शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
2
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
3
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
4
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
5
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
6
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
7
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
8
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
9
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
10
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
11
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
12
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
13
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
14
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
15
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
16
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!
17
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...
18
युद्धातही श्रीमंतीचा डंका! इस्रायलची सर्वात श्रीमंत महिला चर्चेत! कसं उभं केलं ५.१६ लाख कोटींचं साम्राज्य?
19
तीन वेळा पतीचा जीव घेण्याचा केला प्रयत्न; चौथ्यांदा चिकन भात खायला देत कायमचा संपवला
20
Nag Panchami 2025: यंदा नागपंचमी कधी? कालसर्प दोष निवारणासाठी 'हा' दिवस राखीव ठेवाच!

रस्त्यावर दुकाने; नागरिकांचा जीव धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2019 05:00 IST

राजीव गांधी चौक ते नगरपालिका चौक आणि गांधी चौक ते पोस्ट ऑफीस पासून बसस्थानक परिसरापासून त्रिमूर्ती चौकाकडे जाणाºया रस्त्यावर ठिकठिकाणी अतिक्रमण करणाऱ्यांना पालिकेकडूनच अभय मिळत आहे की काय असे दिसून येत आहे. या दोन्ही मार्गांवर ठिकठिकाणी रस्त्यालगत असलेले बांधकाम, दुकानांचे शेड, टपऱ्या, भाजी विक्रेते, हातगाड्या अशा अतिक्रमणांनी रस्ता व्यापून गेल्याचे दिसून येते. त्यामुळे दररोज हजारो वाहनचालक आणि पादचाऱ्यांना जीव मुठीत घेऊनच ये-जा करावी लागत आहे.

ठळक मुद्देपालिका व वाहतूक विभागाचे अभय : अतिक्रमणात दडले शहराचे सौंदर्य, जबाबदारी कुणाची?

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शहरातील रस्ते सुधारण्यासाठी वर्षाला कोट्यवधी रुपये खर्च होत आहेत. पण रस्त्याची अवस्था सुधरताना दिसत नाही. कारण शहरातील बहुतांश रस्त्यांवर दुकानदार अतिक्रमण करीत आहेत. दुकानातील साहित्य फुटपाथवर मांडले जाते. त्यात आणखी भर पडत आहे. असेच काहीसे चित्र राजीव गांधी चौक ते गांधी चौक येथील गांधी चौक आणि मोठा बाजार परिसर ते त्रिमूर्ती चौकमार्गे बसस्थानक जाणाऱ्या रस्त्यावर ठिकठिकाणी दिसून येत आहे.राजीव गांधी चौक ते नगरपालिका चौक आणि गांधी चौक ते पोस्ट ऑफीस पासून बसस्थानक परिसरापासून त्रिमूर्ती चौकाकडे जाणाºया रस्त्यावर ठिकठिकाणी अतिक्रमण करणाऱ्यांना पालिकेकडूनच अभय मिळत आहे की काय असे दिसून येत आहे. या दोन्ही मार्गांवर ठिकठिकाणी रस्त्यालगत असलेले बांधकाम, दुकानांचे शेड, टपऱ्या, भाजी विक्रेते, हातगाड्या अशा अतिक्रमणांनी रस्ता व्यापून गेल्याचे दिसून येते. त्यामुळे दररोज हजारो वाहनचालक आणि पादचाऱ्यांना जीव मुठीत घेऊनच ये-जा करावी लागत आहे.शहरातील रस्ते सुधारण्यासाठी वर्षाला कोट्यवधी रुपये खर्च होत आहेत. पण रस्त्याची अवस्था सुधारताना दिसत नाही. कारण शहरातील बहुतांश रस्त्यांवर दुकानदार अतिक्रमण करीत आहेत. दुकानातील साहित्य फुटपाथवर मांडले जात आहे. त्यामध्ये दररोज आणखी भर पडत आहे.या मार्गांवर ठिकठिकाणी रस्त्यालगत असलेले बांधकाम, दुकानांचे शेड, टपऱ्यां, भाजी विक्रेते, हातगाड्या अशा अतिक्रमणांनी रस्ता व्यापून गेल्याचे दिसून येते. त्यामुळे दररोज हजारो वाहनचालक आणि पादचाºयांना जीव मुठीत घेऊनच ये-जा करावी लागत आहे.चौकाच्या शेजारीच फूड प्लाझा, गॅरेज आहे. शिवाय पार्र्किंगची सुविधाच नसल्याने या ठिकाणी येणारे खवय्ये आपली वाहने थेट रस्त्यावरच उभी करुन मोकळे होतात. शिवाय चौकात असलेल्या हॉटेल आणि गॅरेजसमोर उभी केलेली वाहनेही रस्त्यावर येत असल्याचे दिसून येते. फळविक्रेते, रिक्षा आणि टपºयांमुळेही हा चौक अतिक्रमाणाच्या विळख्यात सापडला आहे. सायंकाळनंतर तर परिस्थीति आणखी बदलते. त्यामुळे अनेकदा वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण होत असते. गेल्या काही वर्षात वाहनाच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे वाहनचालकांकडून सर्वाधिक वापर केल्या जाणाऱ्यां रस्त्यावर ठिकठिकाणी वेळोवेळी वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होत आहे. भंडारा शहरात वाहतूक पोलिसांची नियुक्ती चौकाचौकात करण्यात आली आहे. परंतु रस्त्यावरील अतिक्रमण व त्यामुळे होणारी वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक पोलीस पुढाकार घेत नाही.कच्चे, पक्के बांधकाम करुन अतिक्रमणठिकठिकाणी व्यावसायिक, दुकानदारांनी कच्चे, पक्के बांधकाम करुन अतिक्रमण केल्याचे दिसून येते. दुकानांची शेड रस्त्यालगत आली आहेत. पादचाºयांना भर रस्त्यावरुनच चालावे लागते. रस्त्यावरील अतिक्रमणांमुळे फुटपाथवर दुचाकी आणि चारचाकी वाहने मोठ्या प्रमाणात उभी केली जात आहेत. फुटपाथवर वाहनधारकांनी कब्जा केल्यामुळे रिक्षाचालक रस्त्यावर रिक्षा उभी करतात. त्यामुळे वाहतुकीला अडचण निर्माण होऊन वाहतूक जाम होते.व्यवसायातील स्पर्धेमुळे अतिक्रमणआपल्या दुकानापेक्षा शेजाऱ्यांचे दुकान समोर आहे. त्यामुळे आपल्याकडे ग्राहक कमी येतील या भितीपोटी दुकानदार दुकानासमोर साहित्य ठेवतात आणि शेजाºयाची बरोबरी करतात. या स्पर्धेतून रस्त्यावर अतिक्रमण होते. त्याचा परिणाम वाहतुकीवर होतो. काही वेळा नगर पालिकाचे अतिक्रमण हटाव पथक कारवाई करते. कारवाई करुन पथक निघून गेले की पुन्हा दुकानदार पाहिल्यासारखेच दुकान थाटतात. जोपर्यंत दुकानदारांची मानसिकता बदलत नाही तोपर्यंत रस्त्यावरील अतिक्रमणे कमी होणार नाहीत, असे काही व्यवसायीकांचे मत आहे.अपघातात वाढरस्त्यावरील अतिक्रमणामुळे वाहतुकीला अडचणी निर्माण होवून अपघात होतात. नगर पालिका प्रशासनाने अतिक्रमणाकडे आणि वाहतूक पोलिसांनी वाहतूक व्यवस्थेकडे लक्ष दिल्यास अपघात कमी होतील. नियमांची कठोर अंमलबजावणी केल्यास अतिक्रमणे कमी होती त्यामुळे वाहतुकीला अडचण होणार नाही. पण दोन्ही प्रशासनामधील अधिकारी नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करीत आहेत. फुटपाथ आणि रस्त्यावर दुचाकी, रिक्षा आणि चारचाकी वाहने उभे राहतात त्यामुळे पादचारी नागरिक रस्त्यावरुन ये-जा करतात.सिग्नल गेल्या कित्येक वर्षांपासून बंद आहेत. त्यामुळे रस्त्यावर वाहतूक वाढली की रात्री वाहनांची गर्दी होते. त्यामुळे अनेक वाहनधारकांना याचा त्रास सहन करावा लागतो. वाहनांच्या आणि रस्त्यावरील अतिक्रमणाच्या गर्दीतून मार्ग काढताना अनेक वेळा अपघात होण्याची शक्यता असते.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा