शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
4
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
5
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
6
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
7
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
8
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
9
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
10
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
11
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
12
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
13
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
14
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
15
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
16
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
17
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
18
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
19
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
20
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

जंगलात आग लागलेली दिसताच वन विभागाला कळवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:34 IST

नीतेश धनविजय : मोहफूल गोळा करणाऱ्यांनी सावधानता बाळगावी पवनारा : एप्रिलला सुरवात होताच सूर्य आग ओकू लागल्याने वातावरणातील तापमान ...

नीतेश धनविजय : मोहफूल गोळा करणाऱ्यांनी सावधानता बाळगावी

पवनारा : एप्रिलला सुरवात होताच सूर्य आग ओकू लागल्याने वातावरणातील तापमान दिवसेंदिवस वाढत असल्याने जंगलात वणवे लागत असून ते विझविण्याकरिता वनकर्मचाऱ्यांना रात्रंदिवस तारेवरची कसरत करावी लागते. वणवे लागण्याचे पुन्हा एक कारण पुढे आले ते मोहफुलांचा बहर. ही जंगलाची देण जंगलाच्या हानीस कारणीभूत ठरत आहे.

मोहफुलापासून गावागावात दारू बनविल्या जात असल्याने मागणी जास्त आहे. मोहफूल गोळा करण्यासाठी घरातील लहानमोठी मंडळी रोज सकाळी जंगलात जातात. सध्या मोहफूल गोळा करण्याचा हंगाम सुरू आहे. मोहफूल वेचण्याकरिता झाडाखालील पालापाचोळ्याचा अडसर येऊ नये म्हणून रात्री आग लावून निघून जात असल्याने जंगलाला आग लागू शकते. असा प्रकार होता कामा नये, म्हणून नाकाडोंगरीचे वनपरिक्षेत्राधिकारी नीतेश धनविजय आपल्या फिरत्या पथकासह गावागावात जाऊन नागरिकांना जागरूक करीत आहेत.

विशेष म्हणजे लवकरच तेंदूपत्ता हंगाम सुरू होणार आहे. नवीन पाने चांगली यावी म्हणून टेंभूर्णीच्या झाडाला आग लावण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हे अनधिकृत असून कायदेशीर गुन्हा आहे. त्यामुळे जंगलाला आग लागण्याच्या प्रकारात पुन्हा भर पडलेली आहे.

जंगलाला आग लागल्यामुळे अनेक सरपटणारे जीव, पक्ष्यांचे घरटे व मौल्यवान वनसंपदा नष्ट होते. त्याबरोबर वन्यप्राण्यांचे नैसर्गिक अधिवास नष्ट होते. मानवाला अन्न, वस्त्र, निवारा याप्रमाणे झाडांचीही अत्यंत गरज आहे. त्याचे प्रत्येकाने जतन करायला पाहिजे. कोणत्याही कारणामुळे जंगलाला आग लागल्यास प्रत्येक नागरिकाने जबाबदारी समजून त्वरित वनविभागाला कळवून सहकार्य करावे, असे आवाहन नाकाडोंगरीचे वनपरिक्षेत्राधिकारी नीतेश धनविजय यांनी केले आहे.