शहरं
Join us  
Trending Stories
1
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
2
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
3
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
4
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
5
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
6
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

जिल्ह्याला पुन्हा मान्सूनपूर्व पावसाचा तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2020 5:00 AM

हवामान खात्याचा अंदाज या वर्षी तंतोतंत खरा ठरला आहे. सोमवारी सायंकाळी जिल्ह्यात सुसाट वारा व विजांच्या कडकडाटासह पाऊस बरसला. दरम्यान मंगळवारी पहाटेपासूनच भंडारा, लाखनी, मोहाडी, तुमसर, साकोली, पवनी व लाखांदूर येथेही पावसाने हजेरी लावली. या पावसाने धान खरेदी केंद्रांवर मोजणीच्या प्रतीक्षेत असलेला धान ओला झाला आहे. दुसरीकडे भाजीपाला पिकांची लागवड केलेल्या शेतात पावसाचे पाणी साचले आहे.

ठळक मुद्देसर्वदूर पावसाची हजेरी : कापलेला धान झाला ओलाचिंब, भाजीपाला पीकही संकटात

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात दोन दिवसाच्या अंतराने पुन्हा मान्सूनपूर्व पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले. सोमवार रात्री ते मंगळवारी सकाळपाळीत पावसाने सर्वदूर हजेरी लावली. यात उन्हाळी धानपिकासह भाजीपाला पीक संकटात सापडले आहे. परिणामी बळीराजाचे टेंशन अजून वाढले आहे.हवामान खात्याचा अंदाज या वर्षी तंतोतंत खरा ठरला आहे. सोमवारी सायंकाळी जिल्ह्यात सुसाट वारा व विजांच्या कडकडाटासह पाऊस बरसला. दरम्यान मंगळवारी पहाटेपासूनच भंडारा, लाखनी, मोहाडी, तुमसर, साकोली, पवनी व लाखांदूर येथेही पावसाने हजेरी लावली. या पावसाने धान खरेदी केंद्रांवर मोजणीच्या प्रतीक्षेत असलेला धान ओला झाला आहे. दुसरीकडे भाजीपाला पिकांची लागवड केलेल्या शेतात पावसाचे पाणी साचले आहे. कठाण पिकांनाही या पावसाचा फटका बसला आहे.पालांदूर जवळील वाकल येथे वीज खांबावर वीज कोसळल्याने इन्सूलेटर व तार तुटले. यामुळे तीन तास वीज पुरवठा खंडीत झाला होता. पालांदूर परिसरातील गावे अंधारात होती. तसेच धानाची मळणी व कापणी केल्यासह धान खरेदी केंद्रावर आणलेला धान या पाण्यामुळे ओला झाला. मेंगापूर धान खरेदी केंद्रावर हे दृष्य बळीराजाला चिंतेत घालणारे होते.लाखांदूर तालुक्यात उन्हाळी धानपिकासह अन्य पिकांची लागवड करण्यात आली होती. जवळपास आठ हजार हेक्टर क्षेत्रात धानाची लागवड करण्यात आली. धान कापणीला व मळणीला वेग आला असतानाच रोहिणी नक्षत्रात पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतातील उभे धानपिक जमीनदोस्त झाले. धानपिकावर पाणी गेल्याने धानाची पोत खराब होऊन खुल्या बाजारात धानाचे भाव गडगडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान कोरडवाहू शेतकऱ्यांना या पावसाचा हंगामपूर्व व मशागतीसाठी पिकाला फायदा होणार असला तरी उन्हाळी धान उत्पादकांसाठी मारक ठरला आहे.ग्रामीण क्षेत्रातही दमदार हजेरीसोमवारी सायंकाळी व मंगळवारी सकाळी बरसलेल्या पावसाने शेतकऱ्यांना चिंतेत घातले आहे. लाखांदूर तालुक्यातील मासळ परिसरात विजांच्या कडकडाटसह पाऊस बरसला. पवनीत सकाळपासूनच पावसाच्या सरी बरसल्या. मोहाडी सह ग्रामीण क्षेत्रात पावसाने चांगलीच हजेरी लावली. लाखनी शहरासह ग्रामीण भागात पावसामुळे जनजीवन प्रभावित झाले. मंगळवारी बाजारपेठ बंद असल्याने शहरात मात्र तितका परिणाम जाणवला नाही. करडी परिसरात पाऊस बरसला असून याचा रोहयो कामावर परिणाम जाणवला. शेतीच्या हंगामाला सुरुवात झाली असून तलावात पाणी साचले आहे. आसगाव परिसरातही मुसळधार पाऊस बरसला.

टॅग्स :Rainपाऊस