शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

भारनियमनामुळे संतप्त शेतकऱ्यांची वीज उपकेंद्रात तोडफोड; दीडशे शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2022 18:15 IST

गत आठ दिवसांपासून कृषी फिडरवर मोठ्या प्रमाणात भारनियमन होत आहे. यामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत.

ठळक मुद्देपवनी तालुक्यातील घटना

भंडारा : भारनियमनामुळे सिंचनात बाधा येत असल्याने संतप्त शेतकऱ्यांनी वीज वितरण उपकेंद्रावर हल्लाबोल करीत तोडफोड केल्याची घटना पवनी तालुक्यातील आसगाव येथे बुधवारी घडली. याप्रकरणी तीन गावांतील सुमारे दीडशे शेतकऱ्यांविरुद्ध पवनी ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर आसगाव वीज उपकेंद्राला पोलीस संरक्षण देण्यात आले आहे.

गत आठ दिवसांपासून कृषी फिडरवर मोठ्या प्रमाणात भारनियमन होत आहे. यामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत. दररोज कुठे ना कुठे शेतकरी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर धडकत आहेत. बुधवारी पवनी तालुक्यातील ब्रह्मी, बाचेवाडी या गावातील सुमारे १०० ते १५० शेतकरी आसगाव वीज उपकेंद्रावर धडकले. प्रवेशद्वार बंद असताना शेतकऱ्यांनी उड्या मारून आत प्रवेश केला. कार्यालयातील कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करीत खिडक्या, दरवाजे, खुर्च्यांची तोडफोड केली. या प्रकाराने उपस्थित कर्मचारी घाबरून गेले.

घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तात्काळ उपस्थित होऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. याप्रकरणी वीज वितरण कंपनीचे सतीश दुर्योधन कोरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून सुमारे दीडशे शेतकऱ्यांविरुद्ध भादंवि ३५३, ३३२, १४३, ५०४, ५०६ यासह शासकीय मालमत्ता विद्रुपीकरण अधिनियमान्वये गुन्हा नोंदविला आहे.

वीज कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की

शेतकऱ्यांचा जमाव वीज वितरण कंपनीवर पोहोचला तेव्हा कंत्राटी यंत्रचालक सतीश कोरे यांनी त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते धक्काबुक्की करीत कार्यालयात शिरले. तेथे असलेल्या वरिष्ठ तंत्रज्ञ चित्रा कैलाश सोनकुसरे यांना शिवीगाळ केली, तर सहायक तंत्रज्ञ रमाकांत खंडारे यांना धक्काबुक्की करण्यात आली. या प्रकाराने कर्मचारी प्रचंड घाबरून गेले होते.

शेतकऱ्यांनी बळजबरीने सुरू केला वीज पुरवठा

वीज वितरण उपकेंद्रात धडकलेल्या शेतकऱ्यांनी बळजबरीने वीज पुरवठा सुरू करण्यास कर्मचाऱ्यांना भाग पाडले. ११ केव्ही आसगाव, ढोलसर, खैरी कृषी फिडरवर वीज पुरवठा सुरू करून वाहिनी बंद केली, तर आम्ही पुन्हा येऊ आणि तोडफोड करू, अशी धमकी दिली.

राज्यात सर्वत्र विजेची टंचाई निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांनी संयम पाळून वीज वितरण कंपनीला सहकार्य करावे. तोडफोड करून शासकीय मालमत्तेचे नुकसान करू नये.

- राजेश नाईक, अधीक्षक अभियंता, वीज वितरण कंपनी, भंडारा

टॅग्स :electricityवीजagricultureशेतीFarmerशेतकरीagitationआंदोलन