शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रा जिथे जिथे जाऊन आली तिथे तिथे पाकिस्तानचे ऑपरेशन सिंदूरवेळी हल्ले? गोल्डन टेंपल, पठाणकोट अन् काश्मीर...
2
कधीकाळी पाकिस्तानात राहत होते ज्योती मल्होत्राचे कुटुंब?; तपासात समोर आली नवी माहिती
3
"बिहार निवडणुकीसाठी भाजपाची खेळी..."; पहलगाम हल्ल्यावर काय म्हणाले यशवंत सिन्हा?
4
“मुंबईकर उद्धव ठाकरेंना त्यांची जागा दाखवतील, मविआच्या ५० जागाही येणार नाही”; भाजपाचा दावा
5
सुरक्षा दलांकडून नक्षलवाद्यांवर आणखी एक मोठा प्रहार, चकमकीत २६ नक्षली ठार
6
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची पहिली झलक समोर, 'या' दिवशी प्रदर्शित होणार चित्रपट
7
अबुझमाडमध्ये २७ नक्षल्यांना कंठस्नान; पाेलीस शहीद, १ काेटी बक्षीस असलेल्या बसवा राजूचा खात्मा
8
तुर्की अन् अझरबैजानला धक्का; भारताने आर्मेनियासोबत केला आकाश 1-एस क्षेपणास्त्र करार
9
इंग्रजी फाडफाड येत नाही, प्रश्नच मिटला! तुम्ही बोला, गुगल समोरच्याला त्याच्या भाषेत ऐकवणार...
10
पूजा खेडकर हिला मोठा दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून अटकपूर्व जामीन मंजूर
11
Jyoti Malhotra : "पाकिस्तानात माझं लग्न करुन द्या"; ज्योती मल्होत्राचं अली हसनसोबतच व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल
12
सोनिया आणि राहुल गांधी यांना झाला १४२ कोटींचा फायदा, नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडीचा कोर्टात आरोप   
13
मुलांचं लग्न जमवताना एकमेकांच्या प्रेमात पडले व्याही आणि विहीण! लग्नासाठी कोर्टात पोहोचले पण... 
14
डॉक्टर की कसाई...! ५० जणांच्या हत्येनंतरही हात थरथरले नाहीत; अंगावर काटा आणणारी थरारक घटना
15
'एक नंबर तुझी कंबर' व्हायरल गाण्यावर नारकर कपलचा डान्स, व्हिएतनाममधून शेअर केला Video
16
Mumbai Rains: मुंबईत पावसाचा हाहाकार! पवईत झाड कोसळल्याने दोन जण जखमी, एकाची प्रकृती गंंभीर
17
'ऑपरेशन सिंदूर'बाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या प्रा. अली खानला अंतरिम जामीन मंजूर
18
बापरे! गर्लफ्रेंड आहे की डाकू, बॉयफ्रेंडला रस्त्यात अडवला, कपडे फाटेपर्यंत चप्पलने मारले; छातीवर बसून गळा ...
19
“SCचे टॉप ५ जज सुट्ट्यांमध्ये कामावर, तरी प्रलंबित याचिकांचे खापर आमच्यावर”; CJI गवई संतापले
20
Mangal Gochar 2025: जूनमध्ये कुंजकेतू योग संघर्ष वाढवणार, 'या' पाच राशींना अधिक सतर्क राहावे लागणार!

गाव तेथे वाचनालय, शाळा तेथे ग्रंथालय राबवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 21:44 IST

ग्रंथ आणि वाचनालय एकाच गाडीचे दोन चाक आहेत. परंतु आधूनिकतेच्या युगात मोबाईल व इंटरनेच्या प्रभावाने युवा पिढीत ग्रंथ वाचनाची आवड कमी होत आहे. ई-ग्रंथालयमुळे ग्रंथालय व वाचकांची संख्या कमी झाली आहे.

ठळक मुद्देधनंजय दलाल : भंडारा येथे दोन दिवसीय ग्रंथोत्सवाचा विविध विषयांवरील व्याख्यानांनी समारोप

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : ग्रंथ आणि वाचनालय एकाच गाडीचे दोन चाक आहेत. परंतु आधूनिकतेच्या युगात मोबाईल व इंटरनेच्या प्रभावाने युवा पिढीत ग्रंथ वाचनाची आवड कमी होत आहे. ई-ग्रंथालयमुळे ग्रंथालय व वाचकांची संख्या कमी झाली आहे. यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करावी. वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी गाव तेथे वाचनालय, शाळा तेथे ग्रंथालय हा उपक्रम राबविणे गरजेचे आहे,असे प्रतिपादन जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष धनंजय दलाल यांनी केले.भंडारा येथील जकातदार विद्यालयाच्या पटांगणावर आयोजित दोन दिवसीय ग्रंथोत्सवाच्या समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते. यावेळी जिल्हा कोषागार अधिकारी शंकर बळी, जात पडताळणी समितीचे संशोधन अधिकारी संभाजी पवार, साहित्य परिषदेचे अध्यक्ष गुरुप्रसाद पाखमोडे, जकातदार विद्यालयाचे मुख्याध्यापक डि. आर. हटवार, जिल्हा ग्रंथालय अधिकारी खुमेंद्र बोपचे उपस्थित होते.वाचनालयाच्या पदाधिकाऱ्यांनी ग्रंथालयाची चळवळ परत एकदा निर्माण करावी. शिक्षकांनी एकत्र बसून चर्चेद्वारे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाविषयी आवड निर्माण करण्याची आवश्यकता असल्याचे दलाल यांनी सांगितले.वाचाल तर वाचाल या उक्तीवर प्रकाश टाकतांना शंकर बळी म्हणाले की, ग्रंथ नसते तर मानव प्रगती करु शकला नसता तो मागासच राहिला असता. आधुनिक युगात ग्रंथाचे वाचन कमी झाले आहे. आपण टी.व्ही., इंटरनेटच्या कथेतील प्रसंग विसरुन जातो. परंतु ग्रंथातील प्रसंग आपल्या आजीवन स्मरणात राहते. म्हणून ग्रंथ व वाचनाची आवड स्वत:ला लावा, ग्रंथ हाच आपला प्रथम गुरु आहे, असे त्यांनी सांगितले.ग्रंथ हेच खरे मार्गदर्शक आहेत. अध्यात्मिक जीवनाची प्रगती ग्रंथामुळे होते. निरपेक्ष वाचनामुळे वाचकांना निरामय आनंद प्राप्त होतो. म्हणून प्रत्येक गावात ग्रंथालय असावे, असे ग्रंथाची महत्ता सांगताना गुरुप्रसाद पाखमोडे म्हणाले. मोबाईल व इंटरनेटच्या वापरामुळे व्यक्ती ग्रंथालयात जात नाही. ग्रंथात जीवनाचा मौलीक साठा साठलेला आहे. ग्रंथाकडे वळा व त्याचा उपभोग घ्या. ग्रंथ वाचनाने ब्रम्हानंद मिळतो, हा आनंद उपमाहिन आहे. ग्रंथ चळवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण पृथ्वीतलावर प्रभावी व्हायला पाहिजे. ग्रंथ आहे म्हणून मी आहे, ही भावना मनात असली पाहिजे. मानवी जीवनातील गाठ सोडविणारे पुस्तक म्हणजे ग्रंथ आहे. वाचनविवेक प्रत्येकात असायला पाहिजे तरच आपली उन्नती होईल, असे ते म्हणाले. यावेळी संभाजी पवार मुख्याध्यापक डि.आर. हटवार यांचेही भाषण झाले.१३ डिसेंबर पहिल्या दिवशी दुपारी १.३० ते ३ या दरम्यान पु.ल. देशपांडे - महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व या विषयावर परिसंवाद झाले. विदर्भ साहित्य संघ, नागपूरच्या सदस्या प्रा. शुभदा फडणवीस, धनवटे नॅशनल महाविद्यालयाचे प्रा. डॉ. रविंद्र शोभणे, मनोहरभाई पटेल महाविद्यालय, साकोलीचे प्रा. डॉ. राजेश दिपटे, राष्ट्रीय आदर्श विज्ञान व कनिष्ठ महाविद्यालय रामटेकचे प्रा. जगदिश गुजरकर या परिसंवादात सहभागी होते. दुपारी आयोजित कवी संमेलनाच्या अध्यक्षस्थानी प्रल्हाद सोनवाने होते. तर प्रमोदकुमार आणेराव, सुरेश खोब्रागडे, प्रमोदकुमार साहु, अर्चना मोहनकर, डॉ. प्रभाकर लोंढे यांचा सहभाग लाभला.१४ डिसेंबर दुसºया दिवशी ‘गांधी जीवन व विचार’ या विषयावर ज्येष्ठ पत्रकार, लेखक व सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत वानखेडे यांचे व्याख्यान व्याख्यान झाले. दुपारी ‘स्वरगदिमा’ गदिमा यांच्या जन्मशताब्दी निमित्त अप्रतिम असा संगीत कार्यक्रम सादर करण्यात आला. यामध्ये सादरकर्ते आर.एम. पटेल महिला महाविद्यालयाचे संगीत विभाग प्रमुख प्रा. राहूल भोरे, डॉ. प्रा. श्वेता डी. वेगड, प्रा. रेखा ठाकरे, प्रा. महेश पोगळे यांनी भाग घेतला होता.यावेळी मान्यवरांच्या हस्ते ग्रंथालयाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. प्रास्ताविक खुमेंद्र बोपचे यांनी केले. यावेळी ग्रंथालय पे्रमींनी मोठी गर्दी केली होती.