गणेशपूर शेतकरी उत्पादक कंपनीचा सेवाभावी उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2020 05:00 IST2020-04-24T05:00:00+5:302020-04-24T05:00:28+5:30
जिल्ह्यातील ११ शेतकरी उत्पादक कंपन्या व शेतकरी त्या त्या गावातील गरजु लोकांना भाजीपाला विनामूल्य पुरवठा करीत आहेत. आतापर्यंत जीवनावश्यक वस्तंच्या ७०० कीट तयार झालेल्या असून ४५० कीटचे वाटप झालेले आहेत. जिल्ह्यातील दानशूर शेतकऱ्यांनी जवळपास ५५० क्विंटल भाजीपाला गरजू लोकांना विनामूल्य वाटप केला आहे.

गणेशपूर शेतकरी उत्पादक कंपनीचा सेवाभावी उपक्रम
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : कृषी विभाग आत्मा अंतर्गत शेतकरी उत्पादन कंपनी कार्यरत असून दररोज शासनाकडून मागणीप्रमाणे जीवनावश्यक वस्तंूची किट तयार करणे, गरजू रेशन कार्ड नसणारे व बेघर लोकांना विनामूल्य भाजीपाला पुरवठा करण्याचे काम लॉकडाऊन सुरु झाल्यापासून गणेशपूर शेतकरी उत्पादक कंपनी गणेशपूर करीत आहे.
जिल्ह्यातील ११ शेतकरी उत्पादक कंपन्या व शेतकरी त्या त्या गावातील गरजु लोकांना भाजीपाला विनामूल्य पुरवठा करीत आहेत. आतापर्यंत जीवनावश्यक वस्तंच्या ७०० कीट तयार झालेल्या असून ४५० कीटचे वाटप झालेले आहेत. जिल्ह्यातील दानशूर शेतकऱ्यांनी जवळपास ५५० क्विंटल भाजीपाला गरजू लोकांना विनामूल्य वाटप केला आहे.
गणेशपूर शेतकरी उत्पादक कंपनी गणेशपूर यांचे मार्फत शेतकरी सदस्यांचे धान्य व इतर जीवनावश्यक वस्तु घेवून कंपनीमध्ये एकत्रित करुन कीट बनविण्याचे काम कंपनीद्वारे केले जात आहे. यासाठी कोणत्याही स्वरुपाचा मोबदला न घेता विनामूल्य कीट तयार करुन माविमंचे जिल्हा समन्वयक अधिकारी प्रदीप काठोळे यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित तहसीलदारांकडून जीवनावश्यक वस्तुंच्या कीटची मागणी झाल्यानंतर शेतकरी उत्पादक कंपनी येथून सदर किट प्राप्त करुन घेवून गरजू, रेशन कार्ड नसणारे व बेघर लोकांना व तालुकास्तरावरील माविमचे व्यवस्थापक यांचे मार्फत घरपोच कीटचे वाटप करण्यात येत आहे. कंपनीचे अध्यक्ष संजय एकापूरे यांच्या मार्गदर्शनाखाली जीवनावश्यक वस्तु कीट बनविण्याचे काम तालुक्यातील जाख येथे अविरत सुरु आहे. या जीवनावश्यक वस्तुंच्या कीटमध्ये पाच किलो तांदुळ व गहू, अर्धा किलो तूर डाळ व तेल, २०० ग्रॅम मिरची पावडर, १०० ग्रॅम मसाला, अर्धा किलो मिठ व एक मास्क या जीवनावश्यक वस्तुंचा समावेश करण्यात आला आहे. यासाठी जिल्ह्यातील कृषी विभागाचे अधिकारी कर्मचारी प्रोत्साहित केले आहे.