विद्यार्थ्यांनी मनातील न्यूनगंड दूर करावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2020 06:00 IST2020-01-03T06:00:00+5:302020-01-03T06:00:27+5:30
जनता कनिष्ठ महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलन उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पर्यवेक्षक शरद भेलकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून पशुवैद्यकीय सहाय्यक उपसंचालक डॉ.कृपाचार्य बोरकर, प्राचार्य हेमंत केळवदे, नगरसेवक सचिन बोपचे उपस्थित होते. नगराध्यक्ष प्रदीप पडोळे पुढे म्हणाले, तीनही शाखा सारख्याच असून कठीण परिश्रमाने सामाजिक शास्त्राचे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात प्रशासकीय सेवेत दाखल होत आहेत.

विद्यार्थ्यांनी मनातील न्यूनगंड दूर करावा
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : स्पर्धेच्या युगात सामाजिक शास्त्राच्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश प्राप्त केले आहे. परिश्रम, जिद्दीच्या भरवशावर अनेक विद्यार्थ्यांनी प्रशासकीय नोकऱ्या प्राप्त केल्या. विज्ञानाच्या विद्यार्थ्यांपेक्षा तुम्ही कुठेही कमी नाही. मनातील न्यूनगंड दूर सारुन अभ्यासाला लागा, असा सल्ला नगराध्यक्ष प्रदीप पडोळे यांनी दिला.
जनता कनिष्ठ महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलन उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पर्यवेक्षक शरद भेलकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून पशुवैद्यकीय सहाय्यक उपसंचालक डॉ.कृपाचार्य बोरकर, प्राचार्य हेमंत केळवदे, नगरसेवक सचिन बोपचे उपस्थित होते.
नगराध्यक्ष प्रदीप पडोळे पुढे म्हणाले, तीनही शाखा सारख्याच असून कठीण परिश्रमाने सामाजिक शास्त्राचे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात प्रशासकीय सेवेत दाखल होत आहेत. आर्थिक स्थिती हलाखीची असताना मी अभियंता झालो. शिक्षणाकरिता गरीबी कधीही आड येत नाही. केवळ ध्येय निश्चित करण्याची गरज आाहे.
याप्रसंगी नगरसेवक सचिन बोपचे, प्राचार्य हेमंत केळवदे, डॉ.कृपाचार्य बोरकर,पर्यवेक्षक शरद भेलकर यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती मातेचे पूजन करून संस्थेचे संस्थापक स्व.श्यामसुंदर बोरकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करून करण्यात आले. तीन दिवसीय स्नेहसंमेलनात शेतकऱ्यांची आत्महत्या, व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मूलन, बेटी बचाओ-बेटी पढाव, पर्यावरण रक्षण, आदिवासींची संस्कृती इत्यादीवर विद्यार्थ्यांनी नाटीका सादर केल्या.
स्वयंस्फूर्त भाषण, वादविवाद स्पर्धा, एकलनृत्य, समूहनृत्य, गीत गायन, अनोखी महफील, मुकनाट्य, बचाव स्पर्धा इत्यादी कार्यक्रम विद्यार्थ्यांनी सादर करून श्रोत्यांची मने जिंकली. संचालन प्रा.शशीकला पटले,प्रा.एन.टी. कापगते, अतिथींचा परिचय प्रा.मोहन भोयर,प्रास्ताविक प्रा.विद्यानंद भगत, आभार प्रा.आशिष खोब्रागडे यांनी मानल्या.
स्नेहसंमेलनाच्या यशस्वीतेसाठी प्रा.नितीन पाटील, प्रा.गणेश चाचिरे, प्रा.सविता बोरकर, धर्मेंद्र कोचे तथा विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.