शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

दहा महिन्यात १६ शेतकºयांच्या आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2017 21:52 IST

काळया मातीसह निर्सगानेही साथ दिली नाही. अशात कर्जबाजारीपणा व चिंतेने ग्रासून मागील दहा महिन्यात जिल्ह्यातील १६ शेतकºयांनी आत्महत्या केली.

ठळक मुद्देसातबाराची अडचण कायम : मदतीची पाच प्रकरणे निकाली

इंद्रपाल कटकवार।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : काळया मातीसह निर्सगानेही साथ दिली नाही. अशात कर्जबाजारीपणा व चिंतेने ग्रासून मागील दहा महिन्यात जिल्ह्यातील १६ शेतकºयांनी आत्महत्या केली. उल्लेखनीय म्हणजे यातील मृत पावलेल्या फक्त पाच शेतकºयांच्या कुटुंबाला एक लाखांची शासकीय मदत मिळाली आहे. नैसर्गिक आपत्ती अंतर्गत जीव गेल्यास चार लाखांची मदत मिळते, परंतु जगाच्या पोशिंदाच्या कुटुंबाला एक लाखांची तोकडी मदत दिली जाते.शेतकºयांच्या आत्महत्येच्या आकडेवारीवर नजर घातल्यास जिल्ह्यात मागील १४ वर्षात एकूण ४८४ शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहेत.यात सर्वात जास्त आत्महत्या सन २००८ मध्ये झाल्या. यात ६१ शेतकºयांनी विविध कारणांनी जगाचा निरोप घेतला. मात्र तिथेही शासन- प्रशासन मागे राहिले नाही. ६१ पैकी फक्त १२ शेतकरी कुटुंबियांना मदत देण्यात आली. मृत पावलेल्या शेतकºयाचे नाव सातबारावर नसणे, ही मुख्य बाब आर्थिक मदतीच्या आड आली आहे. त्यातही अन्य तांत्रिक अडचणींमुळे मृत पावलेल्या शेतकरी कुटुंबियातील नागरिाकांना अजूनपर्यंत मदत मिळालेली नाही.१४ वर्षात ४८४ आत्महत्याजिल्ह्यात सन २००३ ते २०१७ या कालावधीत एकुण ४८४ शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहेत. यात वर्षनिहाय अंतर्गत २००३ मध्ये ३, २००४ मध्ये ७, २००५ मध्ये १२, २००६ मध्ये ५१, २००७ मध्ये ५०, २००८ मध्ये ६१, २००९ मध्ये ३०, २०१० मध्ये ३१, २०११ मध्ये ४४, २०१२ मध्ये १८, २०१३ मध्ये १५, २०१४ मध्ये ३६, २०१५ मध्ये ५६ तर २०१६ मध्ये ५४ शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहेत. यात एकुण ४६८ शेतकरी आत्महत्येपैकी फक्त १९६ शेतकरी कुटुंबांना शासनाकडून मदत मिळाली.या कुटुंबांना मिळाली मदतयावर्षी जानेवारी ते आॅक्टोबर या दहा महिन्यांच्या कालावधीत १६ शेतकºयांनी आत्महत्या केली. यात विलास शंकर मारवाडे रा. बेटाळा (मोहाडी), रविंद्र ब्राम्हणकर रा. विरली(पवनी), प्रेमदास गणपत घरत रा. तिर्री(पवनी), ईश्वर तुळशीराम मदनकर रा. खोलमारा(लाखांदूर), बापू डोमा बोरकुटे रा.चोवा (भंडारा) असे मृत पावलेल्या शेतकºयांच्या कुटुंबांना प्रत्येकी एक लाखाची मदत देण्यात आली आहे. उर्वरित असलेल्या ११ प्रकरणांवर निर्णय झाला नसल्याची बाब समोर आली आहे.शासनाने ठरवून दिलेल्या नियमांतर्गत मृत पावलेल्या शेतकरी कुटुुंबीयांना प्रत्येकी १ लाख रुपयाप्रमाणे मदत देण्यात आली आहे. यावर्षी एकूण ५ प्रकरणे निकाली काढून मदत देण्यात आली.-अभिषेक नामदास, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, भंडारा.