खंडित वीज पुरवठा समस्या कायमस्वरुपी सोडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2018 21:39 IST2018-07-27T21:39:00+5:302018-07-27T21:39:41+5:30

तालुक्यातील महत्वाचे ठिकाण असलेल्या पालांदूर/चौरास क्षेत्रातील ४० ते ४५ गावांना विजपुरवठा करणाऱ्या येथील ३३ केव्ही उपकेंद्राला विविध समस्यांमुळे 'ब्रेकडाऊन'चा फटका सहन करावा लागतो.

Solve the problem of disrupted power supply permanently | खंडित वीज पुरवठा समस्या कायमस्वरुपी सोडवा

खंडित वीज पुरवठा समस्या कायमस्वरुपी सोडवा

ठळक मुद्देअधिकाऱ्यांना निवेदन : पालांदूर ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांची मागणी, ३३ केव्ही उपकेंद्रात नवीन वाहिणी जोडण्याची गरज
<p>लोकमत न्यूज नेटवर्क
लाखनी : तालुक्यातील महत्वाचे ठिकाण असलेल्या पालांदूर/चौरास क्षेत्रातील ४० ते ४५ गावांना विजपुरवठा करणाऱ्या येथील ३३ केव्ही उपकेंद्राला विविध समस्यांमुळे 'ब्रेकडाऊन'चा फटका सहन करावा लागतो. येथील उपकेंद्राला सानगडी पालांदूर किंवा पोहारा-पालांदूर मार्गाने दुहेरी पुरवठा करण्यात यावे, उपकेंद्रासाठी नवीन वाहिणी टाकून पालांदूर क्षेत्रातील खंडीत विज पुरवठा समस्या कायम स्वरुपी सोडविण्यात यावी, अशी मागणी पालांदूरचे सरपंच जितेंद्र कुरेकर, उपसरपंच हेमराज कापसे पदाधिकाºयांनी गोंदिया परिमंडळाचे मुख्य अभियंता सुखदेव शेरकर यांच्यासह वरिष्ठांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
पालांदूर येथील ३३ केव्ही उपकेद्राला स्थानिक व परिसरातील सरासरी ३,२०० कृषीपंप, ८ ते ९ हजार घरगुती, आयपी, दिवाबत्ती, नळयोजना तथा अन्य वीजजोडणी आहे. कृषी संजीवनी योजनेअंतर्गत सरासरी ७०० पेक्षा अधिक कृषीपंप धारकांनी योजनेचा लाभ घेऊन अन्य कृषीपंपधारक व ग्रामपंचायत अंतर्गत आणि अन्य नळ योजनेतील वीज देयक भरण्यामध्ये सर्वाधिक टक्केवारी आहे. घरगुती व उद्योगधंदे वीज ग्राहकांचे वीज देयके भरण्याची प्रक्रीया नियमित आहेत. मात्र येथील उपकेंद्राला मौजा आसगाव येथील १३२ केव्हीवरुन विजपुरवठा केला आहे. या सिंगल वाहिणी विजपुरवठा दरम्यान पालांदूर ते आसगाव हे अंतर २८ किमी एवढे आहे. वादळी पावसात, अवकाळी वादळात आणि अन्य समस्यांमुळे 'इन्सूलेटर' नादुरुस्त होऊन नेहमीच तांत्रिक बिघाड होत असतो. अशावेळी पालांदूर क्षेत्रातील ४० ते ४५ गावांचा विजपुरवठा खंडीत झाल्याने २५ ते ३० हजार लोकांना व विजग्राहकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत असून आर्थिक नुकसानीचा भुर्दंड सोसावा लागतो. रात्री-बेरात्री वीज पुरवठा खंडीत झाल्यामुळे रात्रभर नागरिकांना जागरण करावे लागते. त्यामुळे आरोग्यावर परिणाम होत असून ग्राहकांना आर्थिक फटका बसत आहे. विविध समस्या लोकांना होऊ नये म्हणून येथील संबंधित कर्मचाºयांना आसगाववरुन येणाºया ३३ केव्ही वाहिणीला 'बे्रक डाऊन' शोधण्यासाठी तथा लाईन वरील पेट्रोलिंग करुन कारण सापडत नाही. त्यासाठी अनेकदा दोन ते तीन दिवसाचा अवधी लागतो. त्यामुळे गृह उद्योग, कृषीपंपधारक, शासकीय - निमशासकीय कार्यालय, बँका, शाळा- महाविद्यालय, ग्रामीण रुग्णालय, मंडळ कृषी कार्यालय, तलाठी कार्यालय यांचे दैनंदिन कामकाजात मोठ्या अडचणी निर्माण होत ओहत.
बारव्हा, सानगडी, लाखनी पिंपळगाव, अड्याळ, कोंढा, शिवणी-मोगरा या गावात दुहेरी पुरवठ्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. मात्र पालांदूर/चौ. येथील विद्युत केंद्राला अजूनपर्यत 'डबल सप्लाय'ची व्यवस्था करण्यात आलेली नाही. या संपूर्ण बाबींचा अवलोकण करुन पालांदूर व परिसरातील जनतेच्या खंडीत वीजपुरवठा समस्या कायम स्वरुपी सोडविण्यात यावे, अशा मागणीचा ग्रामपंचायत पदाधिकाºयांनी मासिक सभेत ठराव घेतला. पुढाकाराने मुख्य अभियंता गोंदिया परिमंडळ सुखदेव शेरकर यांचेसह, उर्जामंत्री तथा पालकमंत्री, खासदार मधूकर कुकडे आणि वरिष्ठ अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. शिष्टमंडळात सरपंच जितेंद्र कुरेकर, दिलीप बडोले, सदस्य भरत घरडे, तुकडू खंडाईत, कोटीराम भूसारी, दिपक ठाकरे, लिपीक राधेश्याम पाथरे उपस्थित होते.

Web Title: Solve the problem of disrupted power supply permanently

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.