शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

दीड लाख हेक्टरवरील रोवणी प्रभावित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2020 05:00 IST

भंडारा जिल्ह्यात एक लाख ६१ हजार ४९३ हेक्टर भात लागवडीचे क्षेत्र आहे. शेतकऱ्यांनी हवामानाच्या अंदाजानुसार मशागत करून शेतात पऱ्ह्यांची नर्सरी तयार केली. रोहिणी मृग नक्षत्रात चांगला पाऊस बरसला. शेतकरी सुखावला. मात्र आर्द्रा नक्षत्रात पावसाने दडी मारली. शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या. रोवणीचे सोड शेतातील नर्सरीतील पऱ्हे जगविण्यासाठी शेतकऱ्यांना धडपड करावी लागली.

ठळक मुद्देपाऊस लांबणीवर : दुबार पेरणीचे संकट बळावण्याची भीती

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा: वैनगंगा नदीकाठासह सिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांनी धानरोवणी केली असली तरी पावसाअभावी शेतकरी संकटात आले आहेत. सिंचनाची सोय असलेल्या भागासह ईतर ठिाणी पाच टक्के क्षेत्रात रोवणी पूर्ण झाली आहे. विशेष म्हणजे पावसाअभावी दीड लाख हेक्टरवरील रोवणी रखडली असून दुबार पेरणीचे संकटही बळावले आहे.भंडारा जिल्ह्यात एक लाख ६१ हजार ४९३ हेक्टर भात लागवडीचे क्षेत्र आहे. शेतकऱ्यांनी हवामानाच्या अंदाजानुसार मशागत करून शेतात पऱ्ह्यांची नर्सरी तयार केली. रोहिणी मृग नक्षत्रात चांगला पाऊस बरसला. शेतकरी सुखावला. मात्र आर्द्रा नक्षत्रात पावसाने दडी मारली. शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या. रोवणीचे सोड शेतातील नर्सरीतील पऱ्हे जगविण्यासाठी शेतकऱ्यांना धडपड करावी लागली. ओलीताचे क्षेत्र असलेले शेतकरी सिंचनाने पऱ्हे जगवू लागले. परंतु कोरडवाहू शेतकरी डोक्यावर गुंडाने पाणी आणून पºह्यांना जगवित असल्याचे चित्र दिसू लागले.एकूण लागवड क्षेत्राच्या केवळ ५६७७.२८ हेक्टरवर आतापर्यंत रोवणी आटोपली आहे. त्यातही ओलीताची सोय असलेल्या शेतकºयांचाच सर्वाधिक समावेश आहे. जिल्ह्यात सर्वाधिक रोवणी तुमसर तालुक्यात १३५३ हेक्टर तर सर्वात कमी साकोली तालुक्यात ३६७ हेक्टरवर रोवणी झाली आहे. जिल्ह्यात १३ हजार १६ हेक्टर क्षेत्रावर नर्सरी टाकण्यात आली होती.गत आठवड्यापासून पाऊस बेपत्ता झाल्याने रोवणी केलेल्या अनेक शेतात भेगा पडल्या असून पºहे करपू लागली आहेत. जिल्ह्यात पावसाचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत चालल्याने कोरडवाहू असलेल्या मोहाडी,भंडारा तालुक्यातील शेतकरी प्रकल्पातील पाणी सोडण्याची मागणी करीत आहेत. कमी पाऊस असलेल्या मोहाडी तालुक्यातील कोरडवाहू करडी परिसरात सुमारे ५,४६४ हेक्टर आर क्षेत्रात धान पिकाच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. सुमारे १९७ हेक्टर क्षेत्रात धुऱ्यावर तूर पिकाची लागवड परिसरात करण्यात आली.जिल्ह्यात जंगल मोठ्या प्रमाणात असतानाही पाऊस कमी होत चालल्याने शेतकरी धास्तावला आहे. गत वर्षी पुरेसा पाऊस झाला असताना असताना भुगर्भात पाण्याचा पुरेसा साठा उपलब्ध नाही. अनेक तलावांतील अतिक्रमणे व उथळपणांमुळे जलसाठा राहत नाही. विहिर खोदली तरी खरीपातही पाणी पुरत नाही.अशा बिकट परिस्थितीतही निसर्गाच्या लहरीपणावर मात करीत शेतकरी आजही चांगल्या उत्पन्नाची आशा धरून आहे. यावर्षी खरीप हंगामाच्या प्रारंभी रोहिणी, मृग, आर्द्रा नक्षत्र कोरडा गेल्यानतर शेतकऱ्यांना रोवणी कशी करायची असा प्रश्न पडला आहे.काही आठवड्यापासून शेतकरी तापमानाने शेतकरी हैराण झाले आहेत. पेरण्या झालेल्या शेतातील पऱ्हे कडक उन्हामुळे पाण्याविना करपू लागली आहेत. सिंचनाची साधने असलेल्या शेतकऱ्यांच्या रोवणी झालेल्या शेतात भेगा पडल्याने रोवण्या थांबविण्यात आल्या आहेत. आणखी काही दिवसांत पाऊन न झाल्यास केलेली शेतकऱ्यांची मेहनत व पैसा वाया जाण्याची भिती शेतकऱ्याना सतावत आहे.जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय असतांना केवळ आठ तास वीज पुरवठा होत असल्याने सिंचन करता येत नाही. त्यामुळे ऐन खरीप हंगामात शेतकऱ्यांसाठी बारा तास वीज पुरवठा करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. नागपूर जिल्ह्यात १२ तास वीज पुरवठा होतो. तर भंडारा जिल्ह्यात कोणती समस्या आहे. असा संतप्त सवाल शेतकऱ्यांमधून विचारला जात आहे. विजेसाठी शेतकरी विज वितरण कार्यालयाचे उंबरठे झिजवित आहे.

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती