धान खरेदी केंद्रात शेतकऱ्यांची लूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2019 06:00 IST2019-12-02T06:00:00+5:302019-12-02T06:00:54+5:30
येथील आधारभूत धान खरेदी केंद्रात परिसरातील दहा ते बारा गावांचा समावेश आहे परंतू केंद्रात समाविष्ट असलेल्या गावातील शेतकऱ्यांना डावलून बाहेरच्या शेतकºयांची धान खरेदी केली जात आहे. कित्येक दिवसांपासून धान उघड्यावरच ठेवले असल्याने धान्याची नासाडी होत आहे. शेतकऱ्यांनी विक्री केलेल्या धानाची वेळवर नियमीत वजनमाप केले जात नाही.

धान खरेदी केंद्रात शेतकऱ्यांची लूट
लोकमत न्यूज नेटवर्क
आंधळगाव : शेतमालाला योग्य भाव मिळावा व शेतकऱ्यांची लूट थांबावी यासाठी शासनाकडून जिल्हयात ६७ आधारभूत धान खरेदी केंद्र उघडण्यात आले. मात्र तालूक्यातील काटेबाम्हणी येथील शासकीय धान खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांनी विक्रीस आणलेल्या धानाच्या प्रत्येकी पोत्यामागे पाच कीलोची धानाची लूट होत असल्याचा प्रकार समोर आला आहे.
येथील आधारभूत धान खरेदी केंद्रात परिसरातील दहा ते बारा गावांचा समावेश आहे परंतू केंद्रात समाविष्ट असलेल्या गावातील शेतकऱ्यांना डावलून बाहेरच्या शेतकºयांची धान खरेदी केली जात आहे. कित्येक दिवसांपासून धान उघड्यावरच ठेवले असल्याने धान्याची नासाडी होत आहे. शेतकऱ्यांनी विक्री केलेल्या धानाची वेळवर नियमीत वजनमाप केले जात नाही. उलट शेतकऱ्यांकडून वजनमाप करून देण्यासाठी संबधित केंद्र चालकांकडुन पैशाची मागणी केली जाते, असे शेतकºयांचे म्हणने आहे. यात मात्र धान खरेदी केंद्र चालकांच्या नातेवाईकांचे व संबंधितांच्या धानाचे वजनमाप लवकर व नियमीत केले जात असल्याचे खुद्द शेतकरी सांगतात.
सध्या ढगाळ वातावरण असून धान खरेदी केंद्रांवर शेकडो शेतकऱ्यांचे हजारो धानाचे पोते उघड्यावर ठेवले आहेत तर पावसाच्या बचावासाठी संबधित केंद्र चालकांने धान खरेदी केंद्रांवर कुठलीही व्यवस्था केलेली नाही. बारदाना सूध्दा परत मिळत नसल्याने शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. संबधित केंद्र चालकासोबत मार्केटिंग फेडरेशन व बाजार समीतीच्या कर्मचाºयांचे संगनमत असल्याचे बोलले जात आहे. मार्केटिंग फेडरेशनच्या अधिकाऱ्यानी काटेबाम्हणीतील आधारभूत धान खरेदी संस्थेवर कारवाई करण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.
नियम व अटींना बगल
आधारभुत केंद्राच्या शासकीय नियम व अटींना बगल देत, केंद्रात समाविष्ट असलेल्या शेतकऱ्यांना वगळून बाहेरच्या शेतकऱ्यांचे परस्पर धानाची विविध ठिकाणच्या राईस मिलमध्ये विल्हेवाट लावून सर्रासपणे धान खरेदी केली जात असल्याचे सूध्दा समोर आले आहे. केंद्रातील गावाच्या व्यतिरीक्त जे शेतकरी धान खरेदी केंद्रांवर धान विक्रिस आणत नाही अशाही शेतकऱ्यांच्या नावे संबधित तलाठी कार्यालयामार्फत सातबारा घेऊन त्या शेतकºयांच्या नावावर पैशाची उचल होणार असल्याचीही माहिती आहे.