शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
3
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
4
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
5
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
6
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
7
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
8
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
9
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
10
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
11
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
12
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
13
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
14
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
15
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
16
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
17
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
18
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!
19
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
20
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल

दहा महिन्यात १६ शेतकºयांच्या आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2017 21:52 IST

काळया मातीसह निर्सगानेही साथ दिली नाही. अशात कर्जबाजारीपणा व चिंतेने ग्रासून मागील दहा महिन्यात जिल्ह्यातील १६ शेतकºयांनी आत्महत्या केली.

ठळक मुद्देसातबाराची अडचण कायम : मदतीची पाच प्रकरणे निकाली

इंद्रपाल कटकवार।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : काळया मातीसह निर्सगानेही साथ दिली नाही. अशात कर्जबाजारीपणा व चिंतेने ग्रासून मागील दहा महिन्यात जिल्ह्यातील १६ शेतकºयांनी आत्महत्या केली. उल्लेखनीय म्हणजे यातील मृत पावलेल्या फक्त पाच शेतकºयांच्या कुटुंबाला एक लाखांची शासकीय मदत मिळाली आहे. नैसर्गिक आपत्ती अंतर्गत जीव गेल्यास चार लाखांची मदत मिळते, परंतु जगाच्या पोशिंदाच्या कुटुंबाला एक लाखांची तोकडी मदत दिली जाते.शेतकºयांच्या आत्महत्येच्या आकडेवारीवर नजर घातल्यास जिल्ह्यात मागील १४ वर्षात एकूण ४८४ शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहेत.यात सर्वात जास्त आत्महत्या सन २००८ मध्ये झाल्या. यात ६१ शेतकºयांनी विविध कारणांनी जगाचा निरोप घेतला. मात्र तिथेही शासन- प्रशासन मागे राहिले नाही. ६१ पैकी फक्त १२ शेतकरी कुटुंबियांना मदत देण्यात आली. मृत पावलेल्या शेतकºयाचे नाव सातबारावर नसणे, ही मुख्य बाब आर्थिक मदतीच्या आड आली आहे. त्यातही अन्य तांत्रिक अडचणींमुळे मृत पावलेल्या शेतकरी कुटुंबियातील नागरिाकांना अजूनपर्यंत मदत मिळालेली नाही.१४ वर्षात ४८४ आत्महत्याजिल्ह्यात सन २००३ ते २०१७ या कालावधीत एकुण ४८४ शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहेत. यात वर्षनिहाय अंतर्गत २००३ मध्ये ३, २००४ मध्ये ७, २००५ मध्ये १२, २००६ मध्ये ५१, २००७ मध्ये ५०, २००८ मध्ये ६१, २००९ मध्ये ३०, २०१० मध्ये ३१, २०११ मध्ये ४४, २०१२ मध्ये १८, २०१३ मध्ये १५, २०१४ मध्ये ३६, २०१५ मध्ये ५६ तर २०१६ मध्ये ५४ शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहेत. यात एकुण ४६८ शेतकरी आत्महत्येपैकी फक्त १९६ शेतकरी कुटुंबांना शासनाकडून मदत मिळाली.या कुटुंबांना मिळाली मदतयावर्षी जानेवारी ते आॅक्टोबर या दहा महिन्यांच्या कालावधीत १६ शेतकºयांनी आत्महत्या केली. यात विलास शंकर मारवाडे रा. बेटाळा (मोहाडी), रविंद्र ब्राम्हणकर रा. विरली(पवनी), प्रेमदास गणपत घरत रा. तिर्री(पवनी), ईश्वर तुळशीराम मदनकर रा. खोलमारा(लाखांदूर), बापू डोमा बोरकुटे रा.चोवा (भंडारा) असे मृत पावलेल्या शेतकºयांच्या कुटुंबांना प्रत्येकी एक लाखाची मदत देण्यात आली आहे. उर्वरित असलेल्या ११ प्रकरणांवर निर्णय झाला नसल्याची बाब समोर आली आहे.शासनाने ठरवून दिलेल्या नियमांतर्गत मृत पावलेल्या शेतकरी कुटुुंबीयांना प्रत्येकी १ लाख रुपयाप्रमाणे मदत देण्यात आली आहे. यावर्षी एकूण ५ प्रकरणे निकाली काढून मदत देण्यात आली.-अभिषेक नामदास, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, भंडारा.