शहरं
Join us  
Trending Stories
1
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
2
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
3
पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
4
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
5
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
6
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!
7
"पती नेत्यांना पुरवतो २० वर्षांच्या मुली, मला…’’, महिलेच्या आरोपांनी या राज्यातील राजकारण तापले   
8
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
9
ठरलं ! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार IPL फायनल; या मैदानात होणार प्लेऑफ्सचे २ सामने
10
पाकिस्तानने आपल्याच नागरिकांवर केला ड्रोन हल्ला, चार मुलांचा मृत्यू
11
"सरन्यायाधीश गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग करणाऱ्यांवर करावाई करा’’, काँग्रेसचं राष्ट्रपतींना पत्र  
12
पहलगाम हल्ल्यानंतर भारतासमोर नवे आव्हान; दहशतवाद्यांकडून इंडियन आर्मी युनिफॉर्मचा वापर
13
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
14
'ऑपरेशन सिंदूर’ला छोटीशी लढाई म्हणत मल्लिकार्जुन खर्गेंचा मोदींना सवाल, म्हणाले...   
15
"हे खूपच धक्कादायक..."; मॉर्फ केलेले फोटो, खोट्या बातम्या पाहून प्रिती झिंटा भडकली, म्हणाली...
16
Online Gaming Addiction: ऑनलाईन गेमचा नादच लय वाईट...; कर्जात बुडालेल्या तरुणानं उचललं टोकाचं पाऊल
17
Maharashtra Rain: साताऱ्यात पुन्हा वळीव बरसला; यवतेश्वर घाटात टॉवर कोसळला! 
18
'ढोंगी आणि बकवास लेकाचे'; छगन भुजबळ मंत्री होताच संजय राऊतांनी कोणावर डागली तोफ?
19
Ulhasnagar: आता उल्हासनगरात गुन्हेगारांवर 'अशी' ठेवली जाणार नजर!
20
दिग्वेश राठीनं शायनिंग मारण्याच्या नादात IPL पगारातील किती रक्कम उडवली माहितीये?

श्रावणसरीऐवजी वाहतात घामाच्या धारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:38 IST

पालांदूर : पावसाने दडी मारल्याने श्रावण सरी ऐवजी घामाच्या धारा वाहत असून असह्य उकाड्याने जनजीवन प्रभावित आहे. दिवसाला घामाच्या ...

पालांदूर : पावसाने दडी मारल्याने श्रावण सरी ऐवजी घामाच्या धारा वाहत असून असह्य उकाड्याने जनजीवन प्रभावित आहे. दिवसाला घामाच्या व रात्रीला पावसाच्या धारा असे निसर्गाचं चक्र दोन दिवसांपासून अनुभवायला येत आहे. यंदा पाऊस रूसल्यासारखा दिसत असून शेतकऱ्यांनाच नव्हे तर सर्वांना जोरदार पावसाची अपेक्षा आहे.

ऑगस्ट महिन्यात पावसाचा समजला जातो. याच महिन्याच्या भरवशावर वर्षभराच्या पाण्याचे नियोजन केले जातो. पिण्यासाठी, शेतीसाठी, उद्योगधंद्यासाठी भूजल पातळी अत्यंत महत्त्वाचा आहे. गतवर्षीच्या तुलनेत या वर्षी ऑगस्ट महिन्यात अपेक्षित पाऊस झाला नाही. गत वर्षी ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात संपूर्ण भंडारा जिल्ह्याला महापुराने बेजार केले होते. धरणे, तलाव, बोडी, ओव्हरफ्लो होत धान पिकाचे मोठे नुकसान झाले होते. कित्येकांचे घरसुद्धा पाण्याखाली आले होते. परिस्थिती पूर्वपदावर येण्याकरता किमान हप्ता बराच कालावधी लोटला होता. परंतु या वर्षात मात्र पाऊस रुसल्यासारखा येत आहे. कुठे पडतो तर कुठे अजिबातच पडत नाही. जिल्ह्याच्या काही भागातील रोवणी नुकतीच आटोपलेली आहेत. तर पालांदूर शेजारील एक-दोन गावात रोवणी काही शेतकऱ्यांनी पाण्याअभावी केलेली नाही.

बॉक्स

रोगराईला आमंत्रण

वातावरणातील बदलामुळे डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात झालेली आहे. त्यांचे नियंत्रण करण्याकरिता प्रशासन अपुरे पडत आहे. पालांदूर व परिसरात डेंग्यूसदृश आजाराचे रुग्ण वाढतच आहेत. सर्दी, ताप, खोकला आदीचेसुद्धा रुग्ण दिसत आहेत. उष्ण-दमट हवामानामुळे जनजीवन प्रभावित झाल्याने आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

रात्रीला येतो पाऊस

पालांदूर परिसरात दोन दिवसापासून रात्रीच्या सुमारास सामान्य स्वरूपाचा पाऊस पडतो आहे. हा पाऊस समान न पडता तीन किलोमीटर परिसरातच पडताना दिसतो. त्यामुळे ‘कही खुशी कही गम’ अशी अवस्था अनुभवास येते.

मोठ्या पावसाची अपेक्षा

जिल्ह्यातील शेती महत्त्वाचा आधार आहे. शेतीला पाण्याची नितांत गरज आहे. पावसाळ्याचे दिवस असल्याने दररोज किंवा एक-दोन दिवसांआड मोठ्या पावसाची गरज आहे. परंतु अजूनही दोन महिन्याचा कालावधी लोटून मोठा पाऊस झालाच नाही. नदी-नाले पोटातच प्रवाहित आहेत. त्यामुळे भूजल क्षमता अपेक्षित वाढलेली नसल्याने उद्याची शेती चिंतेचा विषय ठरत आहे.

धान पिकावर रोगराईचे सावट!

वातावरणातील बदलामुळे धान पीक रोगराईच्या सावटात आहे. खोडकिडी, गादमासी, करपा, कडा करपा आधी रोगांची लागण धान पिकावर झालेली आहे.