शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
3
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
4
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
5
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
6
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

पाऊस धुव्वाधार, पण जलप्रकल्प तहानलेलेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 11:37 PM

चार दिवसात सर्वत्र धुव्वाधार पाऊस बरसला असला तरी जिल्ह्यातील जलप्रकल्पांमध्ये मात्र केवळ १८ टक्केच जलसाठा आहे. चार दिवसाच्या या पावसाने वार्षिक सरासरीच्या निम्मी मजल गाठली आहे. जिल्ह्यात भात रोवणीला प्रारंभ झाला असून आणखी दमदार पावसाची प्रतीक्षा जिल्हावासीयांना आहे.

ठळक मुद्दे१८ टक्केच जलसाठा : दीड महिन्यात वार्षिक सरासरीच्या निम्मा पाऊस

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : चार दिवसात सर्वत्र धुव्वाधार पाऊस बरसला असला तरी जिल्ह्यातील जलप्रकल्पांमध्ये मात्र केवळ १८ टक्केच जलसाठा आहे. चार दिवसाच्या या पावसाने वार्षिक सरासरीच्या निम्मी मजल गाठली आहे. जिल्ह्यात भात रोवणीला प्रारंभ झाला असून आणखी दमदार पावसाची प्रतीक्षा जिल्हावासीयांना आहे.दीर्घ विश्रांतीनंतर रविवारी रात्रीपासून जिल्ह्यात पावसाचे आगमन झाले. मंगळवारपर्यंत संततधार पाऊस कोसळला. जिल्ह्यात १ जून ते १८ जुलै पर्यंत ५३५.३ मिमी पावसाची नोंद झाली. हा पाऊस वार्षिक सरासरीच्या जवळपास निम्मा आहे. जिल्ह्याची वार्षिक सरासरी १३३०.२ मिमी आहे. सर्वाधिक पाऊस साकोली तालुक्यात ५८८.२ मिमी त्याखालोखाल भंडारा ५५९.८ मिमी, मोहाडी ५४२.९ मिमी, तुमसर ५२७.२ मिमी, पवनी ७७९.४ मिमी, लाखांदूर ५२९.५ मिमी, लाखनी ५२०.४ मिमी झाला आहे. गतवर्षी याच कालावधीत जिल्ह्यात केवळ २८६.१ मिमी पाऊस झाला.या पावसाने जिल्ह्यातील नदी नाल्यांना पूर आले. अनेक गावातील घरांना पुराचा फटका बसला. काही घरांचे अंशत: नुकसान झाले. जिल्हा प्रशासनाच्या वतीने नुकसान झालेल्या भागाचे सर्व्हेक्षण करण्यात येत आहे.सर्वत्र धुव्वाधार पाऊस झाला असला तरी जिल्ह्यातील जलप्रकल्पांमध्ये मात्र १८.७२२ टक्के जलसाठा आहे. त्यात चांदपूर, बघेडा, बेटेकर बोथली आणि सोरणा या चार मध्यम प्रकल्पात केवळ १६.४३ टक्के जलसाठा आहे. जिल्ह्यातील ३१ लघु प्रकल्पांमध्ये २१.१३ टक्के आणि माजी मालगुजारी तलावांमध्ये १९.५८ टक्के जलसाठा आहे. पाऊस दमदार होऊनही जलसाठा वाढला नाही. त्यामुळे आणखी धुव्वाधार पावसाची प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे. दरम्यान गत तीन दिवसाच्या पावसाने रोवणीच्या कामाला जिल्ह्यात वेग आला आहे.मध्यम प्रकल्पात १६.४३ टक्के पाणीतुमसर तालुक्यातील चांदपूर प्रकल्पात ११.३३ टक्के, बघेडा प्रकल्पात ५९.८६ टक्के, मोहाडी तालुक्यातील बेटेकर बोथली प्रकल्पात २३.२६ टक्के आणि सोरणा प्रकल्पात केवळ ३.४१ टक्के जलसाठा आहे. या प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात पुरेसा पाऊस झाला नाही. त्यामुळे जलसाठ्यात वाढ झाली नाही. सध्या या प्रकल्पात ०.९७८ दलघमी उपयुक्त जलसाठा आहे.