्रावर उघड्यावर असलेल्या धानाला बसत आहे. जिल्ह्यातील विविध केंद्रावर हजारो पोते धान ओलेचिंब झाले असून यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. बाजार समितीने धान झाकण्याची कोणतीही सुविधा न केल्याने शेतकºयात संताप व्यक्त होत आहे. यासोबतच अवकाळी पावसाचा फटका तूर आणि भाजीपाला पिकांना बसत आहे. आणखी दोन दिवस असेच वातावरण राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.जिल्ह्यात गत आठ दिवसांपासून ढगाळी वातावरण आहे. रविवारी सकाळपासून अवकाळी पावसाला सुरूवात झाली. जिल्ह्यातील बहुतांश भागात पावसाने हजेरी लावली. सोमवारी मध्यरात्रीपासूनच जिल्ह्यात पाऊस बरसायला लागला. या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. दिवसाचे तापमान कमालीचे खाली आले आहे. अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका धान पिकाला बसत आहे. दिवाळीपासून सुरू झालेल्या आधारभूत धान खरेदी केंद्रावर शेकडो शेतकºयांनी धानाचे पोते विक्रीसाठी आणले आहे. केंद्रावर पुरेशी जागा नसल्याने सर्वच ठिकाणी शेतकºयांनी उघड्यावर धान ठेवला आहे. रविवार आणि सोमवारी बरसलेल्या या पावसाने बहुतांश शेतकºयांचा धान ओला झाला आहे. अनेक शेतकºयांनी आपल्या घरून ताडपत्री आणून धान झाकण्याचा प्रयत्न केला. परंतु धान ओलाचिंब झाला.लाखांदूरमध्ये दोन हजार धान भिजलाआमच्या लाखांदूर येथील प्रतिनिधीने दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यात अचानक आलेल्या पावसाने बाजार समितीच्या आवारात विक्रीसाठी आणलेला धान भिजला आहे. सुमारे दोन हजार पोते पावसाने ओलिचिंब झाल्याने शेतकºयांचे ४० लाख रूपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. तालुक्यात १२ ठिकाणी आधारभूत धान खरेदी केंद्र आहेत. आधारभूत धान केंद्रावर कोणतीही सुविधा नाही. पुरेसे गोदामही नाहीत. त्यामुळे शेतकºयांना विक्रीसाठी आणलेले धान उघड्यावरच ठेवावे लागते. सोमवारी आलेल्या पावसाने संपूर्ण धान ओलाचिंब झाला. तालुक्यात सोमवारी पहाटे ३ वाजतापासून पावसाने हजेरी लावली. सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास जोरदार पाऊस बरसला. गहू, हरभरा आणि वटाना पिकाला याचा फटका बसणार आहे.साकोलीत सकाळपासून पाऊसआमच्या साकोली येथील तालुका प्रतिनिधीने दिलेल्या माहितीनुसार, गत आठ दिवसांपासून ढगाळ वातावरण असून सोमवारी सकाळी ९ वाजतापासून पावसाला सुरूवात झाली. फुलोºयावर आलेल्या तुरीचे मोठे नुकसान होत आहे. ढगाळ वातावरणामुळे अळींचा प्रादूर्भाव वाढण्याची भीती आहे. यासोबतच तुमसर, मोहाडी तालुक्यातही पावसाने हजेरी लावली. उघड्यावर असलेल्या धान ओला झाला.पवनी तालुक्यालाही पावसाचा फटका बसला असून आसगांव परिसरात सोमवारी सकाळी सात वाजतपासून रिमझिम पावसाला सुरूवात झाली. गंजी मारून असलेल्या धानाचे नुकसान झाले. तर अड्याळ परिसरात झालेल्या पावसाने धानाची मळणी थांबली असून ऊस तोडही रखडली आहे. वातावरणात गारवा निर्माण झाल्याने आजार बळावण्याची शक्यता आहे. पालोरा चौरास परिसरात दोन दिवसांपासून रिमझिम पाऊस सुरू आहे. उघड्यावरील धान वाचविण्यासाठी शेतकºयांची तारांबळ उडत आहे. जागा अपुरी असल्याने आधारभुत केंद्रावर धान उघड्यावर ठेवण्यात आला आहे.चुल्हाड परिसरात धान पोते उघड्यावरसिहोरा येथील शासकीय धान खरेदी केंद्रावर गेल्या महिनाभरापासून बारदान्याचा अभाव आहे. त्यामुळे खरेदी प्रक्रिया रखडली असून शेकडो शेतकºयांना धान उघड्यावर आहे त्यातच दोन दिवसापासून सुरू असलेल्या अवकाळी पावसापासून धान ओले झाले आहे. त्यामुळे शेतकºयांचे प्रचंड नुकसान होत आहे. सिहोरा येथील शासकीय धान खरेदी केंद्रावर १० हजारावर पोते उघड्यावर आहे. शेतकरी ढगाळ वातावरणाने धान झाकण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु अनेक शेतकºयांचा धान ओला होत आहे. दि सहकारी राईस मिलचे अध्यक्ष गंगादास तुरकर म्हणाले, सिहोºयाचे धान खरेदी केंद्रावर बारनाण्याचा पुरवठा करण्यात आला नसल्याने प्रक्रिया रखडली आहे. शिवाय अवकाळी पावसाने प्रचंड नुकसान होत आहे.पालांदूर परिसरात जोरदार पाऊसलाखनी तालुक्यातील पालांदूर परिसराला सोमवारी अवकाळी पावसाने सोमवारी झोडपून काढले. सकाळी १० वाजताच्या सुमारास पावसाला प्रारंभ झाला. उघड्यावर असलेला धान झाकण्यासाठी शेतकºयांची मोठी धावपळ झाली. रब्बी मशागतीचाही प्रश्न निर्माण झाला आहे. बागायती पिकांना या पावसाचा फटका बसत आहे. भाजीपाला पिकाचे मोठे नुकसान होत असून ढगाळ वातावरणात बुरशीजन्य रोग बळावण्याची शक्यता आहे.अवकाळी पावसाने सर्वांची त्रेधा उडाली आहे. हाच पाऊस आवश्यकता असताना बरसला असता तर धान पिकाच्या उत्पन्नात वाढ झाली असती. परंतु आता गरज नसताना पाऊस बरसत असून निसर्गाच्या या अवकृपेचा फटका शेतकºयांना सहन करावा लागत आहे. उत्पन्नात घट होण्याची यामुळे शक्यता आहे. शेतकरी निसर्गापुढे हतबल झाले.सुविधा देण्यात बाजार समिती अपयशीआधारभूत केंद्रावर येणाºया धानाच्या सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी संबंधीत बाजार समितीची असते. द महाराष्ट्र स्टेट को आॅपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन कार्यालयाने २२ आॅक्टोबर रोजी सर्व बाजार समितींना पत्र पाठवून सुविधा देण्याचे सांगितले होते. त्यामध्ये चाळणी, पंखे, ताडपत्री, पॉलिथिन शिट, ईलेक्ट्रानिक वजनमापे, आर्द्रतामापक यंत्र यासोबतच शेतकºयांच्या निवासाची व त्यांच्या जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची सुविधा पुरविण्याचे म्हटले होते. परंतु अवकाळी पावसाने बाजार समितीचे पितळ उघडे पाडले. बहुतांश केंद्रावर ताडपत्री नसल्याने शेतकऱ्यांचा धान ओला झाला. अनेक शेतकºयांनी आपल्या गावावरून ताडपत्री आणून धान झाकण्याचा प्रयत्न केला. बाजार समितीच्या दुर्लक्षितपणामुळे शेतकºयांना मोठा फटका बसत आहे.आणखी दोन दिवस पावसाची शक्यताजिल्ह्यात आणखी दोन दिवस म्हणजे १२ डिसेंबरपर्यंत पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. गत गाठ दिवसांपासून ढगाळी वातावरण आणि दोन दिवसापासून पडत असलेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. वातावरणात प्रचंड गारवा निर्माण झाल्याने नागरिक उबदार कपडे घालूनच बाहेर निघत आहे. ग्रामीण भागात शेकोट्या पेटल्याचे चित्र दिसून येत आहे. पावसाचा फटका शाळेत जाणाºया विद्यार्थ्यांना बसत असून हिवाळ्यात छत्री बाहेर काढावी लागत आहे.धान पडणार काळपटपावसाने ओला झालेला धान काळपट पडण्याची भीती आहे. आधारभूत केंद्रावर ओला झालेला धान वाळवावा लागणार आहे. त्यासाठी तो पुन्हा आपल्या गावी न्यावा लागेल. त्यासाठी आर्थिक भुर्दंड बसेल. धानाचे वजन कमी होवून कमी दर मिळतील.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्ड