शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसचे १५ खासदार विकले गेले, मुख्यमंत्री रेड्डींच्या आदेशामुळे भाजपच्या उमेदवाराला केले मतदान"; कोणत्या आमदाराने केला गौप्यस्फोट?
2
"नक्की कोण जिंकलं? आणि…’’, राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून शाह पिता-पुत्रावर टीकेचा बाऊन्सर 
3
केवळ ₹१ विकली जाणार होती अपोलो टायर्स; आज आहे टीम इंडियाची ओळख, कोण आहेत मालक, किती आहे संपत्ती?
4
नक्षलवादी संघटनांकडून केंद्र सरकारला शांततेचा प्रस्ताव; १ महिना सशस्त्र संघर्ष विरामाची मागणी
5
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
6
केवळ संशयामुळे लाेकांची झडती घेता येणार नाही, अपवादात्मक परिस्थितीत लेखी कारणे बंधनकारक : कोर्ट
7
सोशल मीडियावर ‘फोटो एडिट’ ॲपची धूम; सुरक्षित ठेवा तुमचे फोटो, फसवणूक वाढली
8
मुलाच्या वाढदिवसादिवशी पोहोचलं वडिलांचं शेवटचं गिफ्ट, कुटुंबीयांना झाले अश्रू अनावर
9
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार!
10
"इथं काम करणं आता कठीण..."; रस्त्यांवरील खड्डे अन् वाहतूक कोंडीमुळे बंगळुरूतील कंपनी शिफ्ट होणार
11
Crime: "माझ्या बहिणीपासून दूर राहा", वारंवार समजावूनही मित्र ऐकत नव्हता; मग...
12
Today's Horoscope : शेअर्स बाजारात लाभ होईल, आर्थिक स्थिती सुधारेल; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य काय?
13
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
14
अभियांत्रिकीचे यंदा विक्रमी १ लाख ६६ हजार प्रवेश; कॉम्प्युटर, आयटी, एआयच्या ८८ टक्के जागा भरल्या
15
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
16
परशुराम महामंडळाच्या अध्यक्षांना दिला मंत्रिदर्जा; अजित पवार गटाचे आशिष दामले आहेत अध्यक्ष
17
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल
18
उत्तर बार्शी भागातून वाहणाऱ्या चांदनी नदीला महापूर, नरसिंह मंदिर पाण्याखाली!
19
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
20
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर

एसटी बंदच; गुरूजी सांगा शाळेत कसं येऊ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2021 05:00 IST

राज्य परिवहन महामंडळाच्या भंडारा विभागांतर्गत सर्वच तालुक्यात मानव विकास मिशनच्या बसेस धावत असतात. मात्र संपामुळे या सर्व बसेस बंद असल्याने विद्यार्थ्यांना शाळेत जाणे जीकरिचे होत आहे. मिळेल त्या साधनाने विद्यार्थी जात असले तरी शाळेत विद्यार्थ्यांची संख्या चांगलीच रोडवल्याचे दिसून येते. ग्रामीण भागातील विद्यार्थी बसअभावी शिक्षणापासून वंचित राहत असल्याचे चित्र असून या शैक्षणिक खोळंब्याला जबाबदार कोण, असा सवालही उपस्थित केला जात आहे.

इंद्रपाल कटकवारलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : तीन दिवसांपासून ग्रामीण क्षेत्रातील पाचवी ते बारावीच्या शाळा सुरू झाल्या आहेत. मात्र १५ दिवसांपासून एसटीचासंप सुरू असून मानव विकासच्या बसमधून शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठी गोची झाली आहे. बसच गावापर्यंत जात नसल्याने गुरूजी आम्ही शाळेत येवू तरी कसे, असा प्रश्न विद्यार्थी विचारीत आहेत.राज्य परिवहन महामंडळाच्या भंडारा विभागांतर्गत सर्वच तालुक्यात मानव विकास मिशनच्या बसेस धावत असतात. मात्र संपामुळे या सर्व बसेस बंद असल्याने विद्यार्थ्यांना शाळेत जाणे जीकरिचे होत आहे. मिळेल त्या साधनाने विद्यार्थी जात असले तरी शाळेत विद्यार्थ्यांची संख्या चांगलीच रोडवल्याचे दिसून येते. ग्रामीण भागातील विद्यार्थी बसअभावी शिक्षणापासून वंचित राहत असल्याचे चित्र असून या शैक्षणिक खोळंब्याला जबाबदार कोण, असा सवालही उपस्थित केला जात आहे. सध्या तरी संप मिटण्याची प्रतीक्षा विद्यार्थ्यांना करावी लागणार आहे.

रोज दुप्पट भाडे कसे परवडणार?

खाजगी बससेवेचा आधार घेवून मी शाळेत जात आहे. मात्र त्यासाठी दुप्पट भाडे द्यावे लागत आहे. १२ रुपयाची तिकीट आता थेट २२ रुपयाला पडत असल्याने रोज दहा रुपये अतिरिक्त देणे परवडण्यासारखे नाही.   -एक विद्यार्थी.

मानव विकासच्या बसमधून मी शाळेत जात होतो. आता ऑटो रिक्षाच्या सहायाने शाळेत जात आहे. तीन दिवसांपासून जवळपास ५० रुपये अधिकचे भाड्यापोटी मोजले आहे, असे किती दिवस चालायचे.   -एक विद्यार्थी.

 

टॅग्स :state transportएसटीStrikeसंप