शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

गाव तेथे वाचनालय, शाळा तेथे ग्रंथालय राबवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 21:44 IST

ग्रंथ आणि वाचनालय एकाच गाडीचे दोन चाक आहेत. परंतु आधूनिकतेच्या युगात मोबाईल व इंटरनेच्या प्रभावाने युवा पिढीत ग्रंथ वाचनाची आवड कमी होत आहे. ई-ग्रंथालयमुळे ग्रंथालय व वाचकांची संख्या कमी झाली आहे.

ठळक मुद्देधनंजय दलाल : भंडारा येथे दोन दिवसीय ग्रंथोत्सवाचा विविध विषयांवरील व्याख्यानांनी समारोप

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : ग्रंथ आणि वाचनालय एकाच गाडीचे दोन चाक आहेत. परंतु आधूनिकतेच्या युगात मोबाईल व इंटरनेच्या प्रभावाने युवा पिढीत ग्रंथ वाचनाची आवड कमी होत आहे. ई-ग्रंथालयमुळे ग्रंथालय व वाचकांची संख्या कमी झाली आहे. यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करावी. वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी गाव तेथे वाचनालय, शाळा तेथे ग्रंथालय हा उपक्रम राबविणे गरजेचे आहे,असे प्रतिपादन जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष धनंजय दलाल यांनी केले.भंडारा येथील जकातदार विद्यालयाच्या पटांगणावर आयोजित दोन दिवसीय ग्रंथोत्सवाच्या समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते. यावेळी जिल्हा कोषागार अधिकारी शंकर बळी, जात पडताळणी समितीचे संशोधन अधिकारी संभाजी पवार, साहित्य परिषदेचे अध्यक्ष गुरुप्रसाद पाखमोडे, जकातदार विद्यालयाचे मुख्याध्यापक डि. आर. हटवार, जिल्हा ग्रंथालय अधिकारी खुमेंद्र बोपचे उपस्थित होते.वाचनालयाच्या पदाधिकाऱ्यांनी ग्रंथालयाची चळवळ परत एकदा निर्माण करावी. शिक्षकांनी एकत्र बसून चर्चेद्वारे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाविषयी आवड निर्माण करण्याची आवश्यकता असल्याचे दलाल यांनी सांगितले.वाचाल तर वाचाल या उक्तीवर प्रकाश टाकतांना शंकर बळी म्हणाले की, ग्रंथ नसते तर मानव प्रगती करु शकला नसता तो मागासच राहिला असता. आधुनिक युगात ग्रंथाचे वाचन कमी झाले आहे. आपण टी.व्ही., इंटरनेटच्या कथेतील प्रसंग विसरुन जातो. परंतु ग्रंथातील प्रसंग आपल्या आजीवन स्मरणात राहते. म्हणून ग्रंथ व वाचनाची आवड स्वत:ला लावा, ग्रंथ हाच आपला प्रथम गुरु आहे, असे त्यांनी सांगितले.ग्रंथ हेच खरे मार्गदर्शक आहेत. अध्यात्मिक जीवनाची प्रगती ग्रंथामुळे होते. निरपेक्ष वाचनामुळे वाचकांना निरामय आनंद प्राप्त होतो. म्हणून प्रत्येक गावात ग्रंथालय असावे, असे ग्रंथाची महत्ता सांगताना गुरुप्रसाद पाखमोडे म्हणाले. मोबाईल व इंटरनेटच्या वापरामुळे व्यक्ती ग्रंथालयात जात नाही. ग्रंथात जीवनाचा मौलीक साठा साठलेला आहे. ग्रंथाकडे वळा व त्याचा उपभोग घ्या. ग्रंथ वाचनाने ब्रम्हानंद मिळतो, हा आनंद उपमाहिन आहे. ग्रंथ चळवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण पृथ्वीतलावर प्रभावी व्हायला पाहिजे. ग्रंथ आहे म्हणून मी आहे, ही भावना मनात असली पाहिजे. मानवी जीवनातील गाठ सोडविणारे पुस्तक म्हणजे ग्रंथ आहे. वाचनविवेक प्रत्येकात असायला पाहिजे तरच आपली उन्नती होईल, असे ते म्हणाले. यावेळी संभाजी पवार मुख्याध्यापक डि.आर. हटवार यांचेही भाषण झाले.१३ डिसेंबर पहिल्या दिवशी दुपारी १.३० ते ३ या दरम्यान पु.ल. देशपांडे - महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व या विषयावर परिसंवाद झाले. विदर्भ साहित्य संघ, नागपूरच्या सदस्या प्रा. शुभदा फडणवीस, धनवटे नॅशनल महाविद्यालयाचे प्रा. डॉ. रविंद्र शोभणे, मनोहरभाई पटेल महाविद्यालय, साकोलीचे प्रा. डॉ. राजेश दिपटे, राष्ट्रीय आदर्श विज्ञान व कनिष्ठ महाविद्यालय रामटेकचे प्रा. जगदिश गुजरकर या परिसंवादात सहभागी होते. दुपारी आयोजित कवी संमेलनाच्या अध्यक्षस्थानी प्रल्हाद सोनवाने होते. तर प्रमोदकुमार आणेराव, सुरेश खोब्रागडे, प्रमोदकुमार साहु, अर्चना मोहनकर, डॉ. प्रभाकर लोंढे यांचा सहभाग लाभला.१४ डिसेंबर दुसºया दिवशी ‘गांधी जीवन व विचार’ या विषयावर ज्येष्ठ पत्रकार, लेखक व सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत वानखेडे यांचे व्याख्यान व्याख्यान झाले. दुपारी ‘स्वरगदिमा’ गदिमा यांच्या जन्मशताब्दी निमित्त अप्रतिम असा संगीत कार्यक्रम सादर करण्यात आला. यामध्ये सादरकर्ते आर.एम. पटेल महिला महाविद्यालयाचे संगीत विभाग प्रमुख प्रा. राहूल भोरे, डॉ. प्रा. श्वेता डी. वेगड, प्रा. रेखा ठाकरे, प्रा. महेश पोगळे यांनी भाग घेतला होता.यावेळी मान्यवरांच्या हस्ते ग्रंथालयाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. प्रास्ताविक खुमेंद्र बोपचे यांनी केले. यावेळी ग्रंथालय पे्रमींनी मोठी गर्दी केली होती.