शहरं
Join us  
Trending Stories
1
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
2
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
3
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
4
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
5
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
7
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
8
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
9
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
10
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
11
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
12
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
13
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
14
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
15
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
16
नोकर भरतीचा गोंधळ आता तरी थांबणार का?; आता केरळच्या धर्तीवर होणार भरती प्रक्रिया
17
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
18
शारदीय नवरात्र म्हणजे निर्मितीशक्तीचा उत्सव; पूजा नऊ दिवसच का? महत्त्व जाणून घ्या
19
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
20
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...

स्नेहसंमेलनातून हागणदारीमुक्तीचा संकल्प

By admin | Updated: February 14, 2017 00:19 IST

जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाने हागणदारीमुक्तीचा ध्यास घेतला आहे. रोजगार हमी योजनेची कामे असो ...

मांढळ येथील कार्यक्रम : जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाचा पुढाकार, शौचालय वापर व बांधकामावर भरभंडारा : जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाने हागणदारीमुक्तीचा ध्यास घेतला आहे. रोजगार हमी योजनेची कामे असो किंवा गावात होणारे कार्यक्रम. कुठल्याही कार्यक्रमातून या कक्षेचे अधिकारी किंवा पथक ग्रामस्थांना मार्गदर्शन करण्यास विसरत नाही किंवा असा कुठलाही दिवस उजाडत नाही. तुमसर तालुक्यातील मांढळ येथील शालेय स्रेहसंमेलनातून उपस्थित ग्रामस्थांना हागणदारीमुक्तीचा संदेश देण्यात आल्याचा अभिनव प्रयोग ग्रामस्थांनी बघीतला. या कार्यक्रमाला उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुधाकर आडे, सरपंच लक्ष्मीकांत सेलोकर, जि.प. सदस्य गिता माटे, पंचायत समिती सदस्य मालिनी वहिले, राजू माटे, माहिती शिक्षण संवाद सल्लागार राजेश येरणे, शाखा व्यवस्थापक उत्तम वाडेकर, सिंधू चौधरी, कृष्णाजी चौधरी, राजेश वहिले, वर्षा चौधरी, रंजना चौधरी, संघमित्रा घोडेस्वार यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. स्नेसंमेलनातून विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास घडविण्याबरोबर प्रत्येक कुटुंबाला स्वच्छ सुंदर व गाव हागणदारीमुक्त करण्यासाठी मांढळ येथील महिलांनी पुढाकार घेतला आहे. शौचालयाची उभारणी करुन त्याचा वापर करण्यावर मान्यवरांनी मार्गदर्शन केले. स्वच्छता ही कुटुंबाची खरी गरज आहे. त्यातूनच कुटुंबाचा विकास साधता येईल असाही मानस यावेळी व्यक्त करण्यात आला. यावेळी मुकेश सव्वालाखे, मेश्राम, तंमुस अध्यक्ष वामदेव बारस्कर, विजय अहिरे, अर्जुन ठवकर, वनिता वहिले, बाळकृष्ण पंचबुध्दे, विजय चौधरी, श्रावण गोमासे, फत्तु अहिर, सुरेखा चौधरी, कुंदा गोमासे, उषा बुधे, हिवराज सिंगाडे, यशवंत क्षीरसागर, सुभाष बारस्कर, लतीश सेलोकर, पल्लवी तिडके, पौर्णिमा डुंभरे, वर्षा दहीकर आदी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)हागणदारीमुक्तीसाठी महिलांचा पुढाकारमांढळ हे गाव हागणदारीमुक्तीच्या वाटेवर आहे. काही शौचालय बांधण्यानंतर गावाला हागणदारीमुक्ती करण्यात येईल. यावेळी गावात प्रत्येक समारंभ कार्यक्रमातून याचा संदेश देण्यात येत आहे. याच औचित्याने स्नेहसंमेलनाच्या व्यासपीठावरुन ग्रामस्थांना हा संदेश देण्यात आला. यावेळी उपस्थित महिलांनी प्रतिसाद देत २० फेब्रुवारीपर्यंत गाव हागणदारीमुक्त करण्याचा संकल्प केला आहे. घर आणि गावांना नवी दिशा दयायची असेल तर कुटुंब समृध्द झाला पाहिजे. त्यासाठी संपत्तीच्या श्रीमंतीपेक्षा विचाराच्या श्रीमंतीने कुटुंबातील बाल मनांवर सुसंस्कार झाले पाहिजे. याकरिता प्रत्येक कुटुंबात स्वच्छतेचे शिपाई तयार व्हायला पाहिजे. गर्दीच्या ठिकाणी महिलांना एखाद्याकडून धक्का लागल्यास पुरुषाचा राग अनावर होतो. महिलांना प्रात:विधीसाठी बाहेर पाठविणाऱ्या कुटुंब प्रमुखांनी त्यांच्या घरची इज्जत जाणार नाही असे कृत्य करु नये. गावात स्वच्छतेचे वातावरण तयार व्हायला पाहिजे. हातात घेतलेला तांब्या यापुढे दिसणार नाही असा पुढाकार आता ग्रामस्थांनी घेण्याचे प्रतिपादन आडे यांनी यावेळी केले आहे. - सुधाकर आडे, उप मुख्य कार्यपालन अधिकारी