शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

श्रावणसरीऐवजी वाहतात घामाच्या धारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:38 IST

पालांदूर : पावसाने दडी मारल्याने श्रावण सरी ऐवजी घामाच्या धारा वाहत असून असह्य उकाड्याने जनजीवन प्रभावित आहे. दिवसाला घामाच्या ...

पालांदूर : पावसाने दडी मारल्याने श्रावण सरी ऐवजी घामाच्या धारा वाहत असून असह्य उकाड्याने जनजीवन प्रभावित आहे. दिवसाला घामाच्या व रात्रीला पावसाच्या धारा असे निसर्गाचं चक्र दोन दिवसांपासून अनुभवायला येत आहे. यंदा पाऊस रूसल्यासारखा दिसत असून शेतकऱ्यांनाच नव्हे तर सर्वांना जोरदार पावसाची अपेक्षा आहे.

ऑगस्ट महिन्यात पावसाचा समजला जातो. याच महिन्याच्या भरवशावर वर्षभराच्या पाण्याचे नियोजन केले जातो. पिण्यासाठी, शेतीसाठी, उद्योगधंद्यासाठी भूजल पातळी अत्यंत महत्त्वाचा आहे. गतवर्षीच्या तुलनेत या वर्षी ऑगस्ट महिन्यात अपेक्षित पाऊस झाला नाही. गत वर्षी ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात संपूर्ण भंडारा जिल्ह्याला महापुराने बेजार केले होते. धरणे, तलाव, बोडी, ओव्हरफ्लो होत धान पिकाचे मोठे नुकसान झाले होते. कित्येकांचे घरसुद्धा पाण्याखाली आले होते. परिस्थिती पूर्वपदावर येण्याकरता किमान हप्ता बराच कालावधी लोटला होता. परंतु या वर्षात मात्र पाऊस रुसल्यासारखा येत आहे. कुठे पडतो तर कुठे अजिबातच पडत नाही. जिल्ह्याच्या काही भागातील रोवणी नुकतीच आटोपलेली आहेत. तर पालांदूर शेजारील एक-दोन गावात रोवणी काही शेतकऱ्यांनी पाण्याअभावी केलेली नाही.

बॉक्स

रोगराईला आमंत्रण

वातावरणातील बदलामुळे डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात झालेली आहे. त्यांचे नियंत्रण करण्याकरिता प्रशासन अपुरे पडत आहे. पालांदूर व परिसरात डेंग्यूसदृश आजाराचे रुग्ण वाढतच आहेत. सर्दी, ताप, खोकला आदीचेसुद्धा रुग्ण दिसत आहेत. उष्ण-दमट हवामानामुळे जनजीवन प्रभावित झाल्याने आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

रात्रीला येतो पाऊस

पालांदूर परिसरात दोन दिवसापासून रात्रीच्या सुमारास सामान्य स्वरूपाचा पाऊस पडतो आहे. हा पाऊस समान न पडता तीन किलोमीटर परिसरातच पडताना दिसतो. त्यामुळे ‘कही खुशी कही गम’ अशी अवस्था अनुभवास येते.

मोठ्या पावसाची अपेक्षा

जिल्ह्यातील शेती महत्त्वाचा आधार आहे. शेतीला पाण्याची नितांत गरज आहे. पावसाळ्याचे दिवस असल्याने दररोज किंवा एक-दोन दिवसांआड मोठ्या पावसाची गरज आहे. परंतु अजूनही दोन महिन्याचा कालावधी लोटून मोठा पाऊस झालाच नाही. नदी-नाले पोटातच प्रवाहित आहेत. त्यामुळे भूजल क्षमता अपेक्षित वाढलेली नसल्याने उद्याची शेती चिंतेचा विषय ठरत आहे.

धान पिकावर रोगराईचे सावट!

वातावरणातील बदलामुळे धान पीक रोगराईच्या सावटात आहे. खोडकिडी, गादमासी, करपा, कडा करपा आधी रोगांची लागण धान पिकावर झालेली आहे.