आपत्ती काळात बचाव पथकाची भूमिका महत्त्वाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 05:00 IST2020-06-08T05:00:00+5:302020-06-08T05:00:48+5:30

शोध व बचाव पथकाचे प्रशिक्षणाच्या उद्घाटनाप्रसंगी जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी राज्य आपत्ती प्रतिसाद दल नागपूरचे पोलीस निरीक्षक प्रमोद लोखंडे, पोलीस उपनिरीक्षक डी. एन. मंडल यांच्या उपस्थितीत मान्सूनपूर्व आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अभिषेक नामदास आदी उपस्थित होते.

The role of rescue teams is important in times of disaster | आपत्ती काळात बचाव पथकाची भूमिका महत्त्वाची

आपत्ती काळात बचाव पथकाची भूमिका महत्त्वाची

ठळक मुद्देजिल्हाधिकारी : आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणतर्फे प्रशिक्षण व मॉक ड्रिल

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : राज्यात १० ते १५ जून या कालावधीत मान्सूनचे आगमन होणार आहे. अशावेळी मान्सूनपूर्व तयारीचा भाग म्हणून राज्य आपत्ती प्रतिसाद दल नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने प्रशिक्षण व मॉकड्रिल आवश्यक आहे. मात्र या आपत्ती काळात शोध व बचाव पथकासह स्वयंसेवकांची भूमिका महत्वाची असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी एम. जे. प्रदीपचंद्रन यांनी केले.
शोध व बचाव पथकाचे प्रशिक्षणाच्या उद्घाटनाप्रसंगी जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी राज्य आपत्ती प्रतिसाद दल नागपूरचे पोलीस निरीक्षक प्रमोद लोखंडे, पोलीस उपनिरीक्षक डी. एन. मंडल यांच्या उपस्थितीत मान्सूनपूर्व आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अभिषेक नामदास आदी उपस्थित होते.
जिल्ह्यातील शोध व बचाव पथकाला नैसर्गीक आपत्ती व मानवनिर्मित आपत्ती या विषयावर उद्भवलेल्या समस्येचे निवारण करण्याकरिता स्थानिक संस्था व प्रशासन यांच्या संयुक्त उपक्रमाने आपत्ती व्यवस्थापनाकरिता लागणाऱ्या साहित्याचे प्रशिक्षण देण्यात आले. सर्पदंशापासून बचाव, प्राथमिक उपचार, वीज व आगीपासून बचाव, नाव व धरणामध्ये पोहण्याचे प्रशिक्षण, अचानक नाव उलटून झालेल्या अपघाताप्रसंगी प्रशिक्षण याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच भूकंप, पूर व अन्य नैसर्गिक आपत्तीवरही व्याख्यान, प्रात्याक्षिक व मल्टीमिडीयाद्वारे प्रशिक्षण या कार्यशाळेत देण्यात आले. याप्रसंगी जिल्हास्तरावर उपलब्ध असलेल्या आपत्ती व्यवस्थापनाच्या साहित्याची पाहणी करण्यात आली.

जिल्हा यंत्रणा सज्ज
जिल्ह्यात नदीकाठावरील गावांना पुराचा धोका असतो. जवळपास १४० पेक्षा जास्त गाव पुराच्या वेढ्यात सापडतात. अशावेळी शोध व बचाव पथकातर्फे त्यांची मदत केली जाते. यावेळीही पुरपरिस्थितीसाठी जिल्हा यंत्रणा सज्ज झाली आहे.

Web Title: The role of rescue teams is important in times of disaster

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.