शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

जलतरण तलाव बंदच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2019 10:23 PM

शहरातील छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुलात असलेला जलतरण तलाव गत वर्षभरापासून बंद आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यातील हा एकमेव प्रशिक्षण असणारे केंद्र बंद असल्याने जलतरणाचा सराव करण्यासाठी येणारे शेकडो बच्चे कंपनी आल्यापावली परत जात आहेत.

ठळक मुद्देबच्चे कंपनीचा हिरमोड : जिल्हा क्रीडा विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष

इंद्रपाल कटकवार।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शहरातील छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुलात असलेला जलतरण तलाव गत वर्षभरापासून बंद आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यातील हा एकमेव प्रशिक्षण असणारे केंद्र बंद असल्याने जलतरणाचा सराव करण्यासाठी येणारे शेकडो बच्चे कंपनी आल्यापावली परत जात आहेत.जिल्हा मुख्यालयातील क्रीडा संकुलात असलेल्या जलतरण तलावाच्या समस्येबाबत साडेसाती संपलेली नाही. क्रीडा विभागात अनेक समस्यांचा अंबार असताना जलतरण तलावही त्यापासून सुटलेला नाही. मागील एक वर्षापूर्वी या तलावात एका बालकाचा बुडून मृत्यू झाला होता. त्या दिवसापासून हा तलाव बंदच आहे. उन्हाळ्याच्या सुट्या लागल्यामुळे अनेक पालक पाल्यांना घेऊन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय गाठतात. मात्र जलतरण तलावच बंद असल्याने त्यांची घोर निराशा होत आहे.या तलावाच्या देखभाल दुरूस्तीकडे कुणाचेही लक्ष नाही. त्यामुळे तलावात मोठ्या प्रमाणात शेवाळ साचले असून पाण्याला दुर्गंधी सुटली आहे. तसचे तलावाच्या टाईल्स निखळल्या आहेत.तलावाची दुरवस्थाऐसपैस जागेत असलेल्या या तलावाची चांगलीच दुरवस्था झाली आहे. मागील वर्षी हा तलाव प्रशिक्षणासाठी सुरु तरी होता. मात्र घटनेनंतर सदर प्रशिक्षण केंद्र बंद अवस्थेत आहे. तलावातील टाईल्स तुटलेल्या असून केरकचरा व धुळ साचलेली आहे. चेंजींग रुम व शॉवरचीही तशीच अवस्था आहे. सभोवताली झाडीझुडपी व केरकचरा दिसून येतो. निधीअभावी सदर जलतरण तलावाला गतवैभव प्राप्त होत नसल्याची माहिती समोर आली. दरम्यान जिल्हा क्रीडा विभाग व जिल्हाधिकारी कार्यालय यांनी याबाबत पुढाकार घेऊन जिल्ह्यातील एकमेव जलतरण तलाव पुन्हा सुरु करावा अशी मागणी आहे.जलतरण तलावची नेमकी काय स्थिती आहे याबाबत जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांशी चर्चा करू. योग्य तो निर्णय घेतला जाईल.-शांतनू गोयल,जिल्हाधिकारी, भंडारा.

टॅग्स :Swimmingपोहणे