शहरं
Join us  
Trending Stories
1
चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
2
"मला नितीश कुमार मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते...", बिहारच्या सीएम पदावर चिराग पासवान यांनी स्पष्टच सांगितले
3
बिहारमध्ये सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाची वाढली डोकेदुखी; मंत्रिपदाचा फॉर्म्युला बदलावा लागणार?
4
“तुम्ही चांगल्या योजना आणल्या नाहीत, जो जीता वहीं सिकंदर”; CM फडणवीसांचे शरद पवारांना उत्तर
5
इंदुरीकर महाराजांच्या लेकीच्या साखरपुड्यात किती लोक आले होते? जावयानेच सांगितला खरा आकडा
6
Gold prices today: ३३५१ रुपयांनी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीतही मोठी घसरण; खरेदीदारांनी टाकला सुटकेचा नि:श्वास
7
Elections 2026: आता दक्षिणेत स्वारी! भाजपसाठी 'या' तीन राज्यात सत्तेचं स्वप्न पूर्ण होणार का?
8
IPL 2026 Trades Players Full List : जड्डू-संजूशिवाय 'या' ६ खेळाडूंसाठी झाली कोट्यावधींची डील
9
Union Bank मध्ये जमा करा ₹२,००,०००; मिळेल ₹८५,०४९ चं गॅरंटीड फिक्स व्याज, कोणती आहे स्कीम?
10
Shubman Gill Injury Update : शुभमन गिलनं मैदान सोडलं! पंत झाला कॅप्टन, नेमकं काय घडलं?
11
अमेरिकेत महागाईनं हाहाकार! ट्रम्प यांनी अनेक वस्तूंवरील टॅरिफ केलं कमी, स्वस्त होणार 'या' गोष्टी
12
बिहार निवडणुकीत विरोधात काम, माजी केंद्रीय मंत्री पक्षातून निलंबित; भाजपाची मोठी कारवाई
13
लाल किल्ल्याजवळील स्फोटाने जमीन हादरली; मेट्रो स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेज आले समोर
14
बिहारमध्ये सर्वाधिक १ कोटी १५ लाख मते मिळवणारा RJD ठरला नंबर वन पक्ष; भाजपा-जेडीयूला किती मते?
15
कुणी २७, कुणी ९५ मतांनी, तर..., बिहारमधील या मतदारसंघांत माफक फरकाने झाला जय-पराजयाचा फैसला
16
'मारुती सुझुकी'च्या या कारमध्ये मोठा बिघाड, ३९ हजारांहून अधिक गाड्या परत मागवल्या
17
धक्कादायक...! मध्यरात्रीचा थरार...! पूर्वजांना मोक्ष मिळावा म्हणून आईनं पोटच्या २ चिमुकल्यांची केली हत्या, सासरे थोडक्यात बचावले
18
मुदतीपूर्वीच Gen Z कर्मचाऱ्यांना कंपनीतून का काढलं जातंय?; स्टडी रिपोर्टमधून समोर आलं कारण
19
धर्मेंद्र यांच्या ९० व्या वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन होणार! हेमा मालिनी म्हणाल्या- "आता प्रत्येक दिवस..."
20
New Fastag Rule: आजपासून फास्टॅगच्या नियमांत झाला मोठा बदल; याकडे लक्ष दिलं नाही तर भरावा लागेल दुप्पट टोल
Daily Top 2Weekly Top 5

पाऊस ओसरला, पूर कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2020 05:01 IST

भंडारा जिल्ह्यात गत २४ तासात ६६.९ मिमी पावसाची नोंद झाली. सर्वाधिक पाऊस तुमसर तालुक्यात १०२ मिमी नोंदविला गेला. भंडारा ७४.३, मोहाडी ८५.३, पवनी २०.६, साकोली ८०, लाखांदूर २८.३, लाखनी ७८ मिमी पावसाची नोंद झाली. २४ तास अविश्रांत झालेल्या या पावसाने जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा संचय झाला आहे. भंडारा शहरासह तालुक्यातील १९ गावांना पूराचा पाण्याचा फटका बसला.

ठळक मुद्देगोसे, बावनथडी प्रकल्पाचे दरवाजे उघडले । अनेक मार्ग बंद, नदी तीरावरील गावात हाहाकार

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : संततधार पावसाने विश्रांती घेतली असली तरी वैनगंगा आणि बावनथडी प्रकल्पाचे दरवाजे उघडल्याने जिल्ह्यात पूर स्थिती निर्माण झाली आहे. तुमसर, मोहाडी, भंडारा आणि पवनी तालुक्यातील नदी तीरावरील गावांमध्ये पाणी शिरले असून अनेकांनी सुरक्षितस्थळी आश्रय घेतला आहे. अनेक मार्ग पुरामुळे बंद पडले आहे. भंडारा शहरातील काही वसाहतीत पुराचे पाणी शिरल्याने नागरिकांना नावेच्या सहायाने सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. आपत्ती व्यवस्थापन विभाग जिल्ह्यातील पूर परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहे.भंडारा जिल्ह्यात गत २४ तासात ६६.९ मिमी पावसाची नोंद झाली. सर्वाधिक पाऊस तुमसर तालुक्यात १०२ मिमी नोंदविला गेला. भंडारा ७४.३, मोहाडी ८५.३, पवनी २०.६, साकोली ८०, लाखांदूर २८.३, लाखनी ७८ मिमी पावसाची नोंद झाली. २४ तास अविश्रांत झालेल्या या पावसाने जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा संचय झाला आहे. भंडारा शहरासह तालुक्यातील १९ गावांना पूराचा पाण्याचा फटका बसला. शहरातील ग्रामसेवक कॉलनी, गणेशनगरी यासह तालुक्यातील गणेशपूर, जुनी पिंपरी, दवडीपार बेला, कोथूर्णा आदी गावात पूराचे पाणी शिरले. शहरातील ग्रामसेवक कॉलनीतील ५८ घरात तीन फुट पाणी असून या भागातील नागरिक भयभीत झाले आहे.तुमसर तालुक्यातील बावनथडी प्रकल्प शंभर टक्के भरला आहे. गत २४ तासात या धरणामध्ये विक्रमी ८०१ क्युमेक्स पाण्याचा संचय झाला. तसेच धरण परिसरात ११६ मिमी पावसाची नोंद झाली. त्यामुळे या प्रकल्पाचे पाणी सोडण्यात आले. परिणामी तुमसर तालुक्यातील अनेक गावात पूर परिस्थिती निर्माण झाली. ब्राम्हणी आणि बोरी, उमरवाडा, कोष्टी, माडगी, ढोरवाडा गावात पाणी शिरले. बोरी येथे २५० एकर धान पीक पाण्याखाली आले आहे. तामसवाडी गावाला बेटाचे स्वरूप आले आहे. तामसवाडी येथील गावेर्धन नगरातील हरीप्रसाद रावते यांचे घर पावसामुळे कोसळले. मात्र जीवितहानी झाली नाही. लाखांदूर तालुक्यात चुलबंद नदीला तिसऱ्यांदा पूर आला. त्यामुळे शेकडो हेक्टर पीक पाण्याखाली आले आहे. मोहाडी तालुक्यालाही पुराचा फटका बसला असून मुंढरी ते कोका दरम्यान पुलाच्या बांधकामामुळे खडकी गावाला पुराचा फटका बसला. गोसे प्रकल्पाचे सर्व ३३ दरवाजे उघडण्यात आले आहे. त्यात सात दरवाजे चार मीटरने तर २६ दरवाजे ३.५ मीटरने उघडण्यात आले. या प्रकल्पातून २३ हजार ३८३ क्युमेक्स पाण्याचा विसर्ग होत आहे.अनेक मार्ग बंदपूरपरिस्थिती निर्माण झाल्याने जिल्ह्यातील अनेक मार्ग बंद पडले आहेत. बावनथडी नदीला पूर आल्याने बपेरा गावाजवळील पूलावरून चार फुट पाणी वाहत आहे. त्यामुळे महाराष्ट्र-मध्यप्रदेश आंतरराज्यीय वाहतूक बंद झाली आहे. बोडीतेला, बिनाखी, सिंदपुरी, चुल्हाड, सिलेगाव, परसवाडा, सुकळी-देवसर्री, रनेरा-सिलेगाव या गावांचा ही संपर्क तुटला. पुलावरून पाच फुट पाणी असल्याने वाहतूक ठप्प आहे. मोहाडी तालुक्यातील वडेगाव, आंधळगाव मार्गासह करडी मार्गावरील उसरीपार पुलावर पाणी असल्याने या मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. भंडारा शहरालगत असलेल्या कारधा लहान पुलावरून पुराचे पाणी वाहत असल्याने हा रस्ता बंद करण्यात आला. भंडारा-तुमसर या मार्गावरील भंडारालगत मेहंदी पुलावरून सायंकाळी पाणी वाहत असल्याने हा रस्ताही बंद झाला. राष्ट्रीय महामार्गावरील भंडारालगतच्या मोठ्या पुलावर सायंकाळी ट्रक उलटल्याने या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. शहरात वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र दिसत होते.भंडारा जिल्ह्यातील पूरपस्थितीवर आपण लक्ष ठेवून आहो. जिल्हाधिकारी आणि पालकमंत्र्यांशी या संदर्भात चर्चा केली आहे. नुकसानग्रस्तांना अधिकाअधिक मदत देण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. माजी आमदार राजेंद्र जैन पूरग्रस्त गावांना भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेत आहे. पूरग्रस्तांना त्वरित आर्थिक मदत मिळावी यासाठी पूर्ण प्रयत्न केले जाईल.-प्रफुल पटेल, खासदार

टॅग्स :floodपूरRainपाऊस