शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

एसटी संपाचा भंडारा विभागाला फटका, आठ कोटींचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2021 15:49 IST

२ नोव्हेंबरपासून साकोली, भंडारा आणि पवनी आगारातील कर्मचारी संपावर गेले आहेत. गत १७ दिवसांपासून एसटीची बससेवा बंद आहे. त्यामुळे दररोज सरासरी ४५ लाखांचे नुकसान होत असून, आतापर्यंत तब्बल ८ कोटी रुपयांचा फटका महामंडळाला बसला आहे.

ठळक मुद्देदीड हजार कर्मचारी संपात : ३६७ बसेसची चाके थांबली

भंडारा : राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे एकट्या भंडारा विभागाचे तब्बल आठ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. दीड हजार कर्मचारी या संपात सहभागी झाले असून, ३६७ बस आगारात उभ्या आहेत. यामुळे आता प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे.

राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे शासनात विलीनीकरण करावे, या प्रमुख मागणीसाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे कर्मचारी संपावर गेले आहेत. भंडारा विभागात संपाची सुरुवात ३० ऑक्टोबर रोजी तुमसर आगारातून झाली. दुसऱ्या दिवशी ३१ ऑक्टोबरला तिरोडा आणि गोंदिया आगारातील कर्मचारी, तर २ नोव्हेंबरपासून साकोली, भंडारा आणि पवनी आगारातील कर्मचारी संपावर गेले आहेत. गत १७ दिवसांपासून एसटीची बससेवा बंद आहे. त्यामुळे दररोज सरासरी ४५ लाखांचे नुकसान होत असून, आतापर्यंत तब्बल ८ कोटी रुपयांचा फटका एसटी महामंडळाला बसला आहे.

भंडारा विभागात भंडारा, पवनी, साकोली, तुमसर, तिरोडा आणि गोंदिया असे सहा आगार आहेत. या आगारात १,८३५ कर्मचारी कार्यरत आहेत. ३६७ बसेस असून, दररोज २,६५२ फेऱ्या होतात. मात्र, संपापासून दीड हजार कर्मचारी कामावर आले नाहीत. त्यामुळे सर्व बसफेऱ्या रद्द झाल्या आहेत. ऐन सणासुदीच्या काळात बससेवा बंद असल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. दिवाळीच्या पर्वात बाहेरगावी जाणाऱ्यांना खासगी वाहनाने अतिरिक्त पैसे मोजावे लागत आहेत. एसटी महामंडळाचा संप कधी मिटणार, याची प्रतीक्षा सर्वांना आहे.

...तर सेवा समाप्तीची कारवाई

राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या भंडारा विभागात रोजंदारी कर्मचारी आहेत. संपाच्या कालावधीत रोजंदारी कर्मचारीही कामावर येत नाहीत. त्यांना कामावर येण्यासाठी भंडारा विभागाचे प्रभारी विभाग नियंत्रक महेंद्र नेवारे यांनी बुधवारी नोटीस बजावली. २४ तासात कामावर हजर व्हा अन्यथा सेवा समाप्तीची कारवाई करण्यात येईल, असे बजावण्यात आले आहे. भंडारा विभागातील ७९ चालक, ९ वाहक आणि दोन सहाय्यक कर्मचाऱ्यांना ही नोटीस बजावली आहे. आता किती कर्मचारी कामावर येतात, याकडे संपकरी कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

पोलीस संरक्षणात निघाली एक फेरी

संपामुळे प्रवाशांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी परिवहन महामंडळाने १५ नोव्हेंबर रोजी साकोली भंडारा ही बसफेरी काढली. पोलीस संरक्षणात काढण्यात आलेल्या या फेरीत ११ प्रवासी होते, तर साकोली परतीच्या प्रवासात ३३ प्रवासी होेते. परंतु एका फेरीनंतर पुन्हा दुसरी फेरी काढण्यात आली नाही. पहिल्या फेरीवर आलेल्या कर्मचाऱ्यांनी बसकडे येणे टाळले. त्यामुळे हाही प्रयोग फसल्याचे दिसत आहे.

टॅग्स :ST Strikeएसटी संपagitationआंदोलनEmployeeकर्मचारीstate transportएसटीPublic Transportसार्वजनिक वाहतूक