शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

रोवणी ३८, पडीत क्षेत्र ६२ टक्के तर पैसेवारी ५९ पैसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 23:49 IST

करडी परिसरातील २७ गावात सन २०१७-१८ खरीप हंगामातील धान पिकांचे १०० टक्के लागवड क्षेत्र ५,६०० हेक्टर आहे.

ठळक मुद्देकरडी परिसरातील २७ गावांवर अन्याय : पडीत शेतीबाबत चौकशी केव्हा होणार?

युवराज गोमासे ।लोकमत न्यूज नेटवर्ककरडी (पालोरा) : करडी परिसरातील २७ गावात सन २०१७-१८ खरीप हंगामातील धान पिकांचे १०० टक्के लागवड क्षेत्र ५,६०० हेक्टर आहे. त्यातही अपुºया पावसामुळे खोळंबून प्रत्यक्ष रोवणी झालेले क्षेत्र २१०८ हेक्टर असून टक्केवारी ३८ आहे तर पडीत शेतीचे क्षेत्र ३४९२ हेक्टर असून टक्केवारी ६२ आहे. प्रत्यक्ष लागवडीचे क्षेत्र कमी तर पडीत शेतीचे क्षेत्र दुप्पट असतानाही मोहाडी तालुक्यातील १०८ गावांची सुधारित पैसेवारी ५९ पैसे दाखविण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.आकड्यांचा ताळेबंद लावण्यास करडी परिसराची प्रत्यक्ष पैसेवारी २४ पैसेच असल्याचे शेतकºयांचे म्हणणे असून शासन प्रशासनाने करडी परिसरावर अन्याय केल्याची भावना व्यक्त होत आहेत. पडीत शेतीची चौकशी केव्हा होणार, असाही प्रश्न विचारला जात आहे. मोहाडी तालुका वैनगंगा नदीमुळे दोन भागात विभाजीत असून करडी परिसर जंगल टेकड्यांनी व्यापलेला आहे. सिंचनाच्या पाहिजे तशा सुविधा नाहीत. शेती कोरडवाहू व निसर्गावर आधारित आहे. तलाव व बोड्यांची संख्या बरीच असतानाही अतिक्रमण व गाळामुळे सिंचन क्षमता बेताची आहे. सिंचन विहिरींची एक तास पुरेल इतकी क्षमता नाही. त्यातच भारनियमन, किड, तुळतुळा, गादमाशी, खोडकिडा व अन्य रोगांनी नाशधुस नेहमीचीच बाब झाली आहे.करडी परिसरता २७ गावांत सर्वाधिक धानाचे पिक खरीप हंगामात घेतले जाते. सन २०१७-१८ खरीप हंगामात १०० टक्के म्हणजे ५, ६०० हेक्टर क्षेत्रात धान पिकाच्या पेरण्या झाल्या. मात्र, अलप व वेळेवर पाऊस न आल्याने फक्त ३८ टक्के क्षेत्रात म्हणजे २०१८ हेक्टर क्षेत्रात धानाची रोवणी झाली तर रोवणी अभावी ३४९२ हेक्टर ६२ टक्के क्षेत्र पडीत राहिले. पडीत क्षेत्र मोठे असतानाही शासन स्तरावरून किंवा जिल्हाधिकारी स्तरावरून अद्यापही चौकशी वा पंचनामे करण्याचे आदेश यंत्रणांना मिळालेले नाहीत. उलट फक्त रोवणी झालेल्या क्षेत्राची पैसेवारी ५९ पैसे काढण्यात आली.पिकविम्यापासून शेतकरी वंचितकरडी परिसरातील एकूण धान पिकांखालील क्षेत्र व रोवणी झालेले क्षेत्र तसेच पडीत राहिलेले क्षेत्र यात बरेच अंतर आहे. त्यामुळे आकड्यांचा ताळेबंद केल्यास करडी परिसराची पैसेवारी २४ पैसे असतानाही २७ गावांची सुधारित पैसेवारी तालुक्यातील १०८ गावांबरोबर ५९ पैसे दाखविण्यात आली आहे. जिल्हाधिकाºयांनी तुळतुळा व रोगांमुळे झालेल्या नुकसानीचे आदेश दिले असताना पडीत शेतीच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे. त्यामुळे शेतकरी पिकविम्यापासून वंचित राहणार आहेत.पंचनामे होऊनही मदत मिळाली नाहीखरीप हंगाम सन २०१६-१७ मध्ये करडी परिसरातील २७ गावांतील भात पिकाखालील लागवडीचे १०० टक्के क्षेत्र ५५८० हेक्टर होते. प्रत्यक्ष रोवणी झालेले क्षेत्र ४६९१ हेक्टर ८४ टक्के होते. पडीत राहिलेल्या क्षेत्र ८८९ हेक्टर १६ टक्के होते. जिल्हाधिकाºयांच्या सुचनेनुसार १६ टक्के पडीत राहिलेल्या शेतीच्या पंचनामे यंत्रणेमार्फत तयार करण्यात येवून अहवाल सादर करण्यात आला होता. मात्र, वर्ष लोटले असतानाही पडित शेती राहिलेल्या शेतकºयांना एक रूपयाची मदत अद्याप प्राप्त झालेली नाही. जिल्हाधिकाºयांनी प्रकरणी लक्ष देण्याची गरज आहे.करडी परिसरात रोवणी झालेल्या क्षेत्रापेक्षा पडीत राहिलेल्या शेतीचे प्रमाण दुप्पट आहे. मात्र, तालुक्यातील सुधारित पैसेवारी ५९ पैसे दाखविण्यात आल्याने करडी परिसरावर अन्याय झालेला आहे. जिल्हाधिकाºयांनी तुळतुळा व रोगांमुळे झालेल्या नुकसानीचे चौकशीचे आदेश दिले. मात्र, पडीत शेतीची चौकशी गुलदस्त्यात आहे. प्र्रकरणी शासन प्रशासनाने गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.-वासुदेव बांते, तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस मोहाडी.