शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohit Pawar पवार कुटुंबात तीन खासदार, दोन आमदार तरी ही घराणेशाही नाही; रोहित पवारांचा तर्क ऐका...
2
राज्य भाजपात मोठे बदल होणार?; दिल्लीत पार पडणार महाराष्ट्रातील बड्या नेत्यांची बैठक
3
'स्वतःच्या प्रमोशनसाठी रेल्वेचा वापर', मल्लिकार्जुन खरगेंचा मोदी सरकारवर आरोप
4
मुंबईत रस्त्यावरील चायनीज स्टॉल्सवर बंदी, विशेष पथकांची नियुक्ती; उद्यापासून तपासणी
5
वायनाड की रायबरेली? निर्णय घेण्यासाठी राहुल गांधींकडे शेवटचा १ दिवस बाकी, अन्यथा...
6
Air India च्या विमानात मोठी चूक; प्रवाशाच्या अन्नात आढळला ब्लेडचा तुकडा...
7
T20 वर्ल्ड कप सुरु असताना गौतम गंभीरने घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट
8
टीम इंडियासमोरील तिसरा प्रतिस्पर्धी निश्चित झाला, पाहा Super 8 सामन्याचं अपडेट वेळापत्रक 
9
"बाथरुममध्ये जाऊन संभाषण, ६५० मतांचा फरक अन्..."; रिटर्निंग ऑफिसरवर अनिल परबांचे गंभीर आरोप
10
भाजपने सुरू केली विधानसभेची तयारी; महाराष्ट्रासह या चार राज्यांत प्रभारी आणि सहप्रभारी नेमले
11
रिझर्व्ह बँकेनं 'या' बँकेचा लायसन्स केला रद्द; सेंट्रल बँक ऑफ इंडियालाही १.४५ कोटींचा दंड
12
मध्यरात्री गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी युवक घरी पोहचला; किचनमध्ये आढळला दोघांचा मृतदेह
13
"लोक मदतीसाठी ओरडत होते, हा एक भयंकर क्षण..."; प्रवाशाने सांगितलं नेमकं काय घडलं?
14
याला संघ म्हणावे तरी कसे? पाकिस्तान संघाबाबत कोच गॅरी कर्स्टन यांचे धक्कादायक विधान
15
भारताच्या उपांत्य फेरीत पोहोचण्याच्या मार्गात 'मोठा' अडथळा; कॅरेबियन बेटांवर महत्त्वाची घडामोड
16
T20 WC 2024: श्रीलंकेचा शेवट गोड, ८३ धावांनी विजय; नेदरलँड्सला पराभवासह निरोप
17
'बोलेंगे भी और लडेंगे भी!' JNU सिनेमाचा ज्वलंत ट्रेलर, सिद्धार्थ बोडकेचा जबरदस्त अभिनय
18
Investment Post Office : ₹१०० ची पॉवर : ५ वर्षांत जमा कराल गॅरंटीड लाखोंचा फंड, समजून घ्या गणित
19
राजामौलींच्या सिनेमातून प्रविण तरडेंची दाक्षिणात्य सिनेसृष्टीत दमदार एन्ट्री; साकारणार खतरनाक खलनायक
20
नागपूरचा डॉली चहावाला सातासमुद्रापार; मालदीवच्या समुद्रकिनारी टपरी, पर्यटकांनी घेतला आस्वाद

साहेब सांगा, धान पीकाला जगवायचे कसे ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2018 10:12 PM

लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : धानाची रोपे लावली. काही रोपे पाण्याअभावी तशीच उभी आहेत. रोवणी न झालेली रोपे अन् रोवणी झालेल्या पिकांना पाण्याशिवाय वाचवायचे कसे. हा सवाल प्रत्येक शेतकऱ्यांच्या चिंतेचा विषय बनला आहे. विहिरीत पाणी आहे, वीज आहे तर विद्युत कनेक्शन नाही अशा दोन्ही खिंडीत शेतकरी सापडला आहे. त्यामुळे ‘साहेब, तुम्हीच ...

ठळक मुद्देशेतकऱ्यांची आर्त हाक : किसान सभेने दिले तहसीलदारांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : धानाची रोपे लावली. काही रोपे पाण्याअभावी तशीच उभी आहेत. रोवणी न झालेली रोपे अन् रोवणी झालेल्या पिकांना पाण्याशिवाय वाचवायचे कसे. हा सवाल प्रत्येक शेतकऱ्यांच्या चिंतेचा विषय बनला आहे. विहिरीत पाणी आहे, वीज आहे तर विद्युत कनेक्शन नाही अशा दोन्ही खिंडीत शेतकरी सापडला आहे. त्यामुळे ‘साहेब, तुम्हीच सांगा धान पिकांना वाचवायचे कसे’, ही आर्त हाक तहसीलदार सूर्यकांत पाटील यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यापर्यंत जाण्यासाठी भंडारा जिल्हा किसान सभेतर्फे निवेदन देण्यात आले.मोहाडी तालुक्यातील सातशेच्या वर विहिरीवर विद्युत जोडणीसाठी मागणीपत्र भरले आहेत. दोन वर्षानंतरही एकाही शेतकऱ्यांना वीज कनेक्शन देण्यात आलेला नाही. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी व विद्युत जोडणी करणारे कंत्राटदार यांच्या कमिशनच्या वांध्यात शेतकऱ्यांना वेठीस पकडण्यात आले आहे मागील दोन वर्षापासून वीज जोडणी अभावी शेतकऱ्यांचे एका पाण्यासाठी धानाचे पीक हातातून गेले आहे.याही वर्षी केवळ वीज जोडणी मिळणार या आशेवर महावितरण कंपनी ठेवत आहे. पावसाने दडी मारली आहे. तीन आठवडे झालीत पाऊस नाही. सुरनदीसह अनेक बंधारे कोरडे पडली आहेत. धानपिक वाचविण्यासाठी आतापासून डिझेल इंजीनच्याद्वारे शेतीला पाणी दिले जात आहेत. ज्या शेतकऱ्यांनी वीज जोडणीसाठी ४० रूपये भरून मागणीपत्र भरले आहे. किमान त्या शेतकºयांना तात्पुरता वीज पुरवठा देण्यात यावा, अशी मागणी किसान सभेने केली आहे. वीज कनेक्शन दिले जात नाही, तात्पूरती वीज जोडणीसाठी कुणी ऐकत नाही, अशावेळी शेतकरी वीज चोरी करून पीकांना पाणी देतो.पर्याय नसल्याने वर्षभराच्या पोटाचा प्रश्न सोडविण्यासाठी मोठ्या हिंमतीने धोका पत्करून वीज चोरतो. त्या शेतकºयांना पकडण्याचा व दंड वसूल करण्याचा सपाटा वीज अधिकारी करीत आहेत. याविषयी प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. ६ आॅगस्ट रोजी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ८ आॅगस्टपासून १२ तास दिवसा व रात्री सहा तास शेती सिंचनासाठी वीज पुरवठा केला जाईल, असे आश्वासन दिले होते. मात्र उर्जामंत्र्यांच्या आश्वासनाची पूर्तता करायला उशिर झाला.तीन दिवस उलटूनही शेतीला कुठेच १८ तास वीज दिली जात नाही. शेतकरी वाटाण्याच्या अक्षता देणाºया उर्जामंत्र्यांना गंभीर परिस्थिती भोगावे लागती, असे किसान सभेचे जिल्हा सचिव माधव बांते यांनी म्हटले आहे. मागणी पत्र भरलेल्या शेतकऱ्यांना कायमस्वरूपी वीज कनेक्शन मिळेपर्यंत तात्पुरती वीज जोडणीची तातडीने सोय करून द्यावी. तसेच उर्जामंत्र्याच्या आश्वासनानुसार शेतीसाठी १८ तास वीज देण्यात यावी अन्यथा किसान सभा आंदोलन उभारेल, असे निवेदन तहसिलदार मोहाडी यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना देण्यात आले आहे. निवेदन देतानी किसान सभेचे सचिव माधवराव बांते, नितीन मोहारे, जयप्रकाश मसर्के, सुखचंद सुखदेवे, शंकर शेंडे, बिसन सार्वे, अयुब शेख, अनिल गाढवे, सलीम शेख, तुकाराम बांते आदी शेतकरी व किसान सभेचे कार्यकर्ते उपस्थित होते.शेतमजूर युनियनचे निवेदनसातबारा कोरा करून शेतीला पर्याप्त बिनव्याज कर्जदेण्यात यावा, स्वामीनाथन अयोगाची अंमलबजावणी करा, शेती उत्पादन खर्च अधिक ५० टक्के नफा भाव द्यावा. शेतकरी, शेतमजूर, ग्रामीण कारागीर, असंघटीत कामगार यांना वयाच्या ६० वर्षानंतर सेवानिवृत्तीवेतन द्या, श्रावण बाळसह इतर योजनेची पेन्शन एक हजार करा, दावेदारांना वनाधिकार कायद्याखाली जमिनीचे पट्टे द्या, सरकारी स्वस्त दुकानात साखर, केरोसीन उपलब्ध करा, शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करा आदी मागण्यांचेही निवेदन किसान सभा व लाल बावटा शेतमजूर युनियन मोहाडीतर्फे देण्यात आला.