शहरं
Join us  
Trending Stories
1
अर्धे मतदार गेले तरी कुठे? महाराष्ट्रात ५४.३३ टक्के, तर देशात सरासरी ६०.३९ टक्के मतदान
2
मतदान कमी, गोंधळ जास्त, मुंबईत अनेक ठिकाणी ईव्हीएम यंत्रणा बंद, मतदार यादीत नाव शोधताना नाकीनऊ
3
मी दारू पितो, माझ्याकडे परवाना नाही; तरीही वडिलांनीच कार दिली; ‘ब्रह्मा ग्रुप’चे विशाल अग्रवाल यांच्यासह चार जणांवर गुन्हा
4
इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू; मृतांमध्ये परराष्ट्रमंत्र्यांसह अधिकाऱ्यांचाही समावेश
5
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
6
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
7
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
8
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
9
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
10
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
11
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
12
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
13
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
14
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
16
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
17
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
18
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
19
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
20
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप

भाविकांचे श्रद्धास्थान श्रीक्षेत्र नृसिंह टेकडी

By admin | Published: January 07, 2016 1:05 AM

जिल्ह्यातील तुमसर शहरांपासून अवघ्या आठ कि़मी. तुमसर-गोंदिया राज्यमार्ग भंडारापासून ३५ कि़मी व नागपूरहून सुमारे ९० कि़मी.

स्थानिकांना मिळतोय रोजगार : नदीक्षेत्र फुलले भाविकांनीभंडारा : जिल्ह्यातील तुमसर शहरांपासून अवघ्या आठ कि़मी. तुमसर-गोंदिया राज्यमार्ग भंडारापासून ३५ कि़मी व नागपूरहून सुमारे ९० कि़मी. अंतरावर नृसिंह टेकडी माडगी देव्हाडा येथे वैनगंगेच्या पवित्र कुशीत मोठ्या दगडांच्या टेकडीवर नृसिंहाचे प्राचीन व जागृत मंदिर विद्यमान आहे. संपूर्ण भारत वर्षात मंदिराकरिता विशिष्ठ स्थान मिळणे दुर्लभच. निसर्गनिर्मित खडकाळ भागात नदीच्या मध्य पात्रात विसावलेले हे आगळेवेगळे पुरातन, ऐतिहासिक मंदिर आहे. मंदिरात मूर्तींची स्थापना देखिल पुरातन काळी झाल्याची माहिती आहे. मंदिरात दोन मूर्ती असून एक उग्र स्वरूपाची तर दुसरी शांत स्वरूपाची या परिसरात वैनगंगा नदीचे दोन भाग होवून आजुबाजूला उंच झाडे आहेत. टेकडी समोरील भागाला पाण्याचा प्रवाह शिघ्र असतो. मंदिरात प्रवेश करण्यासाठी एक मुख्य प्रवेशद्वार आहे. एक रूंद चबुतऱ्यांच्या दोन्ही बाजूला एक मजबूत सिमेंटचे परकोटे बनलेले असून दर्शनास येणाऱ्या आबाल वृद्धांना कसलीही पडण्याची भिती नसते. या चबुतऱ्याच्या किनाऱ्यावर गालचिरी नामक देवीची मूर्ती आहे. तसेच हनुमंतांची विशालकाय मूर्ती आहे. भिंतीच्या कोपऱ्यात काही देवी देवतांच्या मूर्ती आहेत. येथूनच श्री नृसिंह भगवानाची ६ फूट उंच विशालकाय मूर्ती दिसते. संतश्री अन्नाजी महाराजांनी आपले संपूर्ण आयुष्य या देवस्थानातच सेवाकरीत घालविले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सुद्धा येथे काही काळ वास्तव्य केले असता त्यांची सुद्धा येथे मूर्ती आहे. लोखंडी शिडीद्वारे उंच असलेल्या सभामंडपावर चढून आसमंतातील ईश्वरचा परिसर न्याहाळता येतो.ब्रम्हलीन श्री १००८ राजयोगी श्री संत हनुमानदास अण्णाजी महाराज यांचा ९, १०, ११ जानेवारीला पूण्यतिथी व भगवान नृसिंह महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. संक्रांतीपर्यंत अनेक कार्यक्रमाची रेलचेल राहणार असून भाविकांनी हे तीर्थक्षेत्र फुलणार असून स्थानिकांना रोजगार उपलब्ध होत आहे. (प्रतिनिधी)