शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
2
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
5
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
6
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
7
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
8
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
9
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
10
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
11
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
12
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
13
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
14
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
15
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
16
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
17
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
18
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
19
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
20
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार

दहा महिन्यात १६ शेतकºयांच्या आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2017 21:52 IST

काळया मातीसह निर्सगानेही साथ दिली नाही. अशात कर्जबाजारीपणा व चिंतेने ग्रासून मागील दहा महिन्यात जिल्ह्यातील १६ शेतकºयांनी आत्महत्या केली.

ठळक मुद्देसातबाराची अडचण कायम : मदतीची पाच प्रकरणे निकाली

इंद्रपाल कटकवार।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : काळया मातीसह निर्सगानेही साथ दिली नाही. अशात कर्जबाजारीपणा व चिंतेने ग्रासून मागील दहा महिन्यात जिल्ह्यातील १६ शेतकºयांनी आत्महत्या केली. उल्लेखनीय म्हणजे यातील मृत पावलेल्या फक्त पाच शेतकºयांच्या कुटुंबाला एक लाखांची शासकीय मदत मिळाली आहे. नैसर्गिक आपत्ती अंतर्गत जीव गेल्यास चार लाखांची मदत मिळते, परंतु जगाच्या पोशिंदाच्या कुटुंबाला एक लाखांची तोकडी मदत दिली जाते.शेतकºयांच्या आत्महत्येच्या आकडेवारीवर नजर घातल्यास जिल्ह्यात मागील १४ वर्षात एकूण ४८४ शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहेत.यात सर्वात जास्त आत्महत्या सन २००८ मध्ये झाल्या. यात ६१ शेतकºयांनी विविध कारणांनी जगाचा निरोप घेतला. मात्र तिथेही शासन- प्रशासन मागे राहिले नाही. ६१ पैकी फक्त १२ शेतकरी कुटुंबियांना मदत देण्यात आली. मृत पावलेल्या शेतकºयाचे नाव सातबारावर नसणे, ही मुख्य बाब आर्थिक मदतीच्या आड आली आहे. त्यातही अन्य तांत्रिक अडचणींमुळे मृत पावलेल्या शेतकरी कुटुंबियातील नागरिाकांना अजूनपर्यंत मदत मिळालेली नाही.१४ वर्षात ४८४ आत्महत्याजिल्ह्यात सन २००३ ते २०१७ या कालावधीत एकुण ४८४ शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहेत. यात वर्षनिहाय अंतर्गत २००३ मध्ये ३, २००४ मध्ये ७, २००५ मध्ये १२, २००६ मध्ये ५१, २००७ मध्ये ५०, २००८ मध्ये ६१, २००९ मध्ये ३०, २०१० मध्ये ३१, २०११ मध्ये ४४, २०१२ मध्ये १८, २०१३ मध्ये १५, २०१४ मध्ये ३६, २०१५ मध्ये ५६ तर २०१६ मध्ये ५४ शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहेत. यात एकुण ४६८ शेतकरी आत्महत्येपैकी फक्त १९६ शेतकरी कुटुंबांना शासनाकडून मदत मिळाली.या कुटुंबांना मिळाली मदतयावर्षी जानेवारी ते आॅक्टोबर या दहा महिन्यांच्या कालावधीत १६ शेतकºयांनी आत्महत्या केली. यात विलास शंकर मारवाडे रा. बेटाळा (मोहाडी), रविंद्र ब्राम्हणकर रा. विरली(पवनी), प्रेमदास गणपत घरत रा. तिर्री(पवनी), ईश्वर तुळशीराम मदनकर रा. खोलमारा(लाखांदूर), बापू डोमा बोरकुटे रा.चोवा (भंडारा) असे मृत पावलेल्या शेतकºयांच्या कुटुंबांना प्रत्येकी एक लाखाची मदत देण्यात आली आहे. उर्वरित असलेल्या ११ प्रकरणांवर निर्णय झाला नसल्याची बाब समोर आली आहे.शासनाने ठरवून दिलेल्या नियमांतर्गत मृत पावलेल्या शेतकरी कुटुुंबीयांना प्रत्येकी १ लाख रुपयाप्रमाणे मदत देण्यात आली आहे. यावर्षी एकूण ५ प्रकरणे निकाली काढून मदत देण्यात आली.-अभिषेक नामदास, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, भंडारा.