शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

रेती तस्करांना नदी घाट मोकाट; लिलावाची प्रक्रियाही संथगतीने, कोट्यवधींचा महसूल जातोय पाण्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2023 15:52 IST

जिल्ह्यात ६४ रेती घाट

भंडारा : जिल्ह्याला वरदान स्वरुपात मिळालेल्या रेतीच्या गाैण खनिजाला तस्करांची वक्रदृष्टी पुन्हा एकदा जोरात लागली आहे. रेती घाटांचे लिलाव झाले नसल्याने या नदी घाटांवर सर्रासपणे रेतीचा उपसा व वहन केले जात आहे. यामुळे शासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडत आहे.

जिल्ह्यात दीड दशकांपूर्वी ९० पेक्षा जास्त रेती घाटांची संख्या होती. गोसेखुर्द धरणाच्या टप्प्याटप्प्याने पूर्णत्वानंतर जलसंचयनाची प्रक्रियाही राबविली गेली. परिणामी २० ते ३५ टक्के रेती घाट पाण्याखाली आले. गत तीन वर्षांपासून पाण्याची पातळी कायम आहे. त्यामुळे रेती घाटांची संख्याही कमी झाली. त्यातही न्यायालयीन प्रक्रिया रखडल्यामुळे काही रेती घाटांचे लिलाव झाले नाही. गतवर्षी एकूण रेती घाटांपैकी फक्त १४ रेती घाटांचे लिलाव झाले होते. भंडारा, मोहाडी, तुमसर व पवनी तालुक्यात तर रेती तस्करांनी कहरच केला.

महसूल व पोलिस अधिकाऱ्यांवर हल्ला करण्यापर्यंत मजल मारलेल्या तस्करांना आता कुणाचेही भय नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. मोहाडी, तुमसर व लाखांदूर तसेच पवनी तालुक्यात रेती तस्करीला पुन्हा एकदा उधाण आले आहे. जिल्ह्यातील एकही रेतीघाटांचे लिलाव झाले नाही. किंबहुना तस्करांचे फावले पाहिजे म्हणूनच घाटांच्या लिलावाला विलंब केला जात असल्याचीही खमंग चर्चा खुद्द प्रशासनातच रंगली आहे.

तर लिलावासाठी महिनाभराचा कालावधी

जिल्ह्यात सद्य:स्थितीत ६४ रेती घाटांच्या लिलावाची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती आहे. यात पर्यावरण समितीची हिरवी झेंडी मिळाल्यानंतर लिलाव प्रक्रियेला प्रत्यक्षपणे सुरुवात होणार आहे. यासंबंधाने पुढील आठवड्यात समितीची सभा होणार असल्याचीही विश्वसनीय माहिती आहे. त्यानंतरच लिलाव प्रक्रियेला गती मिळणार आहे. लिलाव झाले नसतानाही रेतीची वाहतूक का थांबत नाही हाही संशोधनाचा विषय आहे. लिलाव प्रक्रियेनंतर रेती प्रति ट्रक व ट्रॅक्टरचे भाव कमी होतील. परंतु लिलावापूर्वी म्हणजेच विद्यमान घडीला हेच दर आसमंताला भिडले आहेत.

कुणाकुणाचे संगनमत

पूर आला की नदीपात्रातून उपसलेल्या रेतीचा पुन्हा भरणा होत असतो. निसर्गाची ही किमया भंडारा जिल्ह्यातील तस्करांना कोट्यधीश बनवून गेली आहे. अर्थातच यात अधिकाऱ्यांचेही चांगभले होत असते. तस्कर व अधिकाऱ्यांचे संगनमत ही काही नवीन बाब नाही. मात्र लिलाव प्रक्रियेला विलंब होत असताना संगनमत आहे हे नक्कीच स्पष्ट होत आहे.

दरम्यान गतवर्षी ठरलेल्या किंमतीनुसार काही घाट विकले गेले नाही. परंतु त्या घाटातून रेतीचा उपसा मात्र सुरुच होता, हे येथे उल्लेखनीय. दरम्यान रेतीघाटांचा लिलाव करून जनसामान्यांसह घरकुल लाभार्थ्यांना माफक दरात रेती उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीsandवाळूSmugglingतस्करीbhandara-acभंडारा