बरसल्या मृगधारा, मशागतीला जाेर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2022 05:00 IST2022-06-10T05:00:00+5:302022-06-10T05:00:11+5:30
मान्सूनची हाेत असलेली आगे-पिछेहाट यामुळे ताे केव्हा बरसेल याची शाश्वती नव्हती. एरवी मृग नक्षत्राच्या पहिल्याच दिवशी पाऊस बरसताे. मात्र बुधवारपासून मृग नक्षत्राला प्रारंभ झाला असतानाही पाऊस बरसला नाही. खरीपाच्या तयारीसाठी चातकासारखी वाट बघत असलेला शेतकरी चिंतातूर हाेता. मात्र गुरुवारी मृगधारा बसरल्या आणि बळीराजाची चिंता थाेडीफार दूर झाली.

बरसल्या मृगधारा, मशागतीला जाेर
लाेकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : राेहणी नक्षत्रात पावसाच्या हलक्या सरी बसरल्यानंतर मृग नक्षत्राचा पहिला दिवस काेरडा गेला. मात्र गुरुवारी मृगधारा लाखांदूर तालुका वगळता सर्वदूर बसरल्या. सायंकाळी ४ वाजताच्यानंतर दमदार पावसाने हजेरी लावली. या पावसाने मशागतीच्या कामाला जाेर येणार असून नागरिकांना मात्र थाेडा वेळासाठी उकाड्यापासून दिलासा मिळाला.
मान्सूनची हाेत असलेली आगे-पिछेहाट यामुळे ताे केव्हा बरसेल याची शाश्वती नव्हती. एरवी मृग नक्षत्राच्या पहिल्याच दिवशी पाऊस बरसताे. मात्र बुधवारपासून मृग नक्षत्राला प्रारंभ झाला असतानाही पाऊस बरसला नाही. खरीपाच्या तयारीसाठी चातकासारखी वाट बघत असलेला शेतकरी चिंतातूर हाेता. मात्र गुरुवारी मृगधारा बसरल्या आणि बळीराजाची चिंता थाेडीफार दूर झाली.
तर दुसरीकडे रबी हंगामांतर्गत शेतशिवारातून चुरणा करुन धान खरेदी केंद्रावर नेणारे धान ओले झाले. भंडारा, माेहाडी, तुमसर, लाखनी, साकाेली व पवनी तालुक्यात पाऊस बरसल्याची नाेंद जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली. या पावसामुळे धानाची पाेती ओली झाल्याने शेतकऱ्यांना नुकसानीला सामाेरे जावे लागणार आहे.
गुरुवारी दुपारपासूनच ढगाळ वातावरण हाेते. मात्र वातावरणात बदल घडवित वादळी वाऱ्यासह जिल्ह्यातील सहाही तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली. दरम्यान मृग नक्षत्रात पाऊस बरसेल या आशेपाेटी पेरणीपुर्व मशागतीच्या कामाला प्रारंभ केला आहे. नांगरणीच्या कामाला जाेर आल्याचेही दिसून येते. धानाची खरेदी हाेवून हाती आलेल्या पैशातूनच बळीराजा खरीपाच्या तयारीला जुंपत असताे.
शेतकरी मात्र संभ्रमात
- धान खरेदीची मर्यादा किती याबाबत अजूनही संभ्रमता कायम आहे. गुरुवारी बरसलेल्या पावसानंतर बहुतांश धान ओले झाले आहे. धान पाखर झाले म्हणून ओले झालेले धान घेण्यास खरेदी केंद्रावर मज्जाव केला जाताे. याचाही फटका शेतकऱ्यांनाच सहन करावा लागताे.