बीटीबी सब्जीमंडीत शासन निर्णयाचे काटेकोर पालन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2020 05:00 IST2020-04-17T05:00:00+5:302020-04-17T05:00:40+5:30

बीटीबी सब्जीमंडीत व्यापारी व शेतकऱ्यामध्ये सोशलसाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. कठडे आणि दोर बाधून पाच फुटाचे अंतर तयार केले आहे. सब्जीमंडीच्या प्रवेशद्वारावरच सॅनिटायझर पंप लावण्यात आला आहे. यातून सर्व शेतकरी आणि व्यापारी जाणे बंधनकारक करण्यात आले आहे. १२ सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले असून येथे असणाºया सर्वांना प्रवेशपत्र आणि मास्क लावणे सक्तीचे करण्यात आले आहे

Strict adherence to the Government's decision in BTB Vegetable | बीटीबी सब्जीमंडीत शासन निर्णयाचे काटेकोर पालन

बीटीबी सब्जीमंडीत शासन निर्णयाचे काटेकोर पालन

ठळक मुद्देबंडू बारापात्रे : सॅनीटायझरसह सोशल डिस्टन्सिंगमध्ये व्यवहार

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : लॉकडाऊनच्या काळात शेतकऱ्यांसाठी वरदान ठरू पाहणाºया येथील बीटीबी सब्जीमंडीत कोरोना संकटाच्या काळात शासन निर्णयाचे काटेकोरपणे पालन केले जात असून सॅनिटायझरसह सोशल डिस्टन्सिंगमध्ये व्यवहार केले जात आहे. येथे होणाऱ्या भाजीपाल्याच्या खरेदीविक्रीतून दररोज साठ ते सत्तर लाख शेतकऱ्यांपर्यंत या काळात पोहोचत असल्याचे बीटीबी सब्जीमंडीचे अध्यक्ष बंडू बारापात्रे यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.
बीटीबी सब्जीमंडीत व्यापारी व शेतकऱ्यामध्ये सोशलसाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. कठडे आणि दोर बाधून पाच फुटाचे अंतर तयार केले आहे. सब्जीमंडीच्या प्रवेशद्वारावरच सॅनिटायझर पंप लावण्यात आला आहे. यातून सर्व शेतकरी आणि व्यापारी जाणे बंधनकारक करण्यात आले आहे. १२ सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले असून येथे असणाºया सर्वांना प्रवेशपत्र आणि मास्क लावणे सक्तीचे करण्यात आले आहे. बाजार सकाळी ६ वाजतापासून सुरु होत असून ध्वनीक्षेपकावरुन सतत सुचना दिल्या जातात. यासाठी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक कृषी अधिकाºयाचे सहकार्य लाभत असल्याचे बंडू बारापात्रे यांनी सांगितले. कोरोना सारख्या गंभीर आजाराच्या परिस्थितीत शेतकरी आपला जीव धोक्यात घालून जिल्ह्यातील दहा लाख नागरिकांपर्यंत भाजीपाला पोहचवित आहे, असे असताना प्रशासनाकडून आम्हाला सहकार्याची अपेक्षा आहे. एवढे असतानाही काहीजण आमच्यावर आक्षेप घेत आहे. आम्ही चुकलो नाही पण प्रशासनाला तसे वाटत असेल तर भाजीपाला बंदचा आदेश द्यावा, यात शेतकऱ्याचेच नुकसान होणार आहे. अत्याचार होत असतील तर आम्ही रस्त्यावर उतरु अशा इशारा बारापात्रे यांनी दिला. यावेळी भाजीव्यापारी अतूल मानकर, इमरान शेख, दिपक पराते, मंगेश राऊत, महेंद्र मेंढे यांच्यासह आमगावचे शेतकरी राजेश सार्वे, डवाचे शेतकरी प्रकाश मस्के, गांगलवाडाचे रमेश सलामे, गराडाचे जगदिश निंबार्ते यांनीही आपले अनुभव सांगितले. पत्रपरिषदेला सुधीर धकाते उपस्थित होते.

Web Title: Strict adherence to the Government's decision in BTB Vegetable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.