शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

अन्न सुरक्षेत दहा लाख लाभार्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2018 10:26 PM

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : केंद्र सरकारने सुरु केलेल्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या लाभ जिल्ह्यातील दहा लाख पाच हजार ...

ठळक मुद्देधान्याचा लाभ : भंडारा जिल्ह्यात दोन लाख पाच हजार शिधापत्रिकाधारक

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : केंद्र सरकारने सुरु केलेल्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या लाभ जिल्ह्यातील दहा लाख पाच हजार ३४८ लाभार्थ्यांना होत असून दोन लाख पाच हजार ७६१ शिधापत्रिकाधारकांना धान्याचे वाटप केले जात आहे. या लाभार्थ्यांना दोन रुपये किलो गहू व तीन रुपये किलो तांदूळ याप्रमाणे धान्य वाटप होत आहे. फेब्रुवारी महिन्यापासून जिल्ह्यात या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी सुरु आहे.राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेमुळे तिहेरी शिधापत्रिका पध्दत संपुष्ठात आली. प्राधान्य कुटूंब योजना लागू झाली. यामध्ये दारिद्रय रेषेखालील १०० टक्के लाभार्थी, तसेच केशरी शिधापत्रिकेमधील ग्रामीण क्षेत्राकरिता ४४ हजारांपेक्षा कमी उत्पन्न व शहरी क्षेत्रातील ५९ हजारांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या लाभार्थ्यांना लाभ दिला जात आहे.भंडारा जिल्ह्यात एकूण सात लाख ११ हजार ६५ लाभार्थ्यांची निवड करून प्रतिव्यक्ती पाच किलो अन्नधान्याचा लाभ देण्यात येत आहे. तसेच अंत्योदय योजनेच्या ६४ हजार ५८५ शिधापत्रिकामधील दोन लाख ९४ हजार २८३ लाभार्थ्यांना प्रति कार्ड ३५ किलो अन्नधान्य दिले जात आहे. दोन्ही योजनेत जिल्ह्यातील एकुण दोन लाख पाच हजार ७६१ शिधापत्रिकेवरील १० लाख पाच हजार ३४८ लाभार्थ्यांना अन्नधान्याचा लाभ देण्यात येत आहे.सदर लाभार्थ्यांना दोन रुपये किलो गहू, तीन रुपये किलो तांदूळ याप्रमाणे धान्य वाटप करण्यात येत आहे.राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांमध्ये भंडारा तालुका ४१ हजार ५२४ शिधापत्रिका, १ लाख ९६ हजार ३६३ लाभार्थी. मोहाडी २९ हजार ९३ शिधापत्रिका, एक लाख ४० हजार ९२१ लाभार्थी. तुमसर ४२ हजार १३६ शिधापत्रिका, दोन लाख १० हजार २१७ लाभार्थी, लाखनी २२ हजार ५६९ शिधापत्रिका धारक आहेत.एक लाख ११ हजार ५६० लाभार्थी. साकोली २१ हजार ८०८ शिधापत्रिका, एक लाख ७ हजार ५६० लाभार्थी. पवनी २६ हजार ७५ शिधापत्रिका, एक लाख ३० हजार ९८५ लाभार्थी. लाखांदूर २२ हजार २२३ शिधापत्रिका, एक लाख ७ हजार ६५२ लाभार्थी असे दोन लाख पाच हजार ७६१ शिधापत्रिकांवरील १० लाख पाच हजार ३४८ लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळत आहे.४१ हजार शिधापत्रिकाधारकांसाठी पाठपुरावाराष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत प्रतीक्षेत असलेल्या ४१ हजार शिधापत्रिकाधारकांना योजनेचा लाभ मिळावा यासाठी पुरवठा विभागातर्फे पाठपुरावा सुरु आहे. शासनास वाढीव इष्टांकाची मागणी करण्यात आली आहे. या लाभार्थ्यांना लवकरच या योजनेचा लाभ मिळणार आहे. सदर वाढीव इष्टांक प्राप्त होताच प्रतीक्षेत असलेल्या केशरी शिधापत्रिकाधारकांना लाभ देण्यात येईल.