शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
2
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
3
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
4
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
5
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
6
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
7
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
8
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
9
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
10
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
11
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
12
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
13
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
14
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
15
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
16
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
17
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
18
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
19
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
20
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट

मोहाडी तालुक्यात २७ हेक्टरमध्ये रोवणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2017 11:31 PM

ढग येतात अन् तसेच निघून जातात. ढगाकडे बघतच शेतकºयांचा दिवस जातो. मावळतीला हताश चेहºयाने शेतीतून पाय काढतो.

ठळक मुद्देपर्जन्य ४९ टक्केच : पावसाचा खंड, रोगाचा प्रादुर्भावाने शेतकरी हवालदिल

राजू बांते ।लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : ढग येतात अन् तसेच निघून जातात. ढगाकडे बघतच शेतकºयांचा दिवस जातो. मावळतीला हताश चेहºयाने शेतीतून पाय काढतो. जमिनीला भेगा अन् डोक्याचा ताण वाढत जाऊन दिवस उजाडतो तो लख्ख प्रकाशाने. लावल्या रोपाला फुटवे आले. पण संथ वाढ, दुसरीकडे पावसाअभावी जूनमध्ये घातलेली भातरोपे तशीच पडून आहेत. अशी भयाण वास्तव परिस्थिती यावर्षी शेतकºयांच्या नशिबी आली आहे. एकूणच मोहाडी तालुका खरीप पिकाच्या दुष्काळ छायेत दिसून येत आहे.जुलै व आॅगस्ट ही दोन महिने खूप पाऊस देणारी महिने समजली जातात. या दोन महिण्याच्या पावसावर भात पिकाचे भविष्य अवलंबून असते. जून महिन्याचा अगदी शेवटी पावसाला सुरुवात झाली. जून महिन्यात १९५.८ मिमी. पावसाची सरासरी अपेक्षीत होती. पण ७५.२ मिमी. पाऊस पडला. सर्वात कमी पाऊस कान्हळगाव महसूल मंडळात २६.४ मि.मी. पडला. वरठी मंडळात १५१.२ मि.मी. तर मोहाडी, वरठी, कांद्री, आंधळगाव महसूल मंडळात ५० मिमीच्या वर पाऊस झाला. जुलै महिन्यात २९९.१ मिमी पाऊसाची सरासरी हवी होती. पण, ७४.४ मिमी एवढाच पाऊस झाला. तसेच आॅगस्ट महिन्यात ३९१ मि.मी. सरासरी हवा होता.१६ आॅगस्टपर्यंत केवळ २६.२ मिमी टक्केवारी पावसाने हजेरी लावली. आजपर्यंत पावसाची टक्केवादी ४९.२ मिमी एवढीच आहे. जून महिन्याच्या पावसाने भात नर्सरीची पेरणी दुसºया, तिसºया आठवडयात झाली. त्यानंतर ५ ते १३ जुलै या दरम्यान आठ दिवसाची पावसाने खंड पाडला. रोपांची वाढ खुंटली. १४ ते २० जुलैमध्ये पाऊस झाला. या पावसाने एकाच वेळी शेतकºयांनी रोवणीच्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर पाऊस पडेल अशी आशा होती. कशी तरी शेतकºयांनी ओढून ताणून भात पिकाची लागवड केली. पावसाअभावी मोहाडी, वरठी या मंडळातील रोवणी १ आॅगस्टपासून थांबली आहेत.कान्हळगाव, आंधळगाव, कांद्री, करडी या महसुल मंडळातील रोवणी २९ जुलैपासून खोळंबली आहेत. त्यामुळे आतापर्यंत २६.९७ क्षेत्रातच रोवणी होवु शकली. २९ हजार ४६४ हेक्टर भात पिकाची लागवड होते. पण, फक्त ७ हजार ९३० हेक्टर भागात रोवणी पूर्ण झाली आहे. जून महिन्यापासून भाताची रोपे (पºहे) अजूनही पावसाची प्रतिक्षा करीत आहेत. पावसाअभावी रोवणीसाठीची पºहे तशीच उभी आहे. करपले आहेत. भात पिकाची कोरडी जमीन पºहे लावणीसाठी आसूरलेली आहे. पावसाच्या अभावाने कोरड्या जागी पºह्याची रोपण होवू शकली नाही. काही भाताच्या शेतीत गवत उगविले आहे. भाताच्या जागी गवताने जागा घेतली आहे. आॅगस्ट महिन्याचा तपशिलावर दृष्टी घातली तर केवळ चारच दिवस पाऊस पडला. १ ते ४ आॅगस्ट या चार दिवशी पाऊसाचा पत्ता नाही.जो काही पाऊस पडला त्याची १८ आॅगस्टपर्यंतची पावसाच्या पर्जन्यमानाची सरासरी १७.२३ इतकी आहे. १ जुलै ते १६ आॅगस्ट सरासरी ८१३.०२ मिमी पाऊस पडणे अपेक्षीत होते. मात्र आतापर्यंत सरासरी गाठलीच नाही. कवेळ ४००.५ मिमी पाऊस पडला. सरासरी पर्जन्यमानाची टक्केवारी ४९.२ आहे. सात तालुक्याूध्ये पाऊस बरसण्यात मोहाडी तालुक्याचा सहावा क्रमांक लागतो. सर्वात जास्त पाऊस १ जून ते १६ आॅगस्टपर्यंत पवनी येथे ७२.२ टक्के, लाखांदूर ६५ टक्के, लाखनी ६२ टक्के , भंडारा ६०.२ टक्के, मोहाडी ४९.२ टक्के तुमसर येथे ४१.६२ टक्के इतका पडला. पावसाचा खरा फटका तुमसर, मोहाडी यांना बसला आहे. या दोन्ही तालुक्यात दुष्काळसदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे.गायमुख नदी, सुरनदीच प्रवाह थांबला, धरणात पाणी नाही, तलाव, बोळ्या रिकाम्या आहेत. सिंचन विहिरी खोल गेल्या. ज्यांच्याकडे सिंचनाची सोय आहे पण, वीज साथ देत नाही. सिंचनासाठी वीज हवी असणाºया ४६५ शेतकरी वर्षभरापासून शेतपंपाच्या वीज जोडणीची प्रतिक्षा करीत आहेत. दुसरीकडे कर्जमाफीचा चॉकलेट दाखविला गेला. पण, एक दमडीही पदरात पडली नाही. केवळ घोषणाच सुरु आहेत. सातबारा कोरा होणार म्हणणारे नेते शेतकºयांच्या जखमेवर मीठ चोळत आहेत.सद्या स्थितीत पावसाअभावी ७३.०३ हेक्टर रोवणीचे क्षेत्र पडीत आहे. २६.९७ हेक्टर मधील भातपिकांना पाण्याचा ताण पडलेला आहे. जमिनीला भेगा पडलेल्या आहेत. पावसाचा खंड व पाण्याचा ताण यामुळे भात पिकांची वाढ समाधानकारक नाही. भाताच्या पिकाचे फुटवे निघण्याच्या स्थितीत आहेत.२० ते २५ टक्के भात पिकाच्या उत्पन्नात घट होण्याची शक्यता असल्याचे कृषी विभागातील जानकारांचे मत आहे. भात पिकाची क्षेत्र लागवड कमी, पावसाचा खंड, उत्पन्नात घटीची शक्यता यासोबतच एका नुकसानीची भर पडत आहे. ती रोगाच्या प्रादुर्भावाची भातावर आतपासून करपा व कडाकरपा या रोगाने हल्ला केला आहे. एकूणच चहुबाजूने शेतकरी दुष्काळाच्या चक्रव्युहात सापडला गेला आहे.शासन अन् निसर्ग दोघेही मेहरबान नाहीत. त्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. गोधंळाची शेतकºयांपूढे परिस्थिती निर्माण झाली आहे. जगाव की मराव ही स्थिती निर्माण झाल्याने ऐन उत्सवात शेतकºयांमध्ये चिंतेचे वातावरण दिसायला लागले आहे.शेतीसाठी नव्या हंगामासाठी काढलेले नवीन कर्ज शेतकºयांच्या डोक्यावर आहे. ही दुष्काळ सदृष्य परिस्थिती जगू ही देत नाही मरुही देत नाही. शासन मात्र शेतकºयांच्या हातावर तुरीच देत आहे.-राजेश लेंडे, सरपंच ग्रामपंचायत मोहगाव/देवी