शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

रेती तस्करांना नदी घाट मोकाट; लिलावाची प्रक्रियाही संथगतीने, कोट्यवधींचा महसूल जातोय पाण्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2023 15:52 IST

जिल्ह्यात ६४ रेती घाट

भंडारा : जिल्ह्याला वरदान स्वरुपात मिळालेल्या रेतीच्या गाैण खनिजाला तस्करांची वक्रदृष्टी पुन्हा एकदा जोरात लागली आहे. रेती घाटांचे लिलाव झाले नसल्याने या नदी घाटांवर सर्रासपणे रेतीचा उपसा व वहन केले जात आहे. यामुळे शासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडत आहे.

जिल्ह्यात दीड दशकांपूर्वी ९० पेक्षा जास्त रेती घाटांची संख्या होती. गोसेखुर्द धरणाच्या टप्प्याटप्प्याने पूर्णत्वानंतर जलसंचयनाची प्रक्रियाही राबविली गेली. परिणामी २० ते ३५ टक्के रेती घाट पाण्याखाली आले. गत तीन वर्षांपासून पाण्याची पातळी कायम आहे. त्यामुळे रेती घाटांची संख्याही कमी झाली. त्यातही न्यायालयीन प्रक्रिया रखडल्यामुळे काही रेती घाटांचे लिलाव झाले नाही. गतवर्षी एकूण रेती घाटांपैकी फक्त १४ रेती घाटांचे लिलाव झाले होते. भंडारा, मोहाडी, तुमसर व पवनी तालुक्यात तर रेती तस्करांनी कहरच केला.

महसूल व पोलिस अधिकाऱ्यांवर हल्ला करण्यापर्यंत मजल मारलेल्या तस्करांना आता कुणाचेही भय नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. मोहाडी, तुमसर व लाखांदूर तसेच पवनी तालुक्यात रेती तस्करीला पुन्हा एकदा उधाण आले आहे. जिल्ह्यातील एकही रेतीघाटांचे लिलाव झाले नाही. किंबहुना तस्करांचे फावले पाहिजे म्हणूनच घाटांच्या लिलावाला विलंब केला जात असल्याचीही खमंग चर्चा खुद्द प्रशासनातच रंगली आहे.

तर लिलावासाठी महिनाभराचा कालावधी

जिल्ह्यात सद्य:स्थितीत ६४ रेती घाटांच्या लिलावाची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती आहे. यात पर्यावरण समितीची हिरवी झेंडी मिळाल्यानंतर लिलाव प्रक्रियेला प्रत्यक्षपणे सुरुवात होणार आहे. यासंबंधाने पुढील आठवड्यात समितीची सभा होणार असल्याचीही विश्वसनीय माहिती आहे. त्यानंतरच लिलाव प्रक्रियेला गती मिळणार आहे. लिलाव झाले नसतानाही रेतीची वाहतूक का थांबत नाही हाही संशोधनाचा विषय आहे. लिलाव प्रक्रियेनंतर रेती प्रति ट्रक व ट्रॅक्टरचे भाव कमी होतील. परंतु लिलावापूर्वी म्हणजेच विद्यमान घडीला हेच दर आसमंताला भिडले आहेत.

कुणाकुणाचे संगनमत

पूर आला की नदीपात्रातून उपसलेल्या रेतीचा पुन्हा भरणा होत असतो. निसर्गाची ही किमया भंडारा जिल्ह्यातील तस्करांना कोट्यधीश बनवून गेली आहे. अर्थातच यात अधिकाऱ्यांचेही चांगभले होत असते. तस्कर व अधिकाऱ्यांचे संगनमत ही काही नवीन बाब नाही. मात्र लिलाव प्रक्रियेला विलंब होत असताना संगनमत आहे हे नक्कीच स्पष्ट होत आहे.

दरम्यान गतवर्षी ठरलेल्या किंमतीनुसार काही घाट विकले गेले नाही. परंतु त्या घाटातून रेतीचा उपसा मात्र सुरुच होता, हे येथे उल्लेखनीय. दरम्यान रेतीघाटांचा लिलाव करून जनसामान्यांसह घरकुल लाभार्थ्यांना माफक दरात रेती उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीsandवाळूSmugglingतस्करीbhandara-acभंडारा