शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
2
फार्महाऊसवर सीक्रेट बैठक, असीम मुनीरचा तगडा प्लॅन; पुढील १० वर्ष पाकिस्तानवर करणार 'राज्य'
3
बस फक्त पेट्रोल, डिझेल तेवढे जीएसटीमध्ये आणायचे राहिले...; तिजोरीत फक्त २० रुपयेच आले असते...
4
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
5
मुंबई उपनगरात ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल, ५ सप्टेंबरची सुट्टी कधी? जाणून घ्या
6
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
7
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
8
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?
9
देवाची प्रत्यक्ष भेट! उपेंद्र लिमये यांना भेटले सुपरस्टार रजनीकांत, थलायवाला पाहून अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
10
खराब सर्व्हिस, समस्या...! बजाज चेतक पाचव्या नंबरवर फेकली गेली! ऑगस्टमध्ये स्कूटर खपविताना आले नाकीनऊ...
11
US Open 2025: अमेरिकन ओपन स्पर्धेत भारतीयाचा जलवा! जेतेपदाच्या अगदी जवळ पोहचलाय; आता फक्त...
12
पीएम किसानचा २१ वा हप्ता अडकणार? 'ही' चूक तात्काळ दुरुस्त करा, अन्यथा २००० रुपये मिळणार नाहीत!
13
१८ तास असेल राम मंदिर बंद, ‘या’ दिवशी अयोध्येत अजिबात जाऊ नका; रामलला विश्रांती घेणार?
14
हुंड्याने घेतला आणखी एक बळी! २८ वर्षांच्या पूजाश्रीने संपवलं जीवन, पतीला अटक, काय-काय घडलं?
15
पतीचा पगार वाढला तर पत्नीची पोटगीची रक्कमही वाढणार?; दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल
16
'आठ दिवसात गुन्हा दाखल करा, अजित पवारांनी राजीनामा द्यावा'; महिला आयपीएस अधिकाऱ्याला तंबी प्रकरणी या नेत्याने उपमुख्यमंत्र्यांना फटकारले
17
पाकिस्तानात अंतर्गत धुसफूस! असीम मुनीरचा 'भाव' वाढल्याने संरक्षण मंत्री देणार राजीनामा?
18
जय श्रीराम! राम दर्शनासाठी आता लाइन लावावी लागणार नाही, पासही नको; अयोध्येत नवीन व्यवस्था
19
Video: 'बिग बॉस १९' विशेष टास्कमध्ये प्रणित मोरेची तुफान कॉमेडी, सदस्य हसून हसून लोटपोट
20
Jio Recharge Plan: दररोज २GB डेटासह हवीये दीर्घ वैधता; 'हे' रिचार्ज प्लान्स आहेत बेस्ट

गायमुख मार्गावरील खड्ड्यांनी भाविक त्रासले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2020 06:00 IST

भाविकांच्या मागणीमुळे गायमुखला १९९६ साली ‘क’ वर्ग तीर्थस्थळाचा दर्जा मिळाला. या तीर्थस्थळाच्या विकासासाठी प्रथम टप्प्यात १० लाख नंतर ५० लाख रुपये शासनाकडून मंजूर झाले. यातून काही विकास कामे करण्यात आली. परंतु पर्यटनाची कामे ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे होती तशी न झाल्याने आजही गायमुख तीर्थक्षेत्राचा विकास होऊ शकलेला नाही.

ठळक मुद्देअपघाताची भीती : पर्यटकांची संख्या रोडावली

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : दरवर्षी महाशिवरात्रीला जिल्ह्यातील गायमुख येथे विदर्भासह मध्यप्रदेश, छत्तीसगड राज्यातून हजारो भाविक दर्शनासाठी येतात. मात्र सदर मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने भाविकांना मोठा त्रास सहन करीत प्रवास करावा लागत आहे. येथे असणाऱ्या अनेक गैरसोयींमुळे तसेच खड्डेमय रस्त्यांमुळे भाविकांना त्रास सहन करावा लागत आहे.भाविकांच्या मागणीमुळे गायमुखला १९९६ साली ‘क’ वर्ग तीर्थस्थळाचा दर्जा मिळाला. या तीर्थस्थळाच्या विकासासाठी प्रथम टप्प्यात १० लाख नंतर ५० लाख रुपये शासनाकडून मंजूर झाले. यातून काही विकास कामे करण्यात आली. परंतु पर्यटनाची कामे ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे होती तशी न झाल्याने आजही गायमुख तीर्थक्षेत्राचा विकास होऊ शकलेला नाही. येथे येणाऱ्या भाविकांसह पर्यटकांना विश्रामगृह उभारण्यात आले, पण तेथे विशेष सुविधा उपलब्ध नसल्याने इकडे पर्यटकांनी पाठ फिरविली आहे. दूरदूरवरून येणाऱ्या भाविकांना अरुंद व खड्डेमय रस्त्यामुळे जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. नुकतेच जांब ते गायमुख, मिटेवानी ते आंबागडपर्यंत मुरुम टाकण्याचे काम करण्यात आले. याचा महाशिवरात्रीच्या पर्वावर येणाऱ्या भाविकांना मोठा त्रास होणार आहे.याकडे लोकप्रतिनिधी तसेच प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे भाविकांतून लोकप्रतिनिधींसह प्रशासनाबद्दल तीव्र संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. महाशिवरात्रीपुर्वी त्वरीत रस्त्याचे काम करावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.निसर्गरम्य गायमुखनिसर्गरम्य परिसरात असलेले तीर्थस्थान म्हणून गायमुखची ख्याती आहे. येथे आलेले भाविक चौरागडच्या पर्वतटोकावरून असलेले अप्रतीम निसर्गसौंदर्य न्याहाळतात.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा