पिण्याच्या पाण्याच्या मागणीसाठी सत्याग्रह आंदोलन
By Admin | Updated: June 22, 2014 23:57 IST2014-06-22T23:57:26+5:302014-06-22T23:57:26+5:30
दोन वेळा पिण्याचे पाणी देण्याचे आणि भंडारा शहराच्या सर्वांगीण विकासाच्या १९ मुद्यांचे येत्या बुधवारपर्यंत लिखीत उत्तर देण्याचे आश्वासन सत्याग्रह आंदोलनाच्या अनुषंगाने नगराध्यक्ष वर्षा धुर्वे यांनी

पिण्याच्या पाण्याच्या मागणीसाठी सत्याग्रह आंदोलन
भंडारा : दोन वेळा पिण्याचे पाणी देण्याचे आणि भंडारा शहराच्या सर्वांगीण विकासाच्या १९ मुद्यांचे येत्या बुधवारपर्यंत लिखीत उत्तर देण्याचे आश्वासन सत्याग्रह आंदोलनाच्या अनुषंगाने नगराध्यक्ष वर्षा धुर्वे यांनी नगरसेवक हिवराज उके व शिष्टमंडळाला चर्चेदरम्यान दिले.
भंडारा नगर परिषदेसमोर नगरसेवक हिवराज उके यांच्या नेतृत्वात शहर सुधार समितीचे अध्यक्ष भैय्याजी साकुरे महाराज, सदानंद इलमे, माणिकराव कुकडकर, आॅल इंडिया स्टुडंटस् फेडरेशनचे अध्यक्ष कृष्णा ठवकर यांच्या प्रमुख उपस्थितीत दोन वेळा पिण्याचे पाणी, सुजल निर्मल योजना, साफसफाई व घनकचऱ्याचे योग्य नियोजन, विद्युत पुरवठ्याची समस्या, शहर विकास आराखडा, विकास पुस्तिका, रोड, नाला, नाल्या, त्यावर स्लॅब, फेरीवाला धोरण, तलावाचे संरक्षण व सौंदर्यीकरण, चौरस्त्याचा विकास व सौंदर्यीकरण, प्रसाधन गृहे, घाटाचे बांधकाम, घरकुल योजना आदी १९ मागण्यांसाठी सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. संबंधित विभागाशी चर्चा करुन बुधवारपर्यंत लिखीत उत्तर देण्याचे अध्यक्षांनी मान्य केले. यावर नगरसेवक हिवराज उके म्हणाले, सर्व १९ मागण्यांचे लिखीत उत्तर न मिळाल्यास व समाधान न झाल्यास १५ दिवसानंतर आमरण उपोषण आंदोलन करण्यात येईल. शिष्टमंडळाशी चर्चेच्यावेळी धर्मेंद्र साखरकर, प्रदीप पटेल, बोंद्रे, नगरसेवक हिवराज उके, भैय्याजी साकुरे, सदानंद इलमे, झुलनबाई नंदागवळी, ज्ञानेश्वर बोळखे, सुनंदा तईकर, मोहनलाल तईकर, विना नागदेवे, हेमलता वंजारी, माधुरी वाघमारे, गीता नागपूरे, पुष्पा तिघरे, बबलू साकुरे, कृष्णा ठवकर यांची उपस्थिती होती.(वार्ताहर)