शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

महामार्ग नव्हे मृत्यूचा मार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 05:00 IST

भंडारा जिल्ह्यातून मुंबई-कोलकाता हा राष्ट्रीय महामार्ग जातो. देशातील प्रमुख महामार्गात त्याची गणना होते. अहोरात्र वाहनांची वर्दळ असते. डांबरी असलेल्या या महामार्गावर पावसाळ्याच्या दिवसात मोठाले खड्डे पडले आहेत. एक किलोमीटर अंतरातील खड्डे मोजतानाही कुणाचीही दमछाक होईल, अशी अवस्था या महामार्गाची झाली आहे. साकोली तालुक्यातील जांभळी ते मुंडीपार हा रस्ता तर आणखीनच भयावह झाला आहे.

संजय साठवणेलोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : भंडारा जिल्ह्याला देशाच्या विविध शहरांशी जोडणारा राष्ट्रीय महामार्ग नव्हे तर मृत्यूचा महामार्ग झाला, अशी म्हणण्याची वेळ आली आहे. पावसाळ्यात या महामार्गाची अक्षरक्ष: चाळण झाली असून, राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरण कोणतीच उपाययोजना करीत नाही. बुधवारी एका निष्पाप प्राध्यापकाचा महामार्गावरील खड्ड्याने बळी घेतला. गत तीन वर्षांत या महामार्गावर केवळ साकोली तालुक्यात जांभळी ते मुंडीपार रस्त्यावर आठ जणांना मृत्यू, तर १५ जणांना कायमचे अपंगत्व आले आहे.भंडारा जिल्ह्यातून मुंबई-कोलकाता हा राष्ट्रीय महामार्ग जातो. देशातील प्रमुख महामार्गात त्याची गणना होते. अहोरात्र वाहनांची वर्दळ असते. डांबरी असलेल्या या महामार्गावर पावसाळ्याच्या दिवसात मोठाले खड्डे पडले आहेत. एक किलोमीटर अंतरातील खड्डे मोजतानाही कुणाचीही दमछाक होईल, अशी अवस्था या महामार्गाची झाली आहे. साकोली तालुक्यातील जांभळी ते मुंडीपार हा रस्ता तर आणखीनच भयावह झाला आहे. वनकायद्यामुळे या परिसरात रस्त्याचे चौपदरीकरण करण्यात आले नाही. दुहेरी मार्ग असलेल्या या परिसरात आता मोठाले खड्डे पडले आहेत. काही खड्डे तर अक्षरक्ष: एक एक फुटाचे आहेत.या रस्त्यावरून जाताना वाहनधारकांना जीव मुठीत घेवून जावे लागते. दुचाकी चालकांच्या तर रस्ता पार करताना अंगावर काटे येतात. असा एकही दिवस जात नाही की या महामार्गावर अपघात झाला नाही. बुधवारी प्रा. प्रोफेसर बहेकार आपल्या दुचाकीने साकोलीकडे येत होते. त्यावेळी एका खड्ड्यातून दुचाकी उसळली आणि खाली कोसळली. त्याचवेळी त्यांच्या अंगावरून ट्रकचे चाक गेले. त्यांचा हकनाक खड्ड्याने बळी घेतला. गत तीन वर्षांत आठ जणांना या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे जीव गमवावा लागला आहे. अपघातानंतर थातूरमातूर दुरुस्ती केली जाते. परंतु पावसामुळे पुन्हा ‘जैसे थे’ स्थिती होते.महामार्ग प्राधीकरणाला माहितीनागरिकांच्या सुरक्षेची जवाबदारी असलेल्या पोलिसांनी आता सामाजिक बांधिलकी म्हणून राष्ट्रीय महामार्गाच्या दुरुस्तीसाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणाला पत्र पाठविले आहे. तात्काळ रस्ता दुरुस्तीची सूचना केली आहे. मात्र अपघातानंतर दुसऱ्या दिवशीही स्थिती कायम होती. तर साकोली के सितारे या ग्रुपने सकाळपासून संबंधित विभागाला माहिती देऊन रस्ता दुरुस्तीची माहिती दिली. तसेच प्रा. बहेकार यांना आर्थिक मदतीसाठी निवेदन देणार आहेत.

वनकायद्यात अडकला महामार्ग- राष्ट्रीय महामार्गाचे आठ वर्षांपूर्वी भंडारा ते साकोली असे चौपदरीकरण करण्यात आले. मात्र जांभळी ते मुंडीपार या परिसरात रस्ता तयार करण्यास वनविभागाने परवानगी दिली नाही. वनकायद्यामुळे हा तीन किलोमीटरचा रस्ता दुपदरी आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला दाट जंगल असून, रस्ता ठिकठिकाणी उखडलेला आहे. या रस्त्याची दुरुस्ती सहा महिन्यांपूर्वी करण्यात आली होती. परंतु पावसाळ्यात या रस्त्याची पुन्हा ‘जैसे थे’ स्थिती झाली आहे.

लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष- मुंबई-कोलकाता या राष्ट्रीय महामार्गाच्या दुरुस्तीसाठी कोणत्याही लोकप्रतिनिधीने पुढाकार घेतला नाही. रस्त्यावरून नेहमी आपल्या आलिशान वाहनातून आमदार, खासदार जात असतात. परंतु त्यांना या रस्त्यावरील खड्डे दिसत नाही. ही शोकांतिकाच म्हणावी लागेल. लोकप्रतिनिधींना वारंवार सांगूनही उपयोग होत नाही.

 

टॅग्स :highwayमहामार्गroad safetyरस्ते सुरक्षा