शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
टेस्टमधील खतरनाक स्पेल! स्टार्कनं १५ चेंडूत २ धावा खर्च करत साधला ५ विकेट्सचा विश्वविक्रमी डाव
5
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
6
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
7
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
8
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
9
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
10
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
11
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
12
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
13
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

एसटीला अवैध वाहतुकीचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 00:52 IST

‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे ब्रीदवाक्य असलेल्या एसटी विभागाला सध्या अवैध वाहतुकीचा सामना करावा लागत असून खासगी वाहनचालक बस वेळेवर येत नसल्याच्या संधीचा फायदा उठवत बसस्थानकातून प्रवासी पळवत आहेत. याचा फटका एसटी विभागाला बसत असून यावर पोलिसांनी लक्ष देण्याची गरज आहे .

ठळक मुद्देमहसूल बुडतोय : कारवाई मात्र शून्य, जिल्ह्यात अवैध वाहतुकीला उधाण

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे ब्रीदवाक्य असलेल्या एसटी विभागाला सध्या अवैध वाहतुकीचा सामना करावा लागत असून खासगी वाहनचालक बस वेळेवर येत नसल्याच्या संधीचा फायदा उठवत बसस्थानकातून प्रवासी पळवत आहेत. याचा फटका एसटी विभागाला बसत असून यावर पोलिसांनी लक्ष देण्याची गरज आहे .परिवहन विभागाकडून विद्यार्थांसह, वृद्धांसाठी अनेक प्रकारच्या चांगल्या योजना राबवल्या जात असल्या तरी प्रवासी वाढीसाठी मात्र एस टी विभागाला कसरत करावी लागत आहे भंडारा जिल्हयात एस टी ची चार आगारे आहेत. अनेक विभागातील ग्रामीण बसफेऱ्या अनियमित होत असल्याने नाइलाजास्तव प्रवासी खाजगी वाहतुकीकडे वळत आहे त्याचाच परिणाम एस टी ला लाखो रूपयांचा फटका सहन करावा लागत आहे. एस टी विभागाकडून अनेक जाहीरीतींद्वारे प्रवाशांना जागृत करण्याचे काम सुरु असले तरी अधिकाऱ्यांचे हे प्रयत्न तोकडे पडत आहेत यासाठी नागरिकांनी स्वत दक्षता घ्यावी.तालुकास्तरापासून ते जिल्हास्तरापर्यत जवळपास सर्वच ठिकाणी काळीपिवळी, तीन ते चारचाकी आॅटो यासारख्या वाहनांतून ही अवैध वाहतूक सुरु आहे. राष्ट्रीय महामार्गावरील लाखनी, जवाहरनगर, साकोली यासारख्या प्रमुख महामार्गावर अवैध वाहतुक नित्याचीच बनली असून अनेक प्रवाशांना यापुर्वीही नाहक जीव गमवावा लागला आहे.महाशिवरात्रीनिमित्त सर्वत्र तिर्थस्थळावर यात्रा भरत असते. या महाशिवारात्रीच्या पर्वावर सर्वच बसस्थानक परिसरात भाविकांची गर्दी वाढत असल्याने खाजगी वाहनचालक प्रवाश्यांचा जीव धोक्यात घालून क्षमतेक्षा अधिक प्रवासी बसवून वाहतूक करत आहेत बरेच प्रवासी तर दाराजवळ लोंबकळत असतात बºयाचदा तर चालकांच्या अरेरावीपणामुळे प्रवाशांना मध्येच रस्त्यात उतरवण्याचे प्रकार घडले आहेत.दाटीवाटीने बसलेल्या प्रवाशांमुळे चालकाला नीट गाडीसुध्दा चालविता येत नाही. त्यामुळे क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी भरुन वाहतूक होत आहे. भरधाव प्रवाशी वाहतुकीमुळे मोठ्या दुर्घटना होण्याचा धोका वाढत आहे.अवैध वाहतुकीला पोलिसांनी वचक बसविण्याची गरज निर्माण झाली आहे, अशी मागणी जनसामान्यातून होत आहे.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूक