शहरं
Join us  
Trending Stories
1
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
2
१८ चेंडू, ५ धावा अन् ३ विकेट्स! पॅट कमिन्स, भुवनेश्वर कुमार यांनी मुंबई इंडियन्सला रडवले 
3
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
4
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
5
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
6
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
7
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
8
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
9
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
10
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
11
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
12
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
13
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
14
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
15
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
16
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
17
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
18
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
19
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
20
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका

शिवाजीनगरात समस्याच समस्या, नगर परिषदेचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 12:54 AM

ऐतिहासिक, प्राचीन पवनी नगराचे झपाट्याने शहरीकरण होत आहे. त्यामुळे अनेक कॉलनी तयार होत आहेत. या शहराला लागून असलेल्या व नव्याने पवनी नगर परिषद हद्दीत समावेश झालेल्या शिवाजी नगरात मूलभूत सुविधांअभावी नागरिकांच्या जीवीताला धोका निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देमूलभूत सोईसुविधांचा अभाव : नागरिकांचे आरोग्य धोक्यात, ‘नाव मोठे दर्शन खोटे’ची प्रचिती

लक्ष्मीकांत तागडे।लोकमत न्यूज नेटवर्कपवनी : ऐतिहासिक, प्राचीन पवनी नगराचे झपाट्याने शहरीकरण होत आहे. त्यामुळे अनेक कॉलनी तयार होत आहेत. या शहराला लागून असलेल्या व नव्याने पवनी नगर परिषद हद्दीत समावेश झालेल्या शिवाजी नगरात मूलभूत सुविधांअभावी नागरिकांच्या जीवीताला धोका निर्माण झाला आहे.नगर परिषदेने येथील नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात कर वसूल केला आहे. पण पिण्याचे शुद्ध पाणी, रस्ते, नाल्या, पथदिवे या मुख्य सुविधा दिल्या नाहीत. नाल्या नसल्यामुळे सांडपाणी जागोजागी जमा होत आहे. तसेच अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी जमा होत आहे. त्यामुळे जीवन कसे जगावे, असा प्रश्न येथील नागरिकांसमोर निर्माण झाला आहे.पवनी शहरात बसस्थानकाजवळ निलज, कारधा राज्यमार्ग क्रमांक २४१ ला लागून शिवाजी नगर वसले आहे. या नगरातील सुंदर, अद्यावत इमारतींनी या नगरासोबतच पवनी शहरालाही सुंदर केले आहे. या नगराजवळून गोसीखुर्द धरणाचा उजवा कालवा वाहतो. शिवाजी नगराजवळूनच पवनी शहरातील जनता सकाळी-संध्याकाळी फिरायला जाते. येथे कोणीही सर्वप्रथम आल्यास प्रथम पसंती त्यांची शिवाजीनगर असते. पण शिवाजीनगर जरी सुंदर दिसत असले तरी येथील नागरिक अनेक समस्यांशी झुंजत आहेत. पावसाळ्यात येथे प्रवेश करताच चिखलमय रस्त्यांतून मार्ग काढावा लागतो. दुचाकी वाहनांना सांभाळूनच गाडी चालवावी लागते. येथे पक्के रस्ते नाहीत. या नगराचा समावेश अगोदर बेटाळा ग्रामपंचायतमध्ये होता. येथे अनेक समस्या आहेत. त्यामुळेच येथील नागरिकांनी पवनी न.प. मध्ये समावेश करण्याची मागणी केली. त्यानंतर नगरपरिषद हद्दवाढीमध्ये शिवाजी नगराचा समावेश पवनीत झाला. न.प. ने मोठ्या प्रमाणात येथून कर वसुली केली पण समस्या सोडविल्या नाही. येथे अनेक ठिकाणी पथदिव्यांची, नाल्यांची सोय नाही. त्यामुळे रात्रीच्या वेळेस घराबाहेर निघणे धोक्याचे आहे. विषारी सरपटणाऱ्या जीवांचा धोका आहे.नाल्या नसल्यामुळे जागोजागी सांडपाणी जमा झाले आहे व रस्त्यावरूनही वाहत जात आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात डासांची निर्मिती झाली आहे. त्यामुळे विषाणूजन्य ताप हे येथील जनतेसाठी नेहमीचे झाले आहे. येथील जनतेने अनेक वेळा नगरपरिषदकडे लोकप्रतिनिधींकडे समस्या मांडल्या. पण दुर्लक्ष होत आहे. याच समस्या शेषनगर, न्यू शेषनगर, वैभवलक्ष्मी नगर, प्रेमनगर यांच्याही आहेत.