आपत्ती काळात शाळांना विशेष अनुदान द्यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2020 05:01 IST2020-07-17T05:00:00+5:302020-07-17T05:01:08+5:30

प्रशासनाच्या माध्यमातून शासनाला प्रत्येक बाबींची माहिती दिल्या जाते. खडा न खडा राज्याची परिस्थितीची जाणीव शासनाला असते. मग शाळा सुरू करण्याचा स्पष्ट निर्णय शासनानेच घ्यावा. शाळांवर जबाबदारी सोपवू नयेच असे निवेदनात नमूद आहे. कोरोना विषाणूची भीती अजूनही कायम आहे. कोरोना अजूनही आटोक्यात आलेला नाही.तरीही शाळा सुरू कशा सुरु करण्याची घाई होत आहे.

Special grants should be given to schools in times of disaster | आपत्ती काळात शाळांना विशेष अनुदान द्यावे

आपत्ती काळात शाळांना विशेष अनुदान द्यावे

ठळक मुद्देगटशिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन : भंडारा तालुका मुख्याध्यापक संघाची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : शाळा सुरु करा, त्यासाठी उपाययोजना करण्यासाठी आपत्ती काळात शासनाने विशेष निधी सर्व शाळांना उपलब्ध करून देण्यात यावा, यासह अन्य मागण्यांचे निवेदन भंडारा तालुका मुख्याध्यापक संघाच्या वतीने गटशिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आले.
प्रशासनाच्या माध्यमातून शासनाला प्रत्येक बाबींची माहिती दिल्या जाते. खडा न खडा राज्याची परिस्थितीची जाणीव शासनाला असते. मग शाळा सुरू करण्याचा स्पष्ट निर्णय शासनानेच घ्यावा. शाळांवर जबाबदारी सोपवू नयेच असे निवेदनात नमूद आहे. कोरोना विषाणूची भीती अजूनही कायम आहे. कोरोना अजूनही आटोक्यात आलेला नाही.तरीही शाळा सुरू कशा सुरु करण्याची घाई होत आहे. शाळा सुरू करण्याचा निर्णय शाळेच्या मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन समितीवर सोपविला गेला आहे. शासन व प्रशासन आपली जबाबदारी झटकत असल्याचे दिसून येत आहे. कोरोनाचा प्रभाव वाढत आहे तसेच पावसाळा सुरू झालेला आहे. ताप, सर्दी, खोकला याचे रुग्ण वाढत आहेत. तरीही शासनाने शाळा सुरू करा असा स्पष्ट निर्णय दिला पाहिजे. तसेच प्रशासनाने जबाबदार घटकांना स्वतंत्र पत्र पाठविले नाही. त्यामुळे शाळांनी पत्र स्थानिक प्रशासन, आरोग्य विभाग यांना दिल. मात्र संबंधीत प्रशासनाचे पत्रच आले नाही असे सांगितले जाते. मुलांना शाळेत येण्यासाठी कोणतीही सुविधा नाहीत.
मानव विकास व अहिल्याबाई होळकर या योजनेतून एस. टी. बसने प्रवास बंद आहे. बस ने शाळेत येण्यास मनाई केली गेली आहे. अशा वेळी मुलींनी शाळेत पायपीट करित शाळेत यावे काय. शासनाने आधी शाळेत येण्यासाठी सर्व मुलांना सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी मुख्याध्यापक संघाची आहे.
शासनाने शाळा सुरू करण्याची जबाबदारी स्वत:वर घ्यावी. तसेच शाळांना कोरोनावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यसाठी विशेष अनुदान देण्यात यावा. तसेच मुलांना शाळेत येण्यासाठी साधन उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी निवेदनात भंडारा तालुका मुख्याध्यापक संघाने शासन, प्रशासनाकडे केली आहे.
यावेळी भंडारा तालुका संघाचे अनमोल देशपांडे, प्रदीप मुटकुरे, सुनिल घोल्लर, एच. पी. लांजेवार, संजीव कुकडे, रामकृष्ण शेंडे, राधेश्याम धोटे यांनी गटशिक्षणाधिकारी एच. दहिवले, शंकर राठोड यांच्यामार्फत जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले.

कोरोनाची भीती अजूनही कायम आहे. कोरोना अजूनही आटोक्यात आलेला नाही.तरीही शाळा सुरू कशा सुरु करण्याची घाई होत आहे. शाळा सुरू करण्याचा निर्णय शाळेच्या मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन समितीवर सोपविला गेला आहे. शासन व प्रशासन आपली जबाबदारी झटकत असल्याचे दिसून येत आहे.
 

Web Title: Special grants should be given to schools in times of disaster

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.